शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

चीनच्या कपटनीतीमुळे भारत सतर्क, लडाखपासून अरुणाचलपर्यंत सीमेवर वाढवले लष्कर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 19:05 IST

एकीकडे चर्चा करत असताना चीनने पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आसपास आपले सैन्य कायम ठेवत कपटनीती सुरूच ठेवली आहे. त्यामुळे  भारताने देखील सतर्कता बाळगत आपले लष्कर कायम तैनात ठेवले आहे.

ठळक मुद्देसद्यस्थित चीनच्या फौजा लडाखपासून अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ उभ्या आहेतचीनच्या रणनीतीला प्रत्युत्तर म्हणून भारतानेदेखील आपले लष्कर लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या सीमेवर वाढवले आहेदोन्ही देशांमधील सीमाप्रश्न चिघळत असल्याने भारताने या भागात रिझर्व्ह फौजा पाठवल्या आहेत

नवी दिल्ली - एकीकडे कोरोनाचे गंभीर संकट उभे राहिले असताना दुसरीकडे भारत आणि चीनच्या सीमेवर सध्या प्रचंड तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे. दोन्ही देशांमध्ये सैनिकी पातळीवर चर्चा झाली असली तरी तणावाचे वातावरण कायम आहे. एकीकडे चर्चा करत असताना चीनने पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आसपास आपले सैन्य कायम ठेवत कपटनीती सुरूच ठेवली आहे. त्यामुळे  भारताने देखील सतर्कता बाळगत आपले लष्कर कायम तैनात ठेवले आहे.

सद्यस्थित चीनच्या फौजा लडाखपासून अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ उभ्या आहेत. त्यामुळे चीनच्या रणनीतीला प्रत्युत्तर म्हणून भारतानेदेखील आपले लष्कर लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या सीमेवर वाढवले आहे. तसेच दोन्ही देशांमधील सीमाप्रश्न चिघळत असल्याने भारताने या भागात रिझर्व्ह फौजा पाठवल्या आहेत.

दरम्यान, चीनने लडाखमध्ये ज्या प्रकारच्या चाली खेळल्या आहेत ते पाहता त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे सरकारमधील अतिविश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. चीनच्या मनात नेमकं काय चाललं आहे हेही संगता येणार नाही. त्यामुळे सद्यस्थिती पाहून लडाखमध्ये अतिरिक्त लष्कर तैनात करण्यात आले आहे. तसेच केवळ लडाखच नाही तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्येसुद्धा फौजेची तयारी पूर्ण झाली आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.  

हिमाचल प्रदेशमध्ये इंफंट्रीच्यी तीन डिव्हिजन आणि दोन अतिरिक्त ब्रिगेड तैनात करण्यात आल्या आहेत. तर उत्तराखंडमधील सीमावर्ती भागांमध्ये लष्कराच्या मदतीसाठी  चिन्यालिसोर येथे हवाई दलालासुद्धा सज्ज ठेवण्यात आले आहे.  सिक्कीममध्येसुद्धा चीनला लागून असलेल्या सीमेवर भारताकडून लष्कराची मोठ्या प्रमाणावर तैनाती करण्यात आली आहे. 

दरम्यान, चीनशी सीमेवरून मोठ्या प्रमाणात वाद असलेल्या अरुणाचल प्रदेशमध्येसुद्धा भारताने लष्कर तैनात केले आहे.   इथे ईस्टर्न सेक्टरमध्ये माऊंटेंन स्ट्राइक कोअरला कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, परिस्थिती अधिकच बिघडली तर त्याचा सामना करण्यासाठी लष्कराने सुकना येथील ३३ कोअर, तेजपूरचे ४ कोअर आणि रांची येथील १७ माऊंटेन स्ट्राइक कोअरला तैनात करण्यात आले आहे.

टॅग्स :IndiaभारतIndian Armyभारतीय जवानchinaचीन