शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
4
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
5
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
7
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
8
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
9
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
10
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
11
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
12
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
13
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
14
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
15
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
16
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
17
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
18
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
19
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
20
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
Daily Top 2Weekly Top 5

India: भारताचं नामकरण इंडिया कसं झालं? असा आहे इतिहास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 17:13 IST

India: केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांनी उभ्या केलेल्या आघाडीला INDIA असं नामकरण केल्याने इंडिया हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

 

केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांनी उभ्या केलेल्या आघाडीला INDIA असं नामकरण केल्याने इंडिया हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. याआधी २०२०मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिकासुद्धा दाखल करण्यात आली होती. यामध्ये घटनेमध्ये नोंद असलेलं देशाचं इंडिया इज भारत हे बदलून केवळ भारत करावं, अशी मागणी करण्यात आली होती. इंडिया हे नाव इंडिका या ग्रीक शब्दावरून आलं आहे. तसेच ते हटवलं पाहिजे, असा दावा करण्यात आला होता. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळली होती.

असं समजलं जातं की, इंग्रज किंवा इतर युरोपिय भाषा बोलणाऱ्यांना नेहमीच पूर्वेकडील देशांची नावे उच्चारण्यात अडचण येत असे. त्यामुळे ते आपल्या सोईनुसार नावांमध्ये बदल करत असत. तसेच हे युरोपियन प्रवासी जास्त फिरायचे. त्यामुळे त्यांनी दिलेली नावं अधिक प्रचलित झाली.

प्राचीन काळापासूनच भारत या देशाला अनेक नावांनी संबोधलं जात असे. त्यात जंबूद्वीप, भारतखंड, हिमवर्ष, अजनाभवर्ष, भारतवर्ष, आर्यावर्त, हिंद, हिंदुस्तान, भारत, इंडिया यांचा समावेश आहे. त्यात भारत हे नाव सर्वाधिक लोकप्रिय झालेलं आहे. मात्र भारताच्या नावावरही अनेक मतभेद आहेत. वेगवेगळ्या काळात इतिहासकारांनी आणि प्राचीन ग्रंथात याबाबत लिहिलं आहे. विष्णुपुराणामधील उल्लेखानुसार समुद्रेच्या उत्तरेपासून हिमालयाच्या दक्षिणेमध्ये जो देश आहे तोच भारत आहे आणि येथे राहणारे भारतीय. याचा अर्थ हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंतच्या भूमिला भरत म्हटलं जातं.

तसेच भारत हे नाव भरत या नावावरून पडलं. मात्र पौराणिक काळामध्ये भरत नावाचे अनेक महापुरुष होऊन गेले आहेत. महाभारतातील उल्लेखानुसार हस्तिनापूरचे राजे दुष्यंत आणि शकुंतला यांच्या पुत्राचं नाव भरत होतं. भरत चक्रवर्ती सम्राट होते. त्याच्या नावावरूनच या भूमीला भारतवर्ष हे नाव पडलं. संस्कृतमध्ये वर्ष याचा अर्थ परिसर असा होतो. तसेच बहुतांश इतिहासकार आणि भाषाशास्त्रज्ञांच्या मते यांच्याच नावावरून भारत हे नाव पडलं.

जेव्हा इंग्रज भारतात आले, तेव्हा या देशाला हिंदुस्तान म्हणून ओळखलं जात होतं. मात्र हिंदुस्तान म्हणणं ब्रिटिशांना जड जात होतं. त्याचवेळी ब्रिटिशांना लॅटिन भाषेत इंडिया म्हणतात हे समजलं. तेव्हा त्यांनीही या देशाला इंडिया असं संबोधित करण्यास सुरुवात केली. या मतप्रवाहाबाबतही अनेक विवाद आहे. मात्र बहुतांस आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताल इंडिया म्हणून संबोधले जात आहे.  

टॅग्स :Indiaभारतhistoryइतिहास