शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
4
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
5
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
6
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
7
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
8
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
9
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
10
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
11
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
12
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
13
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
14
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
16
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
17
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
18
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
19
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
20
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
Daily Top 2Weekly Top 5

सीरियातील ७७ भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 22:35 IST

बंडखोरांनी राजधानी दमास्कससह अनेक प्रमुख शहरांवर कब्जा केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. 

सीरियातील अंतर्गत युद्धात बंडखोर गटाची सरशी झाल्याने राष्ट्राध्यक्ष बशर अल असद हे देश सोडून पळून गेले आहेत. यानंतर बंडखोरांनी सीरियाची राजधानी दमास्कससह सीरियावर ताबा मिळवला आहे. अशा परिस्थितीत भारताने सीरियामधून आपल्या सर्व नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. बंडखोरांनी राजधानी दमास्कससह अनेक प्रमुख शहरांवर कब्जा केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. 

यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी माहिती दिली. यावेळी, सीरियामध्ये असलेल्या ज्या भारतीय नागरिकांना भारतात परतायचे होते. अशा नागरिकांना आम्ही सुरक्षितपणे बाहेर काढले आहे,  आतापर्यंत ७७ भारतीयांना सीरियातून बाहेर काढण्यात आले आहे, असे रणधीर जयस्वाल यांनी सांगितले.

भारतीय दूतावासाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सीरियाच्या सीमेवर पोहोचवले, त्यानंतर लेबनॉनमधील भारतीय मिशनने त्यांचे स्वागत केले आणि त्यांना इमिग्रेशनमध्ये मदत केली, असे रणधीर जयस्वाल म्हणाले. तसेच, आम्ही लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली आणि त्यांना भारतात परत पाठवण्याची सर्व व्यवस्थाही केली. बहुतांश नागरिक भारतात परतले आहेत, तर बाकीचे आज ना उद्या पोहोचतील, असे रणधीर जयस्वाल यांनी सांगितले.

सीरियाच्या तीर्थयात्रेला गेलेले ४४ यात्रेकरू गुरुवारी बेरूतहून निघाले आहेत. ते आता परिसरातील इतर धार्मिक स्थळांच्या भेटीवर आहे. दमास्कसमधील भारतीय दूतावास अजूनही सक्रिय असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असेही रणधीर जयस्वाल म्हणाले. दरम्यान, सीरियातील सध्याची परिस्थिती पाहता भारताने शांतता आणि सर्वसमावेशक राजनीतीचे आवाहन केले आहे.

याचबरोबर, आम्ही सीरियातील घडामोडींवर सतत लक्ष ठेवून आहोत. आम्ही सर्व पक्षांना सीरियाची एकता, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता राखण्यासाठी काम करण्याचे आवाहन करतो, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच, भारताने सीरियातील सर्व वर्गांच्या आकांक्षांचा आदर करून शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक सीरियाच्या नेतृत्वाखालील राजकीय प्रक्रियेच्या गरजेवर भर दिला आहे. 

टॅग्स :SyriaसीरियाIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय