चंद्रशेखर बर्वे
नवी दिल्ली :नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीची ११ वर्षे पूर्ण केली. योगायोग म्हणजे नुकतेच जपानला मागे टाकून भारत जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा झाली. ११ वर्षांच्या या काळात देशाने मोठी भरारी घेतली आहे.
नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतली होती. मोदी यांनी पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत केवळ विक्रमाची नोंदच केली नाही तर अनेक विक्रमही मोडून काढले आहेत. धाडसी निर्णय आणि दृढनिश्चयाच्या स्वाभावामुळे देशात सामाजिक समता, आर्थिक चैतन्य, सांस्कृतिक पुनरुज्जीवन आणि पाकिस्तान-आधारित दहशतवादाला पायाखाली तुडविण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
देशाला स्वच्छतेची लावली सवय
पंतप्रधान मोदी यांनी २ ऑक्टोबर २०१४ रोजी सुरू केलेली ‘भारत स्वच्छता मोहिम’ आता संरक्षण क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनविण्यापर्यंत येऊन पोहचली आहे.
मोदी सरकारने या काळात घेतलेले धडाकेबाज निर्णय
धोरणात्मक निर्णय : ३७० कलम हटवणे, जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा रद्द | तीन तलाक बंदी कायदा | सीएए लागू | जी-२०चे अध्यक्षपद भूषविले | महिला आरक्षण विधेयक | आयोध्येत भव्य राम मंदिराची उभारणी
अर्थव्यवस्था व योजना : जनधन योजना | जीएसटी लागू | पीएम किसान योजना | उज्ज्वला गॅस योजना | आयुष्यमान भारत योजना
सुरक्षा व संरक्षण : सर्जिकल स्ट्राईक (२०१६), एअर स्ट्राईक (२०१९), ऑपरेशन सिंदूर | भारतात संरक्षण साहित्याची निर्मिती वाढवणे | वन रँक वन पेन्शन
इन्फ्रास्ट्रक्चर व तंत्रज्ञान : डिजिटल इंडिया व मेक इन इंडिया | बुलेट ट्रेन प्रकल्पाची वेगाने निर्मिती सुरू | आत्मनिर्भर भारत मोहिम | यूपीआय | आधार लिंकिंग | स्कील इंडिया | स्टार्टअप इंडिया | अमृत भारत योजना
अशी पूर्ण केली हॅट्रिक
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. मात्र, तेलगू देसम पार्टी आणि जनता दल (यू) यांच्या पाठिंब्याने सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आले.
अशाप्रकारे नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान बनण्याची हॅट्रिक केली. लागोपाठ तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची त्यांनी ९ जून २०२४ रोजी शपथ घेतली.