शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्याचा शरद पवारांकडून समाचार; आंतरराष्ट्रीय कराराची दिली शिकवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 19:42 IST

भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे

ठळक मुद्देवीरांना निशस्त्र धोक्याच्या दिशेने कुणी आणि का पाठवले, याला कोण जबाबदार आहे?काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला सवाल सोनिया गांधींच्या उपस्थित राहुल गांधींच्या विधानावर पवारांनी व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली – गलवान खोऱ्यात झालेल्या चीन आणि भारतीय सैनिकांमधील झटापटीत देशाचे २० जवान शहीद झाले. चीनच्या या कुरापतीमुळे देशात चीनविरोधात संतापाची लाट आहे. भारताने जवानांच्या बलिदानाचा बदला घ्यावा अशी मागणी देशातील नागरिक करत आहे. अनेक ठिकाणी लोकांनी चीनच्या राष्ट्रपतींचे पुतळे जाळून निषेध केला तर चीनच्या वस्तूंबाबत बॉयकॉट चीन हा ट्रेंडही सुरु करण्यात आला आहे.

भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत सोनिया गांधी, शरद पवार, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत. एकीकडे चीनने भारताचे बंधक बनवलेले १० सैनिकांची सुटका केली आहे. तर दुसरीकडे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताच्या कोणत्याही सैनिकाला बंदी बनवलं नाही असं सांगितले आहे.

भारत आणि चीन यांच्यातील मेजर जनरल स्तरीय बैठक पुन्हा सुरु झाली आहे. ही बैठक चीनने भारताच्या १० सैनिकांची सुटका केल्यानंतर सुरु केली आहे. भारताच्या दबावामुळे चीनने हे सैनिक सोडल्याचं सांगण्यात येत आहे. पंतप्रधानांच्या सर्वपक्षीय बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, सैनिकांनी हत्यार वापरलं की नाही याचा निर्णय आंतरराष्ट्रीय कराराशी होता आणि अशा संवेदनशील प्रकरणाचा सन्मान करण्याची गरज आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आरोप करत सैनिकांना नि:शस्त्र का पाठवण्यात आलं असा आरोप केला होता. त्यावर शरद पवारांनी सर्वपक्षीय बैठकीत भाष्य केले आहे. देशाचे संरक्षण मंत्री राहिलेले शरद पवारांनी सांगितले की, सैनिक कधी, केव्हा हत्यार सोबत ठेवणार आणि कुठे नाही हे आंतरराष्ट्रीय करारानुसार निश्चित झालं आहे. अशा संवेदनशील मुद्द्यावर बोलताना आपल्या सावधता बाळगली पाहिजे असं त्यांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत शरद पवारांनी हे वक्तव्य केले.

काय म्हणाले राहुल गांधी?

आता हे सिद्ध झाले आहे, की चीनने गलवानमध्ये जो हल्ला केला तो आधीपासूनच नोयोजित होता. भारत सरकार यावेळी झोप घेत होते आणि समस्यांकडे दुर्लक्ष करत होते. चीनने भारताच्या निशस्र सैनिकांची हत्या करून एक मोठा अपराध केला आहे. माझा प्रश्न आहे की, या वीरांना निशस्त्र धोक्याच्या दिशेने कुणी आणि का पाठवले, याला कोण जबाबदार आहे? असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला होता.

जवानांना धोक्याच्या दिशेने निशस्त्र कुणी आणि का पाठवले, राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल

 

टॅग्स :IndiaभारतchinaचीनRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदी