शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

'INDIA'ची स्थापना केली, पण ताळमेळ जुळेना, डावे म्हणाले आम्ही ममतां बॅनर्जींविरोधात लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 15:36 IST

Loksabha Election 2024: इंडिया या आघाडीच्या माध्यमातून तब्बल २६ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. मात्र परस्परविरोधी पक्षांचा समावेश असल्याने पहिल्या दिवसापासूनच या आघाडीमध्ये सूर जुळत नसल्याचे दिसत आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच भाजपाविरोधात एकत्रितपणे लढण्यासाठी इंडिया नावाने आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीच्या माध्यमातून तब्बल २६ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. मात्र परस्परविरोधी पक्षांचा समावेश असल्याने पहिल्या दिवसापासूनच या आघाडीमध्ये सूर जुळत नसल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार डाव्या पक्षांनी आपण पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींविरोधात लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. 

विरोधी पक्षांची बैठक बोलावण्यामध्ये आणि आघाडीला नवं नाव देण्यामध्ये काँग्रेस, नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. काल विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी सांगितले की, ही लढाई एनडीए आणि इंडिया यांच्यातील आहे. ही लढाई  नरेंद्र मोदी आणि इंडिया यांच्यातील आहे. ही लढाई भाजपाची विचारसरणी आणि इंडिया यांच्यातील आहे. ही लढाई देशासाठी आहे. त्यामुळे आम्ही इंडिया हे नाव निवडलं आहे. तर ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, एनडीए किंवा भाजपा भारतला आव्हान देऊ शकतात? आम्हाला इंडियाला वाचवायचं आहे. देशाला वाचवायचं आहे. भारत जिंकणार, इंडिया जिंकणार, देश जिंकणार, भाजपा हरणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. 

याबाबत सीपीआय (एम)चे नेते सीताराम येचुरी यांनी तृणमूल काँग्रेससोबत कुठलीही आघाडी करण्यास नकार दिला. त्यांनी सांगितले की, डावे पक्ष काँग्रेससह भाजपा आणि तृणमूल काँग्रेस या दोघांविरोधात लढतील. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेससोबत कुठलीही आघाडी केली जाणार नाही. इंडियाकडून पंतप्रधानपदासाठी सध्यातरी कुठलाही चेहरा निवडला जाणार नाही. आघाडीतील सदस्य इंडियामधील घटकपक्षांमध्ये असलेली प्रतिस्पर्धा कमी करण्याचा प्रयत्न करतील. तसेच आघाडी ही विशिष्ट्य राज्यासाठी असेल.

दरम्यान, गेल्या आठवड्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी बंगालमध्ये पुढील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि डावे पक्ष मिळून तृणमूल काँग्रेसविरोधात लढतील, अशी घोषणा केली होती.  

टॅग्स :Communist Party of India (markjhista)कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया (मार्क्झिस्ट)All India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसcongressकाँग्रेसwest bengalपश्चिम बंगाल