शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 20:23 IST

India Extends Deadline For Pakistani Citizens: पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यासाठी ३० एप्रिल अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती, जी आता वाढवण्यात आली.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानी नागरिकांना मायदेशात परतण्याचा आदेश दिला. यासाठी ३० एप्रिल ही डेडलाइन निश्चित करण्यात आली. परंतु, वाघा-अटारी सीमेवर अडकलेल्या पाकिस्तानी नागरिकांच्या विनंतीनंतर डेडलाइनमध्ये बदल करण्यात आला. पुढील आदेश येईपर्यंत पाकिस्तानी नागरिक त्यांच्या देशात परतू शकतात, असे केंद्रीय गृह मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

केंद्रीय गृह मंत्रालयाने आपल्या आदेशात असे म्हटले आहे की, 'पाकिस्तानी नागरिक आता पुढील आदेश येईपर्यंत त्यांच्या देशात परतू शकतात. पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यासाठी ३० एप्रिल अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती, जी आता वाढवण्यात आली.  पुढील आदेश येईपर्यंत पाकिस्तानी नागरिक अटारी सीमेवरून त्यांच्या देशात परतू शकतात.'

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर कारवाई करत पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आणि त्यांना भारत सोडण्याचे आदेश दिले. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सहा दिवसांत एकूण ७८६ नागरिकांनी भारत सोडले, ज्यात ५५ राजदूर आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. पाकिस्तानी व्हिसावर भारतात आलेल्या ८ भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. सार्क व्हिसा धारकांसाठी भारत सोडण्याची शेवटची तारीख २६ एप्रिल होती. तर, मेडिकल व्हिसा धारकांसाठी शेवटची तारीख २९ एप्रिल होती.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून कोणताही पाकिस्तानी नागरिक भारतात राहता कामा नये, याची खात्री करण्याचे आदेश दिले. त्यानंतर केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी मुख्य सचिवांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ज्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले, त्यांना भारताबाहेर काढण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्ला