शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 05:26 IST

पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरात येण्यास मनाई, पाकिस्तानातून केली जाणारी आयात येणार शून्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने दहशतवाद्यांना पोसणाऱ्या व आपल्या भूमीतून घातपाती कारवाया करणाऱ्या पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळल्या आहेत. पाकिस्तानातून कोणत्याही प्रकारच्या वस्तू आयात करण्यावर भारताने शनिवारी तत्काळ संपूर्ण बंदी लागू केली. पाकिस्तानबरोबर हवाई व जमीन मार्गाने सर्व प्रकारच्या टपाल व पार्सल देवाणघेवाण सेवा स्थगित केल्या. पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.

नव्या आदेशानुसार इतर देशांतून वळवून भारतात येणाऱ्या पाकिस्तानी वस्तूंच्या आयातीवरही पूर्णपणे बंदी घातली आहे. एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान भारताने पाकिस्तानला २७८६ कोटींचा  माल निर्यात केला, तर पाकिस्तानकडून  ३ कोटी ५५ लाख रुपये इतकी आयात झाली. विदेश व्यापार महासंचालनालयाने २ मे ला अधिसूचना प्रसिद्ध केली. त्यात स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानमधून कोणत्याही वस्तूंची आयात करण्यावर बंदी असेल.

पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील व्यापारात मोठी घटपुलवामा हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तानमधील व्यापारात मोठी घट झाली. भारताने पाकिस्तानचा ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ (एमएफएन) हा दर्जाही रद्द केला. २०११७-१८ मध्ये या दोन देशांत २० हजार कोटी रुपयांची व्यापारी उलाढाल होती.तर २०२३-२४ मध्ये ती ५४७३ कोटी रुपयांपर्यंत खाली घसरली. काश्मीरचा प्रश्न व सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया या मुद्द्यांमुळे भारत व पाकिस्तानमधील संबंध दीर्घकाळ तणावपूर्ण राहिले आहेत.

भारतीय सागरी हद्दीत पाकिस्तानी जहाजांना बंदीभारताच्या बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्रालयाने पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.भारतीय मालमत्ता, मालवाहतूक आणि बंदर पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्यासाठी व्यापारी शिपिंग कायदा, १९५८ च्या कलम ४११ अंतर्गत हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.सुरक्षा मजबूत करण्याच्या, भारताच्या सागरी हितसंबंधांचे सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हा आदेश पुढील सूचना मिळेपर्यंत लागू राहील. 

टपाल, पार्सल सेवा बंदपहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने शनिवारी पाकिस्तानबरोबर हवाई आणि जमीन मार्गाने सर्व प्रकारच्या टपाल आणि पार्सल देवाणघेवाण सेवा स्थगित केल्या. सेवा स्थगित करण्याचा आदेश दळणवळण मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या टपाल विभागाने जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्च संरक्षण अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत सांगितले की, दहशतवादी हल्ल्याला भारताच्या प्रत्युत्तराची पद्धत, लक्ष्य व वेळ ठरवण्याचे ‘पूर्ण अंमलबजावणी स्वातंत्र्य’ सशस्त्र दलांना आहे. 

पाकिस्तानला बसणार फटका : जीटीआरआयपाकिस्तानमधून होणारी आधीच खूपच कमी असलेली भारताची आयात म्हणजेच दरवर्षी फक्त ५ लाख अमेरिकन डॉलर्स आता शून्यावर येईल.पाकिस्तानच्या मीठ साठ्यातून काढले जाणारे हिमालयीन गुलाबी मीठ (सैंधव नमक) वगळता इतर कोणत्याही गोष्टीची भारतातील कोणालाही कमतरता जाणवणार नाही, असे ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह- ‘जीटीआरआय’चे संस्थापक अजय श्रीवास्तव यांनी सांगितले.श्रीवास्तव यांनी म्हटले आहे की, भारत पाकिस्तानी वस्तूंवर अवलंबून नाही, त्यामुळे आर्थिक परिणाम कमी आहे.  

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान