शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

India: भारताचं नामकरण इंडिया कसं झालं? असा आहे इतिहास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 17:13 IST

India: केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांनी उभ्या केलेल्या आघाडीला INDIA असं नामकरण केल्याने इंडिया हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

 

केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांनी उभ्या केलेल्या आघाडीला INDIA असं नामकरण केल्याने इंडिया हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. याआधी २०२०मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिकासुद्धा दाखल करण्यात आली होती. यामध्ये घटनेमध्ये नोंद असलेलं देशाचं इंडिया इज भारत हे बदलून केवळ भारत करावं, अशी मागणी करण्यात आली होती. इंडिया हे नाव इंडिका या ग्रीक शब्दावरून आलं आहे. तसेच ते हटवलं पाहिजे, असा दावा करण्यात आला होता. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळली होती.

असं समजलं जातं की, इंग्रज किंवा इतर युरोपिय भाषा बोलणाऱ्यांना नेहमीच पूर्वेकडील देशांची नावे उच्चारण्यात अडचण येत असे. त्यामुळे ते आपल्या सोईनुसार नावांमध्ये बदल करत असत. तसेच हे युरोपियन प्रवासी जास्त फिरायचे. त्यामुळे त्यांनी दिलेली नावं अधिक प्रचलित झाली.

प्राचीन काळापासूनच भारत या देशाला अनेक नावांनी संबोधलं जात असे. त्यात जंबूद्वीप, भारतखंड, हिमवर्ष, अजनाभवर्ष, भारतवर्ष, आर्यावर्त, हिंद, हिंदुस्तान, भारत, इंडिया यांचा समावेश आहे. त्यात भारत हे नाव सर्वाधिक लोकप्रिय झालेलं आहे. मात्र भारताच्या नावावरही अनेक मतभेद आहेत. वेगवेगळ्या काळात इतिहासकारांनी आणि प्राचीन ग्रंथात याबाबत लिहिलं आहे. विष्णुपुराणामधील उल्लेखानुसार समुद्रेच्या उत्तरेपासून हिमालयाच्या दक्षिणेमध्ये जो देश आहे तोच भारत आहे आणि येथे राहणारे भारतीय. याचा अर्थ हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंतच्या भूमिला भरत म्हटलं जातं.

तसेच भारत हे नाव भरत या नावावरून पडलं. मात्र पौराणिक काळामध्ये भरत नावाचे अनेक महापुरुष होऊन गेले आहेत. महाभारतातील उल्लेखानुसार हस्तिनापूरचे राजे दुष्यंत आणि शकुंतला यांच्या पुत्राचं नाव भरत होतं. भरत चक्रवर्ती सम्राट होते. त्याच्या नावावरूनच या भूमीला भारतवर्ष हे नाव पडलं. संस्कृतमध्ये वर्ष याचा अर्थ परिसर असा होतो. तसेच बहुतांश इतिहासकार आणि भाषाशास्त्रज्ञांच्या मते यांच्याच नावावरून भारत हे नाव पडलं.

जेव्हा इंग्रज भारतात आले, तेव्हा या देशाला हिंदुस्तान म्हणून ओळखलं जात होतं. मात्र हिंदुस्तान म्हणणं ब्रिटिशांना जड जात होतं. त्याचवेळी ब्रिटिशांना लॅटिन भाषेत इंडिया म्हणतात हे समजलं. तेव्हा त्यांनीही या देशाला इंडिया असं संबोधित करण्यास सुरुवात केली. या मतप्रवाहाबाबतही अनेक विवाद आहे. मात्र बहुतांस आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताल इंडिया म्हणून संबोधले जात आहे.  

टॅग्स :Indiaभारतhistoryइतिहास