शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'हा 1962चा भारत नाही, चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल'- फारुख अब्दुल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 19:27 IST

India China Tension: अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव कायम आहे.

Farooq Abdullah On China: अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव कायम आहे. यादरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे (NC) अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले फारुख अब्दुल्ला यांनी चीनला प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, 'हा 1962 चा भारत नाही, आम्ही बांगड्या घातल्या नाहीत. चीनला त्याच्याच भाषेत उत्तर दिले जाईल.'

9 डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये चिनी आणि भारतीय लष्करामध्ये हिंसक चकमक झाली होती. ज्यामध्ये दोन्ही देशांच्या सैन्याला किरकोळ दुखापत झाल्याची चर्चा होती. चकमकीनंतर भारत आणि चीनच्या कमांडर्सची फ्लॅग मीटिंग झाली आणि त्यानंतर दोन्ही देशांचे सैनिक मागे हटले. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला हे नेहमीच भारताच्या चीन आणि पाकिस्तानसोबत चर्चेचे समर्थन करतात. यावेळी त्यांनी चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचे समर्थन केले. 

यापूर्वी चीनशी चर्चेचे समर्थन केलेमाजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी तवांगमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवर चीनशी चर्चा केली पाहिजे असे म्हटले होते. त्याचबरोबर शेजारील पाकिस्तानशी संबंध सुधारण्याची वकिली केली. शेजाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होईपर्यंत भारतात शांतता कधीच पाहायला मिळणार नाही, असे ते म्हणाले होते. पण, यावेळी फारुख अब्दुल्ला यांचा चीनबाबतचा सूर बदलला आहे. चीनच्या कारवाईवर निशाणा साधत त्यांनी चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यास सांगितले आहे. 

भारत-चीन LAC वादLAC वर भारत आणि चीनमध्ये एकूण 23 ठिकाणी वाद आहे, त्यापैकी 13 प्रमुख ठिकाण आहेत. लडाख क्षेत्रातील 7 विवादित क्षेत्रांपैकी 5 भागात चीन सामरिकदृष्ट्या कमकुवत आहे. याशिवाय 6 वादग्रस्त क्षेत्रे पूर्वेकडील सेक्टरमध्ये आहेत. 1962 मध्ये भारत-चीन युद्धानंतर चिनी सैन्य उंच ठिकाणी परतले होते. गेल्या वर्षी लडाखमधील 5 वादग्रस्त भागात बफर झोन तयार करण्यात आला होता. त्यामुळे बफर झोनमध्ये गस्त नसल्याने एलएसीची स्थिती एलओसीसारखी झाली आहे.

 

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाindia china faceoffभारत-चीन तणाव