शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शकक्तिशाली सॅटेलाईट
3
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
4
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
5
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
6
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
7
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
8
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
9
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
10
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
11
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
12
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
13
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
14
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
15
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
16
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
17
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
18
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
19
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम
20
कामगाराच्या खात्यात चुकून आले ₹८७,०००००, त्याने बोनस म्हणून उडवले, बॉसवर आली डोक्यावर हात मारण्याची वेळ 

Ladakh Standoff: भारत-चीनमधील 'हा' वाद मिटणार का? आज लष्करी अधिकाऱ्यांची बैठक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 07:54 IST

या बैठकीकडे दोन्ही देशांव्यतिरिक्त जगातील शक्तिशाली देशांचे लक्ष आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की, हा वाद मिटणार का?

ठळक मुद्देभारत आणि चीन यांच्यातील हा वाद मिटविण्यासाठी स्थानिक कमांडर, प्रतिनिधीमंडळ आणि सर्वोच्च कमांडर स्तरावर जवळपास १२ वेळा चर्चा झाली आहे. मात्र, अद्याप यावर कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही.

नवी दिल्ली : पूर्व लडाखमधीलभारत आणि चीन यांच्यातील सीमा वादावर शनिवारी दोन्ही देशांच्या लेफ्टनंट जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पातळीवर बैठक होणार आहे.

या बैठकीत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (Line of Actual Control - LAC)  तणाव मिटविण्यासाठी भारताचे लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग आणि चीनीचे मेजर जनरल लियू लिन मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. भारत-चीन सीमेजवळील चुशुल मोल्डो येथे ही बैठक ९ वाजता होणार आहे. दोन्ही देशांव्यतिरिक्त जगातील शक्तिशाली देशांचे लक्ष या बैठकीकडे आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की, हा वाद मिटणार का?

भारत आणि चीन यांच्यातील हा वाद मिटविण्यासाठी स्थानिक कमांडर, प्रतिनिधीमंडळ आणि सर्वोच्च कमांडर स्तरावर जवळपास १२ वेळा चर्चा झाली आहे. मात्र, अद्याप यावर कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. हा वाद संपण्याची आशा अजूनही कायम आहे, कारण शुक्रवारी पहिल्यांदाच दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांमध्ये चर्चा झाली. संयुक्त सचिव स्तरावर झालेल्या या चर्चेत दोन्ही देशांनी एकमेकांच्या भावनांचा आदर करून वाद मिटवण्यावर भर दिल्याचे समजते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा बैठकीपूर्वी लेखी स्वरुपात अजेंडा शेअर केला जातो. या अजेंड्यावर बैठकीत चर्चा केली जाते आणि त्याखेरीज कोणत्याही पक्षाला अन्य कोणताही मुद्दा उपस्थित करायचा असेल तर ते बोलू शकतात. आज होणाऱ्या या बैठकीत गलवान परिसर, पँगोग त्सो आणि गोगरा परिसर यावर चर्चा होणार आहे. तसेच, या बैठकीतील सर्वात महत्वाचा मुद्दा पांगोग त्सो भागाचा असणार आहे. याठिकाणी चीनचे सैनिक फिंगर-4 वर आले आहेत, तर दोन्ही देशांमधील करारानुसार सैनिक ग्रे झोनमध्ये (जिथे भारत आणि चीन दोघेही दावा करतात) गस्त घालू शकतात, परंतु तेथे काहीही नाही तेथे सैनिक तैनात शकत नाही किंवा तेथे तंबूही बांधू शकत नाहीत.

दरम्यान, पूर्व लडाखमध्ये मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच हा वाद सुरू आहे. लडाखने एलएसीवर रस्ता बांधकाम करण्याचे काम सुरु केले होते. त्याला चीनने विरोध केला. यानंतर 5 मे रोजी पँगोंग तलावावर दोन्ही देशांचे सैनिक आपापसात भिडले. या चकमकीत काही सैनिकही जखमी झाले. यानंतर चीनने या भागात आपल्या सैनिकांची तुकडी वाढविली. तसेच, चीनने सैन्य तैनात करण्याबरोबरच त्यांनी तंबूही बांधले. भारतीय लष्कराच्या जवानांनी एलएसीवरील चीनच्या या कारवाईला चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय जवानही एलएसी सीमेवर तैनात राहिले. मात्र, गेल्या दोन दिवसांपूर्वी चीनचे सैनिक सीमेपासून दोन किलोमीटर मागे हटले आहेत. तर भारतीय लष्कराचे जवान आपल्या जागेपासून एक किलोमीटर मागे हटले आहेत, असे सांगण्यात येते.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतladakhलडाख