शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

India China FaceOff: राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्याचा शरद पवारांकडून समाचार; आंतरराष्ट्रीय कराराची दिली शिकवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 19:42 IST

भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे

ठळक मुद्देवीरांना निशस्त्र धोक्याच्या दिशेने कुणी आणि का पाठवले, याला कोण जबाबदार आहे?काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला सवाल सोनिया गांधींच्या उपस्थित राहुल गांधींच्या विधानावर पवारांनी व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली – गलवान खोऱ्यात झालेल्या चीन आणि भारतीय सैनिकांमधील झटापटीत देशाचे २० जवान शहीद झाले. चीनच्या या कुरापतीमुळे देशात चीनविरोधात संतापाची लाट आहे. भारताने जवानांच्या बलिदानाचा बदला घ्यावा अशी मागणी देशातील नागरिक करत आहे. अनेक ठिकाणी लोकांनी चीनच्या राष्ट्रपतींचे पुतळे जाळून निषेध केला तर चीनच्या वस्तूंबाबत बॉयकॉट चीन हा ट्रेंडही सुरु करण्यात आला आहे.

भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत सोनिया गांधी, शरद पवार, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत. एकीकडे चीनने भारताचे बंधक बनवलेले १० सैनिकांची सुटका केली आहे. तर दुसरीकडे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताच्या कोणत्याही सैनिकाला बंदी बनवलं नाही असं सांगितले आहे.

भारत आणि चीन यांच्यातील मेजर जनरल स्तरीय बैठक पुन्हा सुरु झाली आहे. ही बैठक चीनने भारताच्या १० सैनिकांची सुटका केल्यानंतर सुरु केली आहे. भारताच्या दबावामुळे चीनने हे सैनिक सोडल्याचं सांगण्यात येत आहे. पंतप्रधानांच्या सर्वपक्षीय बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, सैनिकांनी हत्यार वापरलं की नाही याचा निर्णय आंतरराष्ट्रीय कराराशी होता आणि अशा संवेदनशील प्रकरणाचा सन्मान करण्याची गरज आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आरोप करत सैनिकांना नि:शस्त्र का पाठवण्यात आलं असा आरोप केला होता. त्यावर शरद पवारांनी सर्वपक्षीय बैठकीत भाष्य केले आहे. देशाचे संरक्षण मंत्री राहिलेले शरद पवारांनी सांगितले की, सैनिक कधी, केव्हा हत्यार सोबत ठेवणार आणि कुठे नाही हे आंतरराष्ट्रीय करारानुसार निश्चित झालं आहे. अशा संवेदनशील मुद्द्यावर बोलताना आपल्या सावधता बाळगली पाहिजे असं त्यांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत शरद पवारांनी हे वक्तव्य केले.

काय म्हणाले राहुल गांधी?

आता हे सिद्ध झाले आहे, की चीनने गलवानमध्ये जो हल्ला केला तो आधीपासूनच नोयोजित होता. भारत सरकार यावेळी झोप घेत होते आणि समस्यांकडे दुर्लक्ष करत होते. चीनने भारताच्या निशस्र सैनिकांची हत्या करून एक मोठा अपराध केला आहे. माझा प्रश्न आहे की, या वीरांना निशस्त्र धोक्याच्या दिशेने कुणी आणि का पाठवले, याला कोण जबाबदार आहे? असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला होता.

जवानांना धोक्याच्या दिशेने निशस्त्र कुणी आणि का पाठवले, राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल

 

टॅग्स :IndiaभारतchinaचीनRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदी