शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कसा होणार भारत 'आयुष्यमान'?; देशात ६ लाख डॉक्टर, २० लाख नर्सेसची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 14:45 IST

देशातील आरोग्य व्यवस्थेचं भीषण वास्तव

वॉशिंग्टन: भारतात 6 लाख डॉक्टर आणि 20 लाख नर्सेसची कमतरता असल्याची आकडेवारी समोर आली आहे. याशिवाय योग्य प्रशिक्षण घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्यादेखील कमी आहे. सरकारनं आरोग्य क्षेत्रासाठी केलेली कमी तरतूद, न परवडणारी औषधं यामुळे भारतातील गरिबी वाढते, असं सेंटर फॉर डिजीज डायनामिक इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी (सीडीडीईपी) या अमेरिकन संस्थेनं आपल्या अहवालात म्हटलं आहे. भारतातील 65 टक्के आरोग्य सुविधा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या नाहीत. आरोग्य सेवांचा खर्च जास्त असल्यानं दरवर्षी 5 कोटी 70 लाख लोक दारिद्र्यरेषेखाली जातात, अशी आकडेवारी सीडीडीईपीच्या अहवालात आहे. जगभरात दरवर्षी 5 कोटी 7 लाख लोकांचा मृत्यू औषधांअभावी मृत्यू होतो. यातील बहुतांश मृत्यू हे मध्यम आणि अल्प उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात. सीडीडीईपीच्या संशोधकांनी युगांडा, भारत, जर्मनीमधील आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या मुलाखती घेऊन या संदर्भातला अहवाल तयार केला. मध्यम आणि अल्प उत्पन्न गटात येणाऱ्या देशातील आरोग्य सुविधा दुय्यम दर्जाच्या असल्याची बाब सीडीडीईपीच्या संशोधकांच्या लक्षात आली. याशिवाय या देशांमधील आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी वर्ग फारसा प्रशिक्षित नसल्याचंही त्यांच्या निदर्शनास आलं. भारतात डॉक्टरांचं प्रमाण अतिशय कमी आहे. देशात दर 10,189 व्यक्तींमागे  केवळ एक डॉक्टर उपलब्ध आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार दर 1000 व्यक्तींमागे 1 डॉक्टर उपलब्ध असायला हवा. मात्र भारतात तब्बल 6 लाख डॉक्टरांची कमतरता आहे. याशिवाय दर 483 व्यक्तींमागे एक नर्स उपलब्ध आहे. ही आकडेवारी लक्षात घेता भारतात 20 लाख नर्सेसची कमतरता आहे.   

टॅग्स :Healthआरोग्य