शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

कसा होणार भारत 'आयुष्यमान'?; देशात ६ लाख डॉक्टर, २० लाख नर्सेसची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 14:45 IST

देशातील आरोग्य व्यवस्थेचं भीषण वास्तव

वॉशिंग्टन: भारतात 6 लाख डॉक्टर आणि 20 लाख नर्सेसची कमतरता असल्याची आकडेवारी समोर आली आहे. याशिवाय योग्य प्रशिक्षण घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्यादेखील कमी आहे. सरकारनं आरोग्य क्षेत्रासाठी केलेली कमी तरतूद, न परवडणारी औषधं यामुळे भारतातील गरिबी वाढते, असं सेंटर फॉर डिजीज डायनामिक इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी (सीडीडीईपी) या अमेरिकन संस्थेनं आपल्या अहवालात म्हटलं आहे. भारतातील 65 टक्के आरोग्य सुविधा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या नाहीत. आरोग्य सेवांचा खर्च जास्त असल्यानं दरवर्षी 5 कोटी 70 लाख लोक दारिद्र्यरेषेखाली जातात, अशी आकडेवारी सीडीडीईपीच्या अहवालात आहे. जगभरात दरवर्षी 5 कोटी 7 लाख लोकांचा मृत्यू औषधांअभावी मृत्यू होतो. यातील बहुतांश मृत्यू हे मध्यम आणि अल्प उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात. सीडीडीईपीच्या संशोधकांनी युगांडा, भारत, जर्मनीमधील आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या मुलाखती घेऊन या संदर्भातला अहवाल तयार केला. मध्यम आणि अल्प उत्पन्न गटात येणाऱ्या देशातील आरोग्य सुविधा दुय्यम दर्जाच्या असल्याची बाब सीडीडीईपीच्या संशोधकांच्या लक्षात आली. याशिवाय या देशांमधील आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी वर्ग फारसा प्रशिक्षित नसल्याचंही त्यांच्या निदर्शनास आलं. भारतात डॉक्टरांचं प्रमाण अतिशय कमी आहे. देशात दर 10,189 व्यक्तींमागे  केवळ एक डॉक्टर उपलब्ध आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार दर 1000 व्यक्तींमागे 1 डॉक्टर उपलब्ध असायला हवा. मात्र भारतात तब्बल 6 लाख डॉक्टरांची कमतरता आहे. याशिवाय दर 483 व्यक्तींमागे एक नर्स उपलब्ध आहे. ही आकडेवारी लक्षात घेता भारतात 20 लाख नर्सेसची कमतरता आहे.   

टॅग्स :Healthआरोग्य