शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

संयुक्त राष्ट्रात भारतानं काढली पाकिस्तानची खरडपट्टी; जगाला दाखवला 'दहशतवादी' चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 12:04 IST

आपल्यातील काही देश राजकीय अजेंडा डोळ्यासमोर ठेवून दहशतवादाला योग्य ठरवण्याचा प्रयत्न करतात हा दुर्दैवी प्रकार आहे असं भारताने म्हटलं. 

न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत दहशतवादावरूनभारतानंपाकिस्तानची खरडपट्टी काढली आहे. दहशतवाद हा जगासाठी धोकादायक आहे. जगातील सुरक्षेवर त्याचे मोठे आव्हान आहे. क्रॉस बॉर्डर नेटवर्कही त्यापैकी एक आहे. दहशतवाद्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून स्वत:ची ताकद वाढवली आहे. ते आज अत्याधुनिक हत्यारे वापरत आहेत. एकमेकांच्या साहाय्याने दहशतवादाला हरवलं जाऊ शकते असं सांगत भारतानेपाकिस्तानकडून दहशतवादाला मिळणाऱ्या खतपाणीवर कठोर भाष्य केले आहे.

भारताने पुढे म्हटलं की, दहशतवादाशी कसं लढायचं यावर जगात अद्याप एकमत होऊ शकत नाही. दहशतवादावर ९/११ च्या हल्ल्यानंतर जगाला जाग आली. नोव्हेंबर १९९६ साली भारताने पहिल्यांदा जागतिक दहशतवादावर एक व्यापक चर्चेसाठी पुढाकार घेतला होता. जवळपास याला ३० वर्ष झाली तरीही सहमती बनली नाही. जेव्हा जगाने दहशतवादाला गांभीर्याने घेतले नाही तेव्हापासून भारत सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाचा सामना करत आहे. मागील ३ दशकात भारतात हजारो लोक मारले गेलेत. २००८ साली मुंबईत दहशतवादी हल्ला झाला, २०१६ साली पठाणकोट एअरबेसजवळ स्फोट, २०१९ मध्ये पुलवामात आत्मघातकी हल्ला हे  त्यातील एक आहे. भारत झीरो टॉलरेंस दाखवून दहशतावादाशी लढेल असं सांगण्यात आले.

तसेच आपल्यातील काही देश राजकीय अजेंडा डोळ्यासमोर ठेवून दहशतवादाला योग्य ठरवण्याचा प्रयत्न करतात हा दुर्दैवी प्रकार आहे. अशा देशांमुळे दहशतवादाशी लढण्याच्या संकल्पाला धक्का पोहचतो. याच देशांमुळे १५ वर्षानंतरही २६/११ मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड आजही सरकारी सुविधेत वेगवेगळ्या देशात फिरतो. हे देश केवळ दहशतवादाला प्रोत्सहन देत नाही तर त्यांच्या सरकार आणि एजेन्सीकडून स्वत:साठी स्टेट पॉलिसी बनवतात असंही भारताने पाकिस्तानला नाव न घेता सुनावले आहे.

दरम्यान, आपल्या कुख्यात अजेंड्याकडे जगाचं लक्ष जावू नये यासाठी दिशाभूल करत हे देश स्वत: दहशतवादी पीडित असल्याचं जगाला दाखवून देत राहतात. संयुक्त राष्ट्राकडून प्रतिबंद असलेल्या दहशतवादी संघटना जशा लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद भारताच्या जमिनीवर हल्ले करत राहतात. त्याविरोधात मजबूत कायदेशीर कारवाई करण्याची आजची गरज आहे असंही भारताने संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत म्हटलं आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ