शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

चीन सीमेवर भारत राफेल तैनात करणार?; चर्चेसोबत भारताकडून युद्धसज्जताही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 06:22 IST

नी ड्रॅगनवर भारताला नाही विश्वास; सीमेवर गस्त वाढविली

नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात सध्या शांततापूर्ण बोलणी सुरू असली तरी चिनी ड्रॅगनवर भारताला विश्वास नाही. महिनाअखेर संरक्षण ताफ्यात दाखल होणारी राफेल विमाने त्यामुळेच चीन सीमेवर तैनात करण्यावर भारतीय हवाई दलात सध्या चर्चा सुरू आहे. गेल्या महिनाभरापेक्षाही जास्त काळापासून भारत-चीनमध्ये हिंसक झटापटीनंतर बोलणी सुरू आहे. दोन्ही देश तणाव कमी करणे, सीमेवरून सैन्य मागे हटविण्याच्या बाजूने असले तरी भारताने सीमेवर आपल्या हद्दीत गस्त वाढवली आहे.

दिल्ली व बीजिंगमध्ये राजनैतिक चर्चा, सीमेवर लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू असताना भारताने मात्र सीमा सुरक्षेची तयारी सुरू केली आहे. एकीकडे आम्ही चर्चेला तयार आहोत, असे दाखवून युद्धसज्जताही सुरू असल्याचा संदेश त्यामुळे जाईल. विशेष म्हणजे दोन्ही देशांकडून अद्याप कोणतीही तीव्र प्रतिक्रिया येत नसली तरी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या सूचक विधानामुळे चीन अस्वस्थ आहे. (चीनशी) चर्चा सुरू असली तरी त्यातून तोडगा निघेलच असे नाही; पण भारताच्या एक इंच जमिनीचा तुकड्यावरही कुणी कब्जा करू शकत नाही, असे राजनाथ सिंह यांनी ठणकावले होते.

भारताने रशिया, जर्मनीकडून तातडीने शस्त्रात्रे खरेदी करणार असल्याचे वृत्त २८ जून रोजी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. फ्रान्सकडूनही भारताने अत्यंत घातक शस्त्रास्त्रे खरेदी केली आहेत. त्यातील राफेल जेटची सीमेवर संख्या वाढविण्यावर संरक्षण मंत्रालयात चर्चा सुरू आहे. तसे केल्यास चीनची काय प्रतिक्रिया येईल, याचीही चाचपणी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय करीत आहे. येत्या २२ जुलै रोजी हवाई दलप्रमुख आरकेएस भदोरिया यांच्या नेतृत्वात कमांडर स्तरावरील सातही अधिकाºयांमध्ये २ दिवस चर्चा होणार आहे. पाकिस्तान व चीन सीमेवर हवाई संरक्षण सज्जता वाढविण्यावर त्यात भर असेल.

भारत-चीनमध्ये लष्करी स्तरावरील चर्चा सुरूच

भारत चीनमध्ये लष्करी स्तरावरील चर्चा याही आठवड्यात सुरू राहील. दोन्ही देशांचे प्रतिनिधी त्यात सहभागी होतील. सीमेवर चर्चा सुरू असताना दोन्ही देशांनी राजनैतिक संबंध पूर्ववत करण्यासाठी एक-एक पाऊल पुढे टाकले आहे. चिनी दूतावास, चिनी परराष्ट्र मंत्रालयाने भारत-चीनसंबंधांचा अभ्यास असणारे प्राध्यापक, पत्रकार, अभ्यासकांसाठी वेबिनार आयोजित केला, तर बीजिंगमध्ये भारतीय दूतावासानेही दोन्ही देशांचा अभ्यास असणाºयांना राजदूतांसमवेत चर्चेसाठी निमंत्रित केले होते.

विशेष म्हणजे दोन्ही देशांमधील या व्हर्च्यूअल संवादाचा भर व्यापारवृद्धीवरच होता. राफेल जेटची सीमेवर संख्या वाढविण्यावर चर्चा सुरू आहे. तसे केल्यास चीनची काय प्रतिक्रिया येईल, याचीही चाचपणी मंत्रालय करीत आहे.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन