शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

India: भारताचं नामकरण इंडिया कसं झालं? असा आहे इतिहास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 17:13 IST

India: केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांनी उभ्या केलेल्या आघाडीला INDIA असं नामकरण केल्याने इंडिया हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

 

केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांनी उभ्या केलेल्या आघाडीला INDIA असं नामकरण केल्याने इंडिया हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. याआधी २०२०मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिकासुद्धा दाखल करण्यात आली होती. यामध्ये घटनेमध्ये नोंद असलेलं देशाचं इंडिया इज भारत हे बदलून केवळ भारत करावं, अशी मागणी करण्यात आली होती. इंडिया हे नाव इंडिका या ग्रीक शब्दावरून आलं आहे. तसेच ते हटवलं पाहिजे, असा दावा करण्यात आला होता. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळली होती.

असं समजलं जातं की, इंग्रज किंवा इतर युरोपिय भाषा बोलणाऱ्यांना नेहमीच पूर्वेकडील देशांची नावे उच्चारण्यात अडचण येत असे. त्यामुळे ते आपल्या सोईनुसार नावांमध्ये बदल करत असत. तसेच हे युरोपियन प्रवासी जास्त फिरायचे. त्यामुळे त्यांनी दिलेली नावं अधिक प्रचलित झाली.

प्राचीन काळापासूनच भारत या देशाला अनेक नावांनी संबोधलं जात असे. त्यात जंबूद्वीप, भारतखंड, हिमवर्ष, अजनाभवर्ष, भारतवर्ष, आर्यावर्त, हिंद, हिंदुस्तान, भारत, इंडिया यांचा समावेश आहे. त्यात भारत हे नाव सर्वाधिक लोकप्रिय झालेलं आहे. मात्र भारताच्या नावावरही अनेक मतभेद आहेत. वेगवेगळ्या काळात इतिहासकारांनी आणि प्राचीन ग्रंथात याबाबत लिहिलं आहे. विष्णुपुराणामधील उल्लेखानुसार समुद्रेच्या उत्तरेपासून हिमालयाच्या दक्षिणेमध्ये जो देश आहे तोच भारत आहे आणि येथे राहणारे भारतीय. याचा अर्थ हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंतच्या भूमिला भरत म्हटलं जातं.

तसेच भारत हे नाव भरत या नावावरून पडलं. मात्र पौराणिक काळामध्ये भरत नावाचे अनेक महापुरुष होऊन गेले आहेत. महाभारतातील उल्लेखानुसार हस्तिनापूरचे राजे दुष्यंत आणि शकुंतला यांच्या पुत्राचं नाव भरत होतं. भरत चक्रवर्ती सम्राट होते. त्याच्या नावावरूनच या भूमीला भारतवर्ष हे नाव पडलं. संस्कृतमध्ये वर्ष याचा अर्थ परिसर असा होतो. तसेच बहुतांश इतिहासकार आणि भाषाशास्त्रज्ञांच्या मते यांच्याच नावावरून भारत हे नाव पडलं.

जेव्हा इंग्रज भारतात आले, तेव्हा या देशाला हिंदुस्तान म्हणून ओळखलं जात होतं. मात्र हिंदुस्तान म्हणणं ब्रिटिशांना जड जात होतं. त्याचवेळी ब्रिटिशांना लॅटिन भाषेत इंडिया म्हणतात हे समजलं. तेव्हा त्यांनीही या देशाला इंडिया असं संबोधित करण्यास सुरुवात केली. या मतप्रवाहाबाबतही अनेक विवाद आहे. मात्र बहुतांस आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताल इंडिया म्हणून संबोधले जात आहे.  

टॅग्स :Indiaभारतhistoryइतिहास