शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

भारताला गुंतवणूकदारांकडून प्राधान्य उत्तम परताव्यामुळेच; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 05:14 IST

नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यम व लघु श्रेणीतील उद्योगांसाठी सरकारने म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजना सादर केली.

मुंबई : भारतीय भांडवली बाजारातून उत्तम परतावा मिळत असल्यामुळे परदेशी वित्तीय संस्थांचा भारतातील वावर वाढला असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी दिली.

सध्या भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणावर पडझड होत आहे. गुंतवणूकदार भारतातून बाहेर का जात आहेत, असे विचारले असता सीतारामन म्हणाल्या, मुळात भारतात त्यांना गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळत असल्यामुळे ते इथे गुंतवणूक करत आहेत. त्यांच्या अपेक्षेनुसार परतावा मिळाल्यानंतर ते बाहेर पडत आहेत. पण, आता भांडवली गुंतवणुकीसाठी परदेशी गुंतवणूकदार भारताला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देत आहेत.”

नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यम व लघु श्रेणीतील उद्योगांसाठी सरकारने म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजना सादर केली. या योजनेचे अनावरण करण्यासाठी सीतारामन सोमवारी मुंबईत आल्या होत्या. या अनावरणादरम्यान काही उद्योजकांना हमीपत्र देऊन या योजनेचे अनावरण करण्यात आले.

क्रेडिट गॅरेन्टी योजनेची व्याप्ती वाढण्याचे संकेत

एखादी बँक बंद पडली किंवा आर्थिक संकटात आली की बँकेवर अनेक निर्बंध येतात. मात्र, डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरेन्टी या योजनेअंतर्गत पात्र ग्राहकांना बँकेतील ठेवीतून पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम प्राप्त होते. मात्र, पाच लाखांपेक्षा जास्त रक्कम या योजनेअंतर्गत देण्याचा विचार सरकार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यंत्रसामग्री खरेदीसाठी सह-तारणाची गरज नाही

या योजनेंतर्गत कारखान्याची यंत्रसामग्री, उपकरणे आदींच्या खरेदीसाठी १०० कोटी रुपयांपर्यंत सह-तारणाची (कोलॅटरल) आता गरज भासणार नाही. दरम्यान, यावेळी भाववाढीच्या मुद्द्यावर बोलताना त्या म्हणाल्या की, रिझर्व्ह बँकेच्या सहयोगाने सरकार या मुद्द्यावर प्राधान्याने काम करत असून, लवकरच भाववाढ आटोक्यात येईल.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन