शहरं
Join us  
Trending Stories
1
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
2
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
3
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
4
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
5
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
6
Nashik Leopard: बिबट्याची नाशिक पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालय आवारातच एन्ट्री, सीसीटीव्हीमध्ये दिसला
7
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
8
आता परत सलमानवर जोक करणार का? पापाराझीच्या प्रश्नावर प्रणित मोरेने हातच जोडले; म्हणाला...
9
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
10
पाकिस्तान हेरगिरी नेटवर्क: गुरुग्राम कोर्टातील वकील नय्यूमला अटक, हवाला कनेक्शनचा संशय!
11
U19 Asia Cup 2025 : वैभव सूर्यवंशीचा धमाका! सिक्सर मारत स्टाईलमध्ये साजरी केली फिफ्टी
12
खळबळजनक! ३ वर्षे इंजिनिअरने केले रुग्णांवर उपचार; भावोजींची डिग्री, पण औषधं द्यायचा मेहुणा
13
‘शेतात जाणाऱ्या महिलाही सुरक्षित नाहीत’, पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर हजारो जोडप्यांचे व्हिडीओ बनल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट
14
नगराध्यक्ष ते राज्यपाल! कसा होता शिवराज पाटील चाकूरकरांचा प्रवास; तब्बल ७ वेळा बनले खासदार
15
उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
16
Flipperachi Net Worth: धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
17
Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी,  पर्यायी मार्ग कोणते?
18
"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
19
मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ
20
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
Daily Top 2Weekly Top 5

अक्साई चीन आता परत घेण्याची वेळ आली आहे - जामयांग नामग्याल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 15:42 IST

जामयांग नामग्याल यांनी गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देचीनने भारताच्या पाठीत एकदा नाही तर वारंवार खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला आहे, असे जामयांग नामग्याल म्हणाले.

नवी दिल्ली : पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत- चीन सैनिकांदरम्यान झालेल्या हिंसक संघर्षानंतर सीमेवर तणाव वाढला असून चीनविरोधात संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. यातच आता भाजपाचे लडाखचे खासदार जामयांग नामग्याल यांनी 'अक्साई चीन'बाबत सूचक विधान केले आहे. 

आता चीनकडून अक्साई चीनचा भाग परत मिळविण्याची वेळ आली आहे, असे जामयांग नामग्याल यांनी सांगितले. तसेच, हा 2020 मधील भारत आहे, 1962 सालचा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतात ते करून दाखवितात, असेही जामयांग नामग्याल यांनी म्हटले आहे.

भारत आणि चीन यांच्यातील सीमावादाचे समाधान फक्त लडाखच्या नागरिकांना नाही तर संपूर्ण भारताला हवे आहे. जवानांना गमावणं आणि सीमेजवळ राहणाऱ्या नागरिकांच्या सामान्य जीवनावर परिणाम आम्हाला नको आहे. या समस्येवर कायमचा उपाय सर्वांना हवा आहे. चीनने भारताच्या पाठीत एकदा नाही तर वारंवार खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला आहे, असे जामयांग नामग्याल म्हणाले.

अक्साई चीन हा भारताचा भूभाग आहे. ज्याला चीनने ताब्यात घेतले आहे. हा भाग परत मिळविण्याची आता वेळ आली आहे. हे कठीण आहे, मात्र अशक्य सुद्धा नाही, असेही जामयांग नामग्याल यांनी म्हटले आहे. यावेळी जामयांग नामग्याल यांनी गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे सांगितले.

दरम्यान, भारत आणि चीन यांच्यात गेल्या सोमवारी झालेल्या हिंसक धुमश्चक्रीमध्ये चीनचे 43 हून सैनिक मारले गेले आहेत. तर भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. चीनच्या सैनिकांनी भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांच्याच अंगलट आला आहे. या घटनेनंतर सीमेवरील तणाव वाढला असून चीनविरोधात संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे आता लडाख सीमेजवळच नाही तर संपूर्ण सीमेवर जवान सतर्क आहेत.  

आणखी बातम्या...

आकाशात दिसला रहस्यमय असा पांढरा फुगा; लोक म्हणाले, 'एलियन शिप'

Encounters In Jammu & Kashmir: सुरक्षा दलांना मोठं यश, जम्मू-काश्मीरमध्ये 8 दहशतवाद्यांना कंठस्नान 

India China FaceOff : शहीद जवानांच्या प्रत्येक कुटुंबाला 36 लाख रुपये आणि नोकरी मिळणार, बिहार सरकारचा निर्णय

निधड्या छातीच्या मनदीप सिंग यांनी 'अशी' दिली चिनी सैन्याला टक्कर; भावानं सांगितली त्यांच्या शौर्याची कहाणी 

देमचोक, पेंगाँग भागातील गावे खाली करण्याचे लष्काराचे आदेश, सूत्रांची माहिती

कॉल आला अन् सांगितले, "तुम्ही अमनचे वडील आहात? तुमचा मुलगा देशासाठी शहीद झाला"

टॅग्स :ladakhलडाख