शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 10:49 IST

'ऑपरेशन सिंदूर'ने हे सिद्ध केले की, राफेल आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे भारताची युद्धनीती आजच्या युगात सर्वात प्रगत आणि अजिंक्य आहे.

पहलगामवरील क्रूर हल्ल्यानंतर भारताने दहशतवादाविरुद्ध 'ऑपरेशन सिंदूर' पुकारले. यावेळी, भारतीय शूरवीरांनी केवळ शत्रूचा खात्मा केला नाही, तर एका अशा चालीने पाकिस्तानला धडकी भरवली की, त्यांनी स्वतःच आपल्या पराक्रमाचे ढोल बडवत भारताचे राफेल विमान पाडल्याचा खोटा दावा केला. मात्र, सत्य तर राफेलच्या अदृश्य 'X-Guard डिकॉय सिस्टिम'मध्ये दडले होते, ज्याने पाकिस्तानच्या सर्व अत्याधुनिक रडार आणि मिसाइल यंत्रणांना अक्षरशः वेड लावले.

राफेलचे X-Guard सिस्टम कसे काम करते?X-Guard हे एक फायबर ऑप्टिक टो डिकॉय आहे, जे राफेलच्या इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिमचा एक भाग आहे. याचे मुख्य काम शत्रूच्या रडार-गाईडेड मिसाइल्स आणि जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या शस्त्रास्त्रांना दिशाभूल करणे हे आहे. हे डिकॉय शत्रूच्या रडारला राफेलचे खोटे लोकेशन देते आणि डॉपलर सिग्नल्सची तंतोतंत नक्कल करते.

हे फक्त २ सेकंदात सक्रिय होते आणि ३६० अंशांमध्ये ५००-वॉटचे जॅमिंग सिग्नल पाठवते. याची खासियत अशी आहे की, यामुळे शत्रूला असे वाटते की, त्यांनी खऱ्या राफेलला लक्ष्य केले आहे, पण प्रत्यक्षात ते डिकॉय असते.

भारताने पाकिस्तानला कसा दिला चकमा?माजी अमेरिकन फायटर पायलट रायन बोडेनहाइमर यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, हे मिशन आतापर्यंतची सर्वात उत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर डिकॉयिंग रणनीती होती. भारताने X-Guardच्या मदतीने पाकिस्तानचे 'जे-१० सी' फायटर जेट आणि 'पीएल १५ सी' मिसाइल्सला पूर्णपणे गोंधळात टाकले. पाकिस्तानच्या चिनी बनावटीच्या 'KLJ-7A AESA' रडारला हे ओळखता आले नाही की, त्यांनी खऱ्या विमानाला नाही, तर डिकॉयला लक्ष्य केले आहे. यामुळे पाकिस्तानने दावा केला की, त्यांनी एक भारतीय राफेल पाडले आहे, तर प्रत्यक्षात ते X-Guard होते.

डसॉल्ट आणि संरक्षण सचिवांचे काय म्हणणे आहे?डसॉल्ट एव्हिएशनचे चेअरमन एरिक ट्रॅपियर यांनी एका संरक्षण वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत कबूल केले की, भारताने एक राफेल विमान गमावले, परंतु याचे कारण तांत्रिक बिघाड होते. त्यावर शत्रूची कोणतीही कारवाई झालेली नाही. हे विमान १२००० मीटर उंचीवर एका लांब प्रशिक्षण मिशन दरम्यान क्रॅश झाले.

त्याच वेळी, भारताचे संरक्षण सचिव आर. के. सिंह यांनी स्पष्टपणे सांगितले की, पाकिस्तानने राफेल पाडल्याचा दावा खोटा आहे आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरमध्ये भारताच्या तंत्रज्ञानाने शत्रूला पूर्णपणे चकमा दिला.

चीनचा प्रॉपगंडाफ्रेंच मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनने आपल्या राजनैतिक नेटवर्कचा वापर करून राफेलची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला. राफेलची कामगिरी कमकुवत आहे, असे जगभरात चित्र निर्माण करण्याचा त्यांचा कुटिल डाव होता. मात्र, 'ऑपरेशन सिंदूर'ने हे सिद्ध केले की, राफेल आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे भारताची युद्धनीती आजच्या युगात सर्वात प्रगत आणि अजिंक्य आहे. या एका ऑपरेशनने जगाला दाखवून दिले की, भारताच्या ताकदीला कमी लेखणे शत्रूंना किती महागात पडू शकते.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तानRafale Dealराफेल डील