शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

India: भारताचं नामकरण इंडिया कसं झालं? असा आहे इतिहास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 17:13 IST

India: केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांनी उभ्या केलेल्या आघाडीला INDIA असं नामकरण केल्याने इंडिया हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

 

केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांनी उभ्या केलेल्या आघाडीला INDIA असं नामकरण केल्याने इंडिया हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. याआधी २०२०मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिकासुद्धा दाखल करण्यात आली होती. यामध्ये घटनेमध्ये नोंद असलेलं देशाचं इंडिया इज भारत हे बदलून केवळ भारत करावं, अशी मागणी करण्यात आली होती. इंडिया हे नाव इंडिका या ग्रीक शब्दावरून आलं आहे. तसेच ते हटवलं पाहिजे, असा दावा करण्यात आला होता. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळली होती.

असं समजलं जातं की, इंग्रज किंवा इतर युरोपिय भाषा बोलणाऱ्यांना नेहमीच पूर्वेकडील देशांची नावे उच्चारण्यात अडचण येत असे. त्यामुळे ते आपल्या सोईनुसार नावांमध्ये बदल करत असत. तसेच हे युरोपियन प्रवासी जास्त फिरायचे. त्यामुळे त्यांनी दिलेली नावं अधिक प्रचलित झाली.

प्राचीन काळापासूनच भारत या देशाला अनेक नावांनी संबोधलं जात असे. त्यात जंबूद्वीप, भारतखंड, हिमवर्ष, अजनाभवर्ष, भारतवर्ष, आर्यावर्त, हिंद, हिंदुस्तान, भारत, इंडिया यांचा समावेश आहे. त्यात भारत हे नाव सर्वाधिक लोकप्रिय झालेलं आहे. मात्र भारताच्या नावावरही अनेक मतभेद आहेत. वेगवेगळ्या काळात इतिहासकारांनी आणि प्राचीन ग्रंथात याबाबत लिहिलं आहे. विष्णुपुराणामधील उल्लेखानुसार समुद्रेच्या उत्तरेपासून हिमालयाच्या दक्षिणेमध्ये जो देश आहे तोच भारत आहे आणि येथे राहणारे भारतीय. याचा अर्थ हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंतच्या भूमिला भरत म्हटलं जातं.

तसेच भारत हे नाव भरत या नावावरून पडलं. मात्र पौराणिक काळामध्ये भरत नावाचे अनेक महापुरुष होऊन गेले आहेत. महाभारतातील उल्लेखानुसार हस्तिनापूरचे राजे दुष्यंत आणि शकुंतला यांच्या पुत्राचं नाव भरत होतं. भरत चक्रवर्ती सम्राट होते. त्याच्या नावावरूनच या भूमीला भारतवर्ष हे नाव पडलं. संस्कृतमध्ये वर्ष याचा अर्थ परिसर असा होतो. तसेच बहुतांश इतिहासकार आणि भाषाशास्त्रज्ञांच्या मते यांच्याच नावावरून भारत हे नाव पडलं.

जेव्हा इंग्रज भारतात आले, तेव्हा या देशाला हिंदुस्तान म्हणून ओळखलं जात होतं. मात्र हिंदुस्तान म्हणणं ब्रिटिशांना जड जात होतं. त्याचवेळी ब्रिटिशांना लॅटिन भाषेत इंडिया म्हणतात हे समजलं. तेव्हा त्यांनीही या देशाला इंडिया असं संबोधित करण्यास सुरुवात केली. या मतप्रवाहाबाबतही अनेक विवाद आहे. मात्र बहुतांस आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताल इंडिया म्हणून संबोधले जात आहे.  

टॅग्स :Indiaभारतhistoryइतिहास