शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

'सीमेवरील शांतता आणि स्थैर्य, हीच भारत-चीन संबंधातील पहिली अट', जयशंकर थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 16:49 IST

India China Relations: भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आझ लोकसभेत भारत-चीन संबंधांवर महत्वाची प्रतिक्रिया दिली.

India China Relations: काही दिवसांपूर्वीच भारत आणि चीन यांच्यात सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक करार झाला. यानंतर दोन्ही देशांनी आपापले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली. आता या मुद्द्यावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी (03 डिसेंबर 2024) लोकसभेत महत्वाची माहिती दिली. सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एप्रिल 2020 पासून परिस्थिती असामान्य राहिली आहे. पण, आता राजनैतिक पुढाकारांमुळे परिस्थिती सुधारली असून, ही अशीच कायम ठेवण्यासाठी दोन्ही देशांनी पुढाकार घेतल्याची माहिती जयशंकर यांनी दिली.

परराष्ट्र मंत्री पुढे म्हणाले की, सध्या एलएसीवरील परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली झाली आहे. भारत आणि चीन यांच्यातील चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर दोन्ही बाजूंनी या स्थितीत कोणताही एकतर्फी बदल केला जाणार नाही, यावर सहमती दर्शवली आहे. LAC वर शांतता प्रस्थापित करण्याचे सर्व श्रेय भारतीय लष्कराला जाते. सीमेवर स्थैर्य राखण्यात आपल्या सैनिकांच्या निर्धाराने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचेही जयशंकर यांनी म्हटले.

सीमेवर शांततेचे महत्त्वसीमेवरील शांतता आणि स्थैर्य ही भारत-चीन संबंधांची पूर्वअट आहे, यावर परराष्ट्र मंत्र्यांनी भर दिला. सीमा व्यवस्थापनाबाबत भारत आणि चीनमध्ये झालेल्या जुन्या करारांची अंमलबजावणी केली जात आहे. सीमेवरील परिस्थितीमध्ये कोणताही गडबड होणार नाही, यावर दोन्ही देशांनी एकमत केले आहे. दोन्ही देश संवाद आणि सहमतीच्या आधारेच सर्व प्रश्न सोडवतील.

भारत-चीन संबंधांवर काय परिणाम होईल?सीमेवर परिस्थिती सामान्य झाल्यानंतरच भारत आणि चीन यांच्यात द्विपक्षीय चर्चा शक्य होईल, असेही परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले. सीमावादामुळे भारत आणि चीनमधील व्यापार आणि सामरिक भागीदारीवर परिणाम झाला आहे. दोन्ही देश आशियातील प्रमुख आर्थिक शक्ती आहेत, परंतु त्यांच्यातील तणावाचा परिणाम जागतिक पुरवठा साखळीवरही होतो. केवळ भारत आणि चीनच्याच नव्हे तर संपूर्ण प्रदेशाच्या स्थैर्यासाठी सीमा विवादाचे निराकरण महत्त्वाचे आहे. हा वाद मिटला तर आशिया खंडातील चिरस्थायी शांततेच्या दिशेने एक

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतchinaचीनlok sabhaलोकसभा