शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 20:23 IST

India Extends Deadline For Pakistani Citizens: पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यासाठी ३० एप्रिल अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती, जी आता वाढवण्यात आली.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानी नागरिकांना मायदेशात परतण्याचा आदेश दिला. यासाठी ३० एप्रिल ही डेडलाइन निश्चित करण्यात आली. परंतु, वाघा-अटारी सीमेवर अडकलेल्या पाकिस्तानी नागरिकांच्या विनंतीनंतर डेडलाइनमध्ये बदल करण्यात आला. पुढील आदेश येईपर्यंत पाकिस्तानी नागरिक त्यांच्या देशात परतू शकतात, असे केंद्रीय गृह मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

केंद्रीय गृह मंत्रालयाने आपल्या आदेशात असे म्हटले आहे की, 'पाकिस्तानी नागरिक आता पुढील आदेश येईपर्यंत त्यांच्या देशात परतू शकतात. पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यासाठी ३० एप्रिल अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती, जी आता वाढवण्यात आली.  पुढील आदेश येईपर्यंत पाकिस्तानी नागरिक अटारी सीमेवरून त्यांच्या देशात परतू शकतात.'

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर कारवाई करत पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आणि त्यांना भारत सोडण्याचे आदेश दिले. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सहा दिवसांत एकूण ७८६ नागरिकांनी भारत सोडले, ज्यात ५५ राजदूर आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. पाकिस्तानी व्हिसावर भारतात आलेल्या ८ भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. सार्क व्हिसा धारकांसाठी भारत सोडण्याची शेवटची तारीख २६ एप्रिल होती. तर, मेडिकल व्हिसा धारकांसाठी शेवटची तारीख २९ एप्रिल होती.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून कोणताही पाकिस्तानी नागरिक भारतात राहता कामा नये, याची खात्री करण्याचे आदेश दिले. त्यानंतर केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी मुख्य सचिवांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ज्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले, त्यांना भारताबाहेर काढण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्ला