शहरं
Join us  
Trending Stories
1
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
2
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
3
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
4
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
5
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
6
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
7
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
8
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
9
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
10
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
11
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
12
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
13
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
14
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
15
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
16
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
17
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
18
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
19
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
20
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 05:26 IST

पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरात येण्यास मनाई, पाकिस्तानातून केली जाणारी आयात येणार शून्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने दहशतवाद्यांना पोसणाऱ्या व आपल्या भूमीतून घातपाती कारवाया करणाऱ्या पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळल्या आहेत. पाकिस्तानातून कोणत्याही प्रकारच्या वस्तू आयात करण्यावर भारताने शनिवारी तत्काळ संपूर्ण बंदी लागू केली. पाकिस्तानबरोबर हवाई व जमीन मार्गाने सर्व प्रकारच्या टपाल व पार्सल देवाणघेवाण सेवा स्थगित केल्या. पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.

नव्या आदेशानुसार इतर देशांतून वळवून भारतात येणाऱ्या पाकिस्तानी वस्तूंच्या आयातीवरही पूर्णपणे बंदी घातली आहे. एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान भारताने पाकिस्तानला २७८६ कोटींचा  माल निर्यात केला, तर पाकिस्तानकडून  ३ कोटी ५५ लाख रुपये इतकी आयात झाली. विदेश व्यापार महासंचालनालयाने २ मे ला अधिसूचना प्रसिद्ध केली. त्यात स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानमधून कोणत्याही वस्तूंची आयात करण्यावर बंदी असेल.

पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील व्यापारात मोठी घटपुलवामा हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तानमधील व्यापारात मोठी घट झाली. भारताने पाकिस्तानचा ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ (एमएफएन) हा दर्जाही रद्द केला. २०११७-१८ मध्ये या दोन देशांत २० हजार कोटी रुपयांची व्यापारी उलाढाल होती.तर २०२३-२४ मध्ये ती ५४७३ कोटी रुपयांपर्यंत खाली घसरली. काश्मीरचा प्रश्न व सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया या मुद्द्यांमुळे भारत व पाकिस्तानमधील संबंध दीर्घकाळ तणावपूर्ण राहिले आहेत.

भारतीय सागरी हद्दीत पाकिस्तानी जहाजांना बंदीभारताच्या बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्रालयाने पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.भारतीय मालमत्ता, मालवाहतूक आणि बंदर पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्यासाठी व्यापारी शिपिंग कायदा, १९५८ च्या कलम ४११ अंतर्गत हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.सुरक्षा मजबूत करण्याच्या, भारताच्या सागरी हितसंबंधांचे सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हा आदेश पुढील सूचना मिळेपर्यंत लागू राहील. 

टपाल, पार्सल सेवा बंदपहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने शनिवारी पाकिस्तानबरोबर हवाई आणि जमीन मार्गाने सर्व प्रकारच्या टपाल आणि पार्सल देवाणघेवाण सेवा स्थगित केल्या. सेवा स्थगित करण्याचा आदेश दळणवळण मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या टपाल विभागाने जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्च संरक्षण अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत सांगितले की, दहशतवादी हल्ल्याला भारताच्या प्रत्युत्तराची पद्धत, लक्ष्य व वेळ ठरवण्याचे ‘पूर्ण अंमलबजावणी स्वातंत्र्य’ सशस्त्र दलांना आहे. 

पाकिस्तानला बसणार फटका : जीटीआरआयपाकिस्तानमधून होणारी आधीच खूपच कमी असलेली भारताची आयात म्हणजेच दरवर्षी फक्त ५ लाख अमेरिकन डॉलर्स आता शून्यावर येईल.पाकिस्तानच्या मीठ साठ्यातून काढले जाणारे हिमालयीन गुलाबी मीठ (सैंधव नमक) वगळता इतर कोणत्याही गोष्टीची भारतातील कोणालाही कमतरता जाणवणार नाही, असे ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह- ‘जीटीआरआय’चे संस्थापक अजय श्रीवास्तव यांनी सांगितले.श्रीवास्तव यांनी म्हटले आहे की, भारत पाकिस्तानी वस्तूंवर अवलंबून नाही, त्यामुळे आर्थिक परिणाम कमी आहे.  

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान