शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
4
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
5
"ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
6
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
7
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
8
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
9
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
10
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
11
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
12
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
13
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
14
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
15
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
16
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
17
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
18
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
19
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
Daily Top 2Weekly Top 5

"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 18:28 IST

हिंदूंच्या सुरक्षेची जबाबदारी तुमचीच असल्याचे सांगत मयमनसिंह हत्येप्रकरणी भारताने बांगलादेशला खडसावले

MEA on Bangladesh Violence:बांगलादेशातील ढासळती कायदा-सुव्यवस्था आणि अल्पसंख्याक हिंदू समाजावर होणारे हल्ले यावर भारत सरकारने शुक्रवारी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. बांगलादेशच्या मयमनसिंह येथे दीपू चंद्र दास या हिंदू युवकाची करण्यात आलेली निर्घृण हत्या अत्यंत निंदनीय असल्याचे सांगत, भारत सरकारने बांगलादेशातील अंतरिम सरकारला या प्रकरणी तातडीने न्याय देण्याचे आवाहन केले आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना बांगलादेशचा भारत-विरोधी नॅरेटिव्ह पूर्णपणे फेटाळून लावला. "बांगलादेशातील हिंसाचाराच्या घटनांना केवळ मीडियाची अतिशयोक्ती किंवा राजकीय हिंसा म्हणून दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही," असे त्यांनी स्पष्टपणे सुनावले.

अल्पसंख्याकांवरील अत्याचाराची भीषण आकडेवारी

रणधीर जायसवाल यांनी यावेळी एका धक्कादायक आकडेवारीचा दाखला दिला. बांगलादेशातील अंतरिम सरकारच्या कार्यकाळात हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचाराच्या तब्बल २,९०० हून अधिक घटनांची नोंद विविध स्वतंत्र स्त्रोतांकडून झाली आहे. बांगलादेशात अल्पसंख्याकांविरुद्ध पसरलेली शत्रुत्वाची भावना आणि हिंसाचार हा केवळ चिंतेचा विषय नसून, तो गंभीर आंतरराष्ट्रीय प्रश्न बनत असल्याचे भारताने सांगितले.

बांगलादेश सरकारची ही जबाबदारी

भारताने बांगलादेशला स्पष्ट शब्दात बजावले आहे की, आपल्या देशात कायदा-सुव्यवस्था राखणे आणि अल्पसंख्याकांना सुरक्षा पुरवणे ही पूर्णपणे तेथील अंतरिम सरकारची जबाबदारी आहे. मयमनसिंह येथील हत्येतील दोषींना लवकरात लवकर न्यायच्या पिंजऱ्यात उभे केले जाईल, अशी अपेक्षा भारताने व्यक्त केली आहे.

लोकशाही आणि मैत्रीसाठी भारत वचनबद्ध

एकीकडे बांगलादेशच्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असतानाच, भारताने तेथील जनतेशी असलेले संबंध अधिक दृढ करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. "आम्ही बांगलादेशात शांतता आणि स्थैर्याचे समर्थक आहोत. बांगलादेशात स्वतंत्र, निष्पक्ष, सर्वसमावेशक आणि सहभागी निवडणुका व्हाव्यात, ही भारताची भूमिका कायम आहे," असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : India Warns Bangladesh on Minority Attacks, Cites 2,900+ Incidents

Web Summary : India expresses strong concern over attacks on minorities in Bangladesh. MEA cites 2,900+ incidents, urging justice after a Hindu youth's murder. India emphasizes Bangladesh's responsibility to protect minorities and maintain law, advocating for fair elections.
टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारत