शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
2
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
3
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
4
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
5
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
6
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
7
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
8
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
9
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
10
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
11
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
12
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
13
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
14
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
15
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
16
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
17
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
18
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
19
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
20
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?

India China FaceOff: सीमेवरील तणाव वाढला! आता चर्चेला चीनची तयारी, रशिया करणार मध्यस्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 06:24 IST

चीनने कुरापती काढण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना जशास तसे उत्तर द्यायचे ठरविले आहे.

नवी दिल्ली : चीनच्या ४५ सैनिकांना कंठस्नान घातल्यानंतरही चीनची खुमखुमी उतरली नसून, त्या देशाने सीमेवर लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत लष्कर तैनात करायला सुरुवात केली आहे. भारतानेही लडाख, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड व हिमाचल प्रदेशात हवाई दल व लष्कराचे जवान सज्ज ठेवले असून, चीनने कुरापती काढण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना जशास तसे उत्तर द्यायचे ठरविले आहे.लष्करी पातळीवरील चर्चेबरोबरच चीनने राजनैतिक पातळीवरील चर्चेस तयार असल्याचे म्हटले आहे.भारतही चर्चेसाठी तयार असून, घुसखोरी मागे घ्यावी, ही भारताची अट आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर मंगळवारी रशिया, चीन व भारत यांच्यात होणाऱ्या व्हर्च्युअल त्रिपक्षीय चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. आधी या चर्चेत सहभागी न होण्याचे भारताने ठरविले होते. पण रशियाच्या विनंतीमुळे सहभागी होण्याचे ठरले. चीन व भारत यांच्यात समझोता घडवून आणण्याचा रशियाचा प्रयत्न दिसत आहे.ज्या रानटी पद्धतीने चीनच्या सैनिकांनी भारतीय जवानांवर हल्ला केला, त्यामुळे भारतात संताप व जगभर नाराजी आहे. भारत, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स पूर्णपणे भारताच्या बाजूने उभे ठाकले आहेत. शिवाय कमांडरसह आपले ४५ सैनिक त्या रात्री ठार झाल्याचे उघड झाल्याने व चिनी नागरिकही सरकारवर अतिशय नाराज आहेत. चीनने अरुणाचल, लडाखच्या सीमेवर लढाऊ विमाने आणली आहेत. भारतीय लष्कर व हवाई दलही तिथे ठाकले आहे. लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी सोमवारी सर्व विभाग कमांडरांशी याबाबत चर्चा केली.सीमेवर व प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर थेट गोळीबार करण्याचे अधिकार भारतीय लष्कराला दिले आहेत. त्यामुळे चीनने भारतीय गोळीबारास उत्तर देण्यास सज्ज आहोत, असा इशारा दिला आहे. भारताने गोळीबार केल्यास दोन देशांतील कराराचे ते उल्लंघन ठरेल, असे चीनच्या ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राने म्हटले आहे.>चीनने घेतले नमतेचीनची भूमिका काहीसे नमते घेण्याची असल्याची दिसत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरून येणारा दबाव आणि या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतीय बाजारपेठ हातातून जाण्याची भीती यांमुळेच चीन काहीसा नमला असल्याचे दिसते.>कमांडरांची सीमेवर बैठकभारत व चीनच्या सैन्यांच्या स्थानिक कमांडरांची तणाव कमी करण्याच्या हेतूने आज प्रत्यक्ष सीमेवर प्रदीर्घ बैठक झाली. सायंकाळी उशिरापर्यंत बैठक संपली नव्हती. या बैठकीत भारतीय लष्कराच्या लेह येथील १४ व्या कॉर्पस्चे कमांडर लेफ्ट. जनरल हरिंदर सिंग तर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे मेजर जनरल ली सहभागी झाले. गेल्या ६ जूनलाही अशी बैठक झाली होती व त्यात दोन्ही बाजूंनी सैन्य माघारी घेण्याचे मान्य केले होते. परंतु चीनने ते पाळल्यानेच गलवान खो-यातील संघर्ष झाला.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत