शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
2
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
3
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
4
“शरद पवारांना भारतरत्न पुरस्कार द्यावा”; राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या खासदाराचे समर्थन
5
Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड
6
मेस्सीला पाहण्यासाठी इतकं महागडं तिकीट, राज्यपाल संतापले; राज्य सरकारकडून मागवला रिपोर्ट
7
पहिल्याच दिवशी ७३% भरला 'हा' IPO; ग्रे मार्केट दाखवतोय ₹२५५ चा फायदा, पाहा कोणता आहे आयपीओ?
8
वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली; संजय राऊतांचा वार, विजय वडेट्टीवारांचा पलटवार
9
Hero चा धमाका! ४ ते १० वर्षीय मुलांसाठी लॉन्च केली नवी E-Bike; किंमत पाहून थक्क व्हाल
10
Lionel Messi: फुटबॉलचा 'GOAT' मेस्सीच्या ७० फूट उंच पुतळ्याचे व्हर्च्युअल अनावरण
11
भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा मॅच फिक्सिंगचं थैमान, या चार खेळांडूंना केलं, सस्पेंड, FIRही दाखल
12
Messi India Tour: १०० कोटींचे जेट, १०० कोटींचे घर... लियोनेल मेस्सीची नेटवर्थ किती? फुटबॉलचा जादूगार भारताच्या दौऱ्यावर
13
अरेरे! इन्स्टावरचं प्रेम पडलं महागात; बॉयफ्रेंडशी लग्न करण्यासाठी दिल्लीहून रायबरेलीला आली पण...
14
'धुरंधर'मधल्या या अभिनेत्रीला लूक्सवरुन ऐकावे लागलेले टोमणे, नाक आणि दात बदलण्याचा मिळालेला सल्ला
15
आलिशान घर, राईस मिल, पेट्रोल पंप... अधिकाऱ्याकडे सापडलं ४० लाखांसह कोट्यवधींचं घबाड
16
पुढील ३ वर्षांत २ IPO आणण्याची रिलायन्सची तयारी; पाहा काय आहे मुकेश अंबानींचा प्लॅन
17
"मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट
18
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
19
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
20
८५ लाख मतदारांच्या वडिलांच्या नावात गडबड, १३ लाख जणांचे आई-वडील एकच, बंगालमधील SIR मधून धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: सीमेवरील तणाव वाढला! आता चर्चेला चीनची तयारी, रशिया करणार मध्यस्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 06:24 IST

चीनने कुरापती काढण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना जशास तसे उत्तर द्यायचे ठरविले आहे.

नवी दिल्ली : चीनच्या ४५ सैनिकांना कंठस्नान घातल्यानंतरही चीनची खुमखुमी उतरली नसून, त्या देशाने सीमेवर लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत लष्कर तैनात करायला सुरुवात केली आहे. भारतानेही लडाख, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड व हिमाचल प्रदेशात हवाई दल व लष्कराचे जवान सज्ज ठेवले असून, चीनने कुरापती काढण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना जशास तसे उत्तर द्यायचे ठरविले आहे.लष्करी पातळीवरील चर्चेबरोबरच चीनने राजनैतिक पातळीवरील चर्चेस तयार असल्याचे म्हटले आहे.भारतही चर्चेसाठी तयार असून, घुसखोरी मागे घ्यावी, ही भारताची अट आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर मंगळवारी रशिया, चीन व भारत यांच्यात होणाऱ्या व्हर्च्युअल त्रिपक्षीय चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. आधी या चर्चेत सहभागी न होण्याचे भारताने ठरविले होते. पण रशियाच्या विनंतीमुळे सहभागी होण्याचे ठरले. चीन व भारत यांच्यात समझोता घडवून आणण्याचा रशियाचा प्रयत्न दिसत आहे.ज्या रानटी पद्धतीने चीनच्या सैनिकांनी भारतीय जवानांवर हल्ला केला, त्यामुळे भारतात संताप व जगभर नाराजी आहे. भारत, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स पूर्णपणे भारताच्या बाजूने उभे ठाकले आहेत. शिवाय कमांडरसह आपले ४५ सैनिक त्या रात्री ठार झाल्याचे उघड झाल्याने व चिनी नागरिकही सरकारवर अतिशय नाराज आहेत. चीनने अरुणाचल, लडाखच्या सीमेवर लढाऊ विमाने आणली आहेत. भारतीय लष्कर व हवाई दलही तिथे ठाकले आहे. लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी सोमवारी सर्व विभाग कमांडरांशी याबाबत चर्चा केली.सीमेवर व प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर थेट गोळीबार करण्याचे अधिकार भारतीय लष्कराला दिले आहेत. त्यामुळे चीनने भारतीय गोळीबारास उत्तर देण्यास सज्ज आहोत, असा इशारा दिला आहे. भारताने गोळीबार केल्यास दोन देशांतील कराराचे ते उल्लंघन ठरेल, असे चीनच्या ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राने म्हटले आहे.>चीनने घेतले नमतेचीनची भूमिका काहीसे नमते घेण्याची असल्याची दिसत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरून येणारा दबाव आणि या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतीय बाजारपेठ हातातून जाण्याची भीती यांमुळेच चीन काहीसा नमला असल्याचे दिसते.>कमांडरांची सीमेवर बैठकभारत व चीनच्या सैन्यांच्या स्थानिक कमांडरांची तणाव कमी करण्याच्या हेतूने आज प्रत्यक्ष सीमेवर प्रदीर्घ बैठक झाली. सायंकाळी उशिरापर्यंत बैठक संपली नव्हती. या बैठकीत भारतीय लष्कराच्या लेह येथील १४ व्या कॉर्पस्चे कमांडर लेफ्ट. जनरल हरिंदर सिंग तर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे मेजर जनरल ली सहभागी झाले. गेल्या ६ जूनलाही अशी बैठक झाली होती व त्यात दोन्ही बाजूंनी सैन्य माघारी घेण्याचे मान्य केले होते. परंतु चीनने ते पाळल्यानेच गलवान खो-यातील संघर्ष झाला.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत