शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अरर्र...अन्नपदार्थांच्या नासाडीत भारत जगात दुसरा; प्रत्येक व्यक्तीकडून दरवर्षी ५० किलो अन्न वाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 12:30 IST

प्रत्येक व्यक्तीकडून दरवर्षी ५० किलो अन्न वाया

नवी दिल्ली : अन्नधान्याची नासाडी करण्यात जगात चीन नंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. दरवर्षी ९० हजार कोटी रुपये किमतीच्या ६.८ कोटी टन अन्नपदार्थांचीभारतात नासाडी होते. याचा अर्थ देशातील प्रत्येक व्यक्ती दरवर्षी सरासरी ५० किलो अन्न वाया घालविते. इतक्या पैशांत शीतगृह व फूड चेनची व्यवस्था झाली तर भारतातील एकाही व्यक्तीची उपासमार होणार नाही असे तज्ज्ञांचे मत आहे.  

चीनमध्ये दरवर्षी ९.१ कोटी टन अन्नधान्याची नासाडी होते. याबाबत भारत दुसऱ्या क्रमांकावर असून, तिसऱ्या स्थानी असलेल्या नायजेरियात ३.७ कोटी टन, त्या पाठोपाठ अमेरिकेत २ कोटी टन व इंडोनेशियात १.९ कोटी टन अन्नधान्याची बरबादी होते. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाच्या २०२१ च्या अहवालानुसार भारतामध्ये दरवर्षी ४० टक्के अन्न विवाह तसेच घरगुती समारंभ, धान्य पुरवठ्यातील त्रुटी व अव्यवस्थेमुळे वाया जाते. देशात प्रत्येक घराच्या किचनमधून अन्नधान्य, पदार्थांची मोठ्या प्रमाणावर नासाडी होते. हे टाळे आवश्यक आहे. (वृत्तसंस्था)

मुंबईत रोज ६९ लाख किलो अन्न कचऱ्यात

भारतात २१०० कोटी किलो गहू दरवर्षी खराब होतो. नेमके इतक्याच गव्हाचे उत्पादन ऑस्ट्रेलियामध्ये होते. मुंबईमध्ये दरदिवशी ६९ लाख किलो अन्नपदार्थ कचरापेट्यांमध्ये फेकले जातात. इतक्या प्रमाणातील खाद्य पदार्थांत अर्ध्या मुंबईचे पोट व्यवस्थित भरू शकेल.

जगात ६९ कोटी लोक अर्धपाेटी

जगभरात दरवर्षी २.६ ट्रिलियन डॉलर इतक्या किमतीचे ९३ कोटी टन अन्न दरवर्षी वाया जाते. जगभरात ६९ कोटी लोक दररोज अर्धपाेटी असतात. २०३० पर्यंत ही संख्या ८४ कोटी होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :foodअन्नIndiaभारत