शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

पाकिस्तान नव्हे टेररिस्तान, संयुक्त राष्ट्रांत भारताचं पाकिस्तानला सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 12:57 IST

संयुक्त राष्ट्रांत (UN) वारंवार काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणा-या पाकिस्तानला भारताने चोख उत्तर दिलं आहे. राइट टू रिप्लाय अंतर्गत देण्यात आलेल्या उत्तरात भारताने पाकिस्तानचा 'टेररिस्तान' असा उल्लेख केला आहे.

ठळक मुद्देसंयुक्त राष्ट्रांत (UN) वारंवार काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणा-या पाकिस्तानला भारताने चोख उत्तर दिलं राइट टू रिप्लाय अंतर्गत देण्यात आलेल्या उत्तरात भारताने पाकिस्तानचा 'टेररिस्तान' असा उल्लेख केला'ज्या देशाने ओसामा बिन लादेन आणि मुल्ला उमरसारख्या दहशतवाद्यांना आश्रय दिला, तो देश स्वत:ला पीडित म्हणवण्याचं धाडस करत आहे'

जिनीवा, दि. 22 - संयुक्त राष्ट्रांत (UN) वारंवार काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणा-या पाकिस्तानला भारताने चोख उत्तर दिलं आहे. राइट टू रिप्लाय अंतर्गत देण्यात आलेल्या उत्तरात भारताने पाकिस्तानचा 'टेररिस्तान' असा उल्लेख केला आहे. याआधी बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद अब्बासी यांनी पुन्हा एकदा काश्मीर मुद्याचा राग आळवला. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्राकडे काश्मीरमध्ये एक विशेष दूत तैनात करण्याची मागणी केली आहे. ही मागणी करताना त्यांनी असाही कांगावा केला आहे की, काश्मीर लोकांचा संघर्ष भारताकडून मोडीत काढण्यात येत आहे. शिवाय, भारताकडून पाकिस्तानात दहशतवादी कारवायाही चालवण्यात येतात, असा आरोपही यावेळी अब्बासी यांनी केला. 

भारताकडून राजदूत एनम गंभीर यांनी मोर्चा सांभाळला. त्या बोलल्या आहेत की, 'टेररिस्तान बनलेल्या पाकिस्तानमध्ये दहशतवाद फैलावत असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याचा प्रभाव पडत आहे. पाकिस्तानची पवित्र जमीन मिळवण्याच्या नादात पाकिस्तान दहशतवादाची पवित्र जमीन झाली आहे. आपल्या छोट्याश्या इतिहासात पाकिस्तान दहशतवादासाठी पर्याय ठरला आहे'. यापुढे बोलताना एनम गंभीर यांना पाकिस्तानला सुनावलं की, 'ज्या देशाने ओसामा बिन लादेन आणि मुल्ला उमरसारख्या दहशतवाद्यांना आश्रय दिला, तो देश स्वत:ला पीडित म्हणवण्याचं धाडस करत आहे'.

काश्मीर मुद्यावर बोलतानाही एनम गंभीर यांनी पाकिस्तानवर पुन्हा एकदा हल्ला चढवला. 'जम्मू काश्मीर नेहमी भारताचा अविभाज्य घटक असेल हे पाकिस्तानने लक्षात ठेवलं पाहिजे. पाकिस्तानने दहशतवादाला कितीही खतपाणी घातलं, तरी भारताच्या अखंडतेला धक्का लावण्यात त्यांना यश मिळणार नाही', असं एनम गंभीर बोलल्या आहेत. 

पाकिस्ताच्या जमिनीवर दहशतवाद्यांना मिळणा-या आश्रयावर बोलताना एनम गंभीर बोलल्या की, 'ज्या पाकिस्तानात दहशतवादी बिनधास्तपणे रस्त्यांवर फिरताना दिसतात, त्यांना आम्ही भारताच्या मानवाधिकारावर सल्ला देताना आम्ही पाहिलं आहे'. पुढे बोलताना एनम गंभीर यांनी सांगितलं की, 'देशाला लोकशाही आणि मानवाधिकारावर अशा देशाकडून शिकवण घेण्याची गरज नाही, ज्याला अपयशी देश म्हणून ओळखलं जातं'.

कोण आहेत एनम गंभीर ?एनम यांनी ट्विटरवर आपण भारतीय राजदूत असून दिल्लीमध्ये राहत असल्याची माहिती दिली आहे. फेसबूकवर त्यांनी आपण भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे कर्मचारी असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ जिनीवामधून शिक्षण पुर्ण केलं आहे. सध्या त्या न्यूयॉर्कमध्ये राहतात. त्या 2005 बॅचमधील आयएफएसच्या (इंडियन फॉरेन सर्व्हिसेस) अधिकारी आहेत. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवानTerrorismदहशतवाद