शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
7
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
8
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
9
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
10
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
11
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
12
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
13
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
14
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
15
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
16
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
17
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
18
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
19
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
20
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?

अक्साई चीन आता परत घेण्याची वेळ आली आहे - जामयांग नामग्याल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 15:42 IST

जामयांग नामग्याल यांनी गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देचीनने भारताच्या पाठीत एकदा नाही तर वारंवार खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला आहे, असे जामयांग नामग्याल म्हणाले.

नवी दिल्ली : पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत- चीन सैनिकांदरम्यान झालेल्या हिंसक संघर्षानंतर सीमेवर तणाव वाढला असून चीनविरोधात संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. यातच आता भाजपाचे लडाखचे खासदार जामयांग नामग्याल यांनी 'अक्साई चीन'बाबत सूचक विधान केले आहे. 

आता चीनकडून अक्साई चीनचा भाग परत मिळविण्याची वेळ आली आहे, असे जामयांग नामग्याल यांनी सांगितले. तसेच, हा 2020 मधील भारत आहे, 1962 सालचा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतात ते करून दाखवितात, असेही जामयांग नामग्याल यांनी म्हटले आहे.

भारत आणि चीन यांच्यातील सीमावादाचे समाधान फक्त लडाखच्या नागरिकांना नाही तर संपूर्ण भारताला हवे आहे. जवानांना गमावणं आणि सीमेजवळ राहणाऱ्या नागरिकांच्या सामान्य जीवनावर परिणाम आम्हाला नको आहे. या समस्येवर कायमचा उपाय सर्वांना हवा आहे. चीनने भारताच्या पाठीत एकदा नाही तर वारंवार खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला आहे, असे जामयांग नामग्याल म्हणाले.

अक्साई चीन हा भारताचा भूभाग आहे. ज्याला चीनने ताब्यात घेतले आहे. हा भाग परत मिळविण्याची आता वेळ आली आहे. हे कठीण आहे, मात्र अशक्य सुद्धा नाही, असेही जामयांग नामग्याल यांनी म्हटले आहे. यावेळी जामयांग नामग्याल यांनी गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे सांगितले.

दरम्यान, भारत आणि चीन यांच्यात गेल्या सोमवारी झालेल्या हिंसक धुमश्चक्रीमध्ये चीनचे 43 हून सैनिक मारले गेले आहेत. तर भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. चीनच्या सैनिकांनी भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांच्याच अंगलट आला आहे. या घटनेनंतर सीमेवरील तणाव वाढला असून चीनविरोधात संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे आता लडाख सीमेजवळच नाही तर संपूर्ण सीमेवर जवान सतर्क आहेत.  

आणखी बातम्या...

आकाशात दिसला रहस्यमय असा पांढरा फुगा; लोक म्हणाले, 'एलियन शिप'

Encounters In Jammu & Kashmir: सुरक्षा दलांना मोठं यश, जम्मू-काश्मीरमध्ये 8 दहशतवाद्यांना कंठस्नान 

India China FaceOff : शहीद जवानांच्या प्रत्येक कुटुंबाला 36 लाख रुपये आणि नोकरी मिळणार, बिहार सरकारचा निर्णय

निधड्या छातीच्या मनदीप सिंग यांनी 'अशी' दिली चिनी सैन्याला टक्कर; भावानं सांगितली त्यांच्या शौर्याची कहाणी 

देमचोक, पेंगाँग भागातील गावे खाली करण्याचे लष्काराचे आदेश, सूत्रांची माहिती

कॉल आला अन् सांगितले, "तुम्ही अमनचे वडील आहात? तुमचा मुलगा देशासाठी शहीद झाला"

टॅग्स :ladakhलडाख