शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

अरबी समुद्रात पाकिस्तान नौदलाचा युद्ध सराव; काही अघटित घडल्यास भारत उत्तर देण्यास सज्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 09:53 IST

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढलेला आहे.

नवी दिल्ली - अरबी समुद्रात पाकिस्तानच्या नौदलाकडून युद्ध सराव सुरु आहे. मात्र पाकिस्तानच्या युद्ध सरावावर भारताने करडी नजर ठेवली आहे. पुढील काही पाकिस्तानी नौदल अरबी समुद्रात रॉकेट आणि मिसाइल फायरिंग करत युद्ध सराव करणार आहे. पाकिस्तानच्या युद्धासरावामुळे भारताने सतर्क राहण्याची भूमिका घेतली आहे. भारताने काही युद्धनौका, पाणबुडी, पेट्रोलिंग करणारी विमाने यांच्यासह काही लढाऊ विमानंही याठिकाणी तैनात केली आहेत. 

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढलेला आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील नेते एकमेकांविरोधात युद्धाची भाषा बोलू लागलेत. तसेच अण्वस्त्र हल्ल्याचीही धमकी दोन्ही देशांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तान करत असलेल्या या युद्ध सरावाने भारत सतर्क झाला आहे. 

सुरक्षा यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी पाकिस्ताच्या युद्ध सरावावर भारताने लक्ष ठेवलं होतं. जर युद्धसरावाच्या आडून पाकिस्तानने नापाक हरकत केली तर भारतीय नौदल आणि जवान सशस्त्र तैनात ठेवण्यात आले आहेत. कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानकडून आणि त्यांच्या दहशतवाद्यांकडून हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. पाकिस्तानचा युद्धसराव नेहमीप्रमाणे होत असला तरी अचानक त्यांचे उदिष्ट बदलू शकते असा दावा केला जात आहे. 

29 सप्टेंबरपर्यंत चालणार पाकिस्तानचा युद्धसरावपाकिस्तानने अरबी समुद्राच्या उत्तरेकडे जाणाऱ्या मालवाहू जहाजांना मेरिटाइम अलर्ट जारी केला आहे. 25 सप्टेंबर ते 29 सप्टेंबरपर्यंत लाइव्ह मिसाइल, रॉकेट, बंदूक याचा वापर केला जाणार आहे. जर युद्ध सरावाच्या दरम्यान पाकिस्तानच्या हालचालींवर भारत नजर ठेवणार आहे. जर काही संशयास्पद आढळल्यास भारताने पाकिस्तानला चोख उत्तर देण्याची तयारी ठेवली आहे. भारतीय नौदल आणि हवाई दल पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यासाठी सज्ज आहेत. 

भारतीय हवाई दलाने पुलवामा हल्ल्यानंतर एअरस्ट्राइक करत पाकिस्तानच्या बालकोट भागात जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा बालकोट भागात दहशतवादी तळ सक्रीय झाल्याची माहिती लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानindian navyभारतीय नौदल