शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

'हा 1962चा भारत नाही, चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल'- फारुख अब्दुल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 19:27 IST

India China Tension: अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव कायम आहे.

Farooq Abdullah On China: अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव कायम आहे. यादरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे (NC) अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले फारुख अब्दुल्ला यांनी चीनला प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, 'हा 1962 चा भारत नाही, आम्ही बांगड्या घातल्या नाहीत. चीनला त्याच्याच भाषेत उत्तर दिले जाईल.'

9 डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये चिनी आणि भारतीय लष्करामध्ये हिंसक चकमक झाली होती. ज्यामध्ये दोन्ही देशांच्या सैन्याला किरकोळ दुखापत झाल्याची चर्चा होती. चकमकीनंतर भारत आणि चीनच्या कमांडर्सची फ्लॅग मीटिंग झाली आणि त्यानंतर दोन्ही देशांचे सैनिक मागे हटले. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला हे नेहमीच भारताच्या चीन आणि पाकिस्तानसोबत चर्चेचे समर्थन करतात. यावेळी त्यांनी चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचे समर्थन केले. 

यापूर्वी चीनशी चर्चेचे समर्थन केलेमाजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी तवांगमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवर चीनशी चर्चा केली पाहिजे असे म्हटले होते. त्याचबरोबर शेजारील पाकिस्तानशी संबंध सुधारण्याची वकिली केली. शेजाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होईपर्यंत भारतात शांतता कधीच पाहायला मिळणार नाही, असे ते म्हणाले होते. पण, यावेळी फारुख अब्दुल्ला यांचा चीनबाबतचा सूर बदलला आहे. चीनच्या कारवाईवर निशाणा साधत त्यांनी चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यास सांगितले आहे. 

भारत-चीन LAC वादLAC वर भारत आणि चीनमध्ये एकूण 23 ठिकाणी वाद आहे, त्यापैकी 13 प्रमुख ठिकाण आहेत. लडाख क्षेत्रातील 7 विवादित क्षेत्रांपैकी 5 भागात चीन सामरिकदृष्ट्या कमकुवत आहे. याशिवाय 6 वादग्रस्त क्षेत्रे पूर्वेकडील सेक्टरमध्ये आहेत. 1962 मध्ये भारत-चीन युद्धानंतर चिनी सैन्य उंच ठिकाणी परतले होते. गेल्या वर्षी लडाखमधील 5 वादग्रस्त भागात बफर झोन तयार करण्यात आला होता. त्यामुळे बफर झोनमध्ये गस्त नसल्याने एलएसीची स्थिती एलओसीसारखी झाली आहे.

 

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाindia china faceoffभारत-चीन तणाव