शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सीरियातील ७७ भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 22:35 IST

बंडखोरांनी राजधानी दमास्कससह अनेक प्रमुख शहरांवर कब्जा केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. 

सीरियातील अंतर्गत युद्धात बंडखोर गटाची सरशी झाल्याने राष्ट्राध्यक्ष बशर अल असद हे देश सोडून पळून गेले आहेत. यानंतर बंडखोरांनी सीरियाची राजधानी दमास्कससह सीरियावर ताबा मिळवला आहे. अशा परिस्थितीत भारताने सीरियामधून आपल्या सर्व नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. बंडखोरांनी राजधानी दमास्कससह अनेक प्रमुख शहरांवर कब्जा केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. 

यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी माहिती दिली. यावेळी, सीरियामध्ये असलेल्या ज्या भारतीय नागरिकांना भारतात परतायचे होते. अशा नागरिकांना आम्ही सुरक्षितपणे बाहेर काढले आहे,  आतापर्यंत ७७ भारतीयांना सीरियातून बाहेर काढण्यात आले आहे, असे रणधीर जयस्वाल यांनी सांगितले.

भारतीय दूतावासाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सीरियाच्या सीमेवर पोहोचवले, त्यानंतर लेबनॉनमधील भारतीय मिशनने त्यांचे स्वागत केले आणि त्यांना इमिग्रेशनमध्ये मदत केली, असे रणधीर जयस्वाल म्हणाले. तसेच, आम्ही लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली आणि त्यांना भारतात परत पाठवण्याची सर्व व्यवस्थाही केली. बहुतांश नागरिक भारतात परतले आहेत, तर बाकीचे आज ना उद्या पोहोचतील, असे रणधीर जयस्वाल यांनी सांगितले.

सीरियाच्या तीर्थयात्रेला गेलेले ४४ यात्रेकरू गुरुवारी बेरूतहून निघाले आहेत. ते आता परिसरातील इतर धार्मिक स्थळांच्या भेटीवर आहे. दमास्कसमधील भारतीय दूतावास अजूनही सक्रिय असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असेही रणधीर जयस्वाल म्हणाले. दरम्यान, सीरियातील सध्याची परिस्थिती पाहता भारताने शांतता आणि सर्वसमावेशक राजनीतीचे आवाहन केले आहे.

याचबरोबर, आम्ही सीरियातील घडामोडींवर सतत लक्ष ठेवून आहोत. आम्ही सर्व पक्षांना सीरियाची एकता, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता राखण्यासाठी काम करण्याचे आवाहन करतो, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच, भारताने सीरियातील सर्व वर्गांच्या आकांक्षांचा आदर करून शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक सीरियाच्या नेतृत्वाखालील राजकीय प्रक्रियेच्या गरजेवर भर दिला आहे. 

टॅग्स :SyriaसीरियाIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय