शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

चीनच्या कपटनीतीमुळे भारत सतर्क, लडाखपासून अरुणाचलपर्यंत सीमेवर वाढवले लष्कर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 19:05 IST

एकीकडे चर्चा करत असताना चीनने पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आसपास आपले सैन्य कायम ठेवत कपटनीती सुरूच ठेवली आहे. त्यामुळे  भारताने देखील सतर्कता बाळगत आपले लष्कर कायम तैनात ठेवले आहे.

ठळक मुद्देसद्यस्थित चीनच्या फौजा लडाखपासून अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ उभ्या आहेतचीनच्या रणनीतीला प्रत्युत्तर म्हणून भारतानेदेखील आपले लष्कर लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या सीमेवर वाढवले आहेदोन्ही देशांमधील सीमाप्रश्न चिघळत असल्याने भारताने या भागात रिझर्व्ह फौजा पाठवल्या आहेत

नवी दिल्ली - एकीकडे कोरोनाचे गंभीर संकट उभे राहिले असताना दुसरीकडे भारत आणि चीनच्या सीमेवर सध्या प्रचंड तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे. दोन्ही देशांमध्ये सैनिकी पातळीवर चर्चा झाली असली तरी तणावाचे वातावरण कायम आहे. एकीकडे चर्चा करत असताना चीनने पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आसपास आपले सैन्य कायम ठेवत कपटनीती सुरूच ठेवली आहे. त्यामुळे  भारताने देखील सतर्कता बाळगत आपले लष्कर कायम तैनात ठेवले आहे.

सद्यस्थित चीनच्या फौजा लडाखपासून अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ उभ्या आहेत. त्यामुळे चीनच्या रणनीतीला प्रत्युत्तर म्हणून भारतानेदेखील आपले लष्कर लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या सीमेवर वाढवले आहे. तसेच दोन्ही देशांमधील सीमाप्रश्न चिघळत असल्याने भारताने या भागात रिझर्व्ह फौजा पाठवल्या आहेत.

दरम्यान, चीनने लडाखमध्ये ज्या प्रकारच्या चाली खेळल्या आहेत ते पाहता त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे सरकारमधील अतिविश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. चीनच्या मनात नेमकं काय चाललं आहे हेही संगता येणार नाही. त्यामुळे सद्यस्थिती पाहून लडाखमध्ये अतिरिक्त लष्कर तैनात करण्यात आले आहे. तसेच केवळ लडाखच नाही तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्येसुद्धा फौजेची तयारी पूर्ण झाली आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.  

हिमाचल प्रदेशमध्ये इंफंट्रीच्यी तीन डिव्हिजन आणि दोन अतिरिक्त ब्रिगेड तैनात करण्यात आल्या आहेत. तर उत्तराखंडमधील सीमावर्ती भागांमध्ये लष्कराच्या मदतीसाठी  चिन्यालिसोर येथे हवाई दलालासुद्धा सज्ज ठेवण्यात आले आहे.  सिक्कीममध्येसुद्धा चीनला लागून असलेल्या सीमेवर भारताकडून लष्कराची मोठ्या प्रमाणावर तैनाती करण्यात आली आहे. 

दरम्यान, चीनशी सीमेवरून मोठ्या प्रमाणात वाद असलेल्या अरुणाचल प्रदेशमध्येसुद्धा भारताने लष्कर तैनात केले आहे.   इथे ईस्टर्न सेक्टरमध्ये माऊंटेंन स्ट्राइक कोअरला कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, परिस्थिती अधिकच बिघडली तर त्याचा सामना करण्यासाठी लष्कराने सुकना येथील ३३ कोअर, तेजपूरचे ४ कोअर आणि रांची येथील १७ माऊंटेन स्ट्राइक कोअरला तैनात करण्यात आले आहे.

टॅग्स :IndiaभारतIndian Armyभारतीय जवानchinaचीन