शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

अरबी समुद्रात पाकिस्तान नौदलाचा युद्ध सराव; काही अघटित घडल्यास भारत उत्तर देण्यास सज्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 09:53 IST

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढलेला आहे.

नवी दिल्ली - अरबी समुद्रात पाकिस्तानच्या नौदलाकडून युद्ध सराव सुरु आहे. मात्र पाकिस्तानच्या युद्ध सरावावर भारताने करडी नजर ठेवली आहे. पुढील काही पाकिस्तानी नौदल अरबी समुद्रात रॉकेट आणि मिसाइल फायरिंग करत युद्ध सराव करणार आहे. पाकिस्तानच्या युद्धासरावामुळे भारताने सतर्क राहण्याची भूमिका घेतली आहे. भारताने काही युद्धनौका, पाणबुडी, पेट्रोलिंग करणारी विमाने यांच्यासह काही लढाऊ विमानंही याठिकाणी तैनात केली आहेत. 

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढलेला आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील नेते एकमेकांविरोधात युद्धाची भाषा बोलू लागलेत. तसेच अण्वस्त्र हल्ल्याचीही धमकी दोन्ही देशांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तान करत असलेल्या या युद्ध सरावाने भारत सतर्क झाला आहे. 

सुरक्षा यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी पाकिस्ताच्या युद्ध सरावावर भारताने लक्ष ठेवलं होतं. जर युद्धसरावाच्या आडून पाकिस्तानने नापाक हरकत केली तर भारतीय नौदल आणि जवान सशस्त्र तैनात ठेवण्यात आले आहेत. कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानकडून आणि त्यांच्या दहशतवाद्यांकडून हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. पाकिस्तानचा युद्धसराव नेहमीप्रमाणे होत असला तरी अचानक त्यांचे उदिष्ट बदलू शकते असा दावा केला जात आहे. 

29 सप्टेंबरपर्यंत चालणार पाकिस्तानचा युद्धसरावपाकिस्तानने अरबी समुद्राच्या उत्तरेकडे जाणाऱ्या मालवाहू जहाजांना मेरिटाइम अलर्ट जारी केला आहे. 25 सप्टेंबर ते 29 सप्टेंबरपर्यंत लाइव्ह मिसाइल, रॉकेट, बंदूक याचा वापर केला जाणार आहे. जर युद्ध सरावाच्या दरम्यान पाकिस्तानच्या हालचालींवर भारत नजर ठेवणार आहे. जर काही संशयास्पद आढळल्यास भारताने पाकिस्तानला चोख उत्तर देण्याची तयारी ठेवली आहे. भारतीय नौदल आणि हवाई दल पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यासाठी सज्ज आहेत. 

भारतीय हवाई दलाने पुलवामा हल्ल्यानंतर एअरस्ट्राइक करत पाकिस्तानच्या बालकोट भागात जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा बालकोट भागात दहशतवादी तळ सक्रीय झाल्याची माहिती लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानindian navyभारतीय नौदल