शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

India China FaceOff: देशाची सुरक्षा व अखंडतेसाठी पंतप्रधान मोदींनी राजधर्माचे पालन करावे- काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 06:24 IST

India China FaceOff: पंतप्रधानांनी चिनी आक्रमकतेसमोर झुकून भारताचा भाग त्या देशाला सुपूर्द केला आहे.

नवी दिल्ली : लडाखमध्ये चीनसमवेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा व अखंडतेसाठी राजधर्माचे पालन करावे, असे आवाहन काँग्रेसने केले आहे. गलवान खोऱ्यातील तणावाबाबत पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) दिलेले निवेदन म्हणजे सत्य झाकण्याचा तोकडा प्रयत्न असल्याची टिप्पणीही केली आहे.लडाखबाबत सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, पंतप्रधानांनी चिनी आक्रमकतेसमोर झुकून भारताचा भाग त्या देशाला सुपूर्द केला आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे की, सर्वप्रथम पंतप्रधान व सरकारने गलवान खोºयाबाबत आपले धोरण स्पष्ट करण्याची गरज आहे. गलवान खोरे भारताचा भाग नाही का? सरकार गलवान खोºयावरील चीनच्या दाव्याला ठोसपणे का नाकारत नाही? त्या खोºयात चिनी सैनिक असतील तर ते घुसखोर नाहीत का? पेंगकाँग त्सो भागातील चिनी घुसखोरांबाबत सरकारने मौन का बाळगले आहे? पंतप्रधानांना आमचे गांभीर्यपूर्वक आवाहन आहे की, त्यांनी राजधर्माचे पालन करावे. तसेच देशाची सुरक्षा व अखंडतेसाठी ठोसपणे मुकाबला करावा.तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या सर्वपक्षीय बैठकीतील निवेदनाबाबत टिष्ट्वट केले. त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधानांनी चिनी आक्रमकतेसमोर झुकून भारतीय भाग चीनकडे सुपूर्द केला आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनीही पंतप्रधानांच्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. मोदींनी लडाखच्या योग्य स्थितीबाबत सांगितले असेल तर मग २० जवानांचे सर्वोच्च बलिदान का झाले? मागील काही आठवड्यांपासून चीनबरोबर सैन्य स्तरावर कोणत्या विषयावर बातचीत सुरू आहे, असा सवाल केला आहे. पंतप्रधान म्हणतात की, भारतीय हद्दीत बाहेरून कोणीही आले नाही. त्यांचे हे विधान लष्करप्रमुख, संरक्षणमंत्री व विदेश मंत्र्यांच्या यापूर्वीच्या विधानाला छेद देणारे आहे. त्यांच्या विधानाने आम्ही हतप्रभ झालो आहोत.आमच्या भूमीत बाहेरून घुसखोरी झालेली नाही तर मग पाच-सहा मे रोजी दोन्ही सेनांचे समोरासमोर येणे काय होते? ५ मे ते ६ जूनपर्यंत स्थानिक भारतीय कमांडर आपल्या चीनच्या समकक्षांशी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करीत होते? सहा जून रोजी दोन्ही देशांच्या कोअर कमांडर स्तरीय चर्चेत कोणत्या विषयावर चर्चा झाली, असा सवालही त्यांनी केला.>राजा बोला रात है, रानी बोली रात हैकाँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान व संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यावरील व्हिडिओ शेअर करून म्हटले आहे की, राजा बोला रात है, रानी बोली रात है, मंत्री बोला रात है, संतरी बोला रात है, यह सुबह सुबह की बात है.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी