शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: देशाची सुरक्षा व अखंडतेसाठी पंतप्रधान मोदींनी राजधर्माचे पालन करावे- काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 06:24 IST

India China FaceOff: पंतप्रधानांनी चिनी आक्रमकतेसमोर झुकून भारताचा भाग त्या देशाला सुपूर्द केला आहे.

नवी दिल्ली : लडाखमध्ये चीनसमवेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा व अखंडतेसाठी राजधर्माचे पालन करावे, असे आवाहन काँग्रेसने केले आहे. गलवान खोऱ्यातील तणावाबाबत पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) दिलेले निवेदन म्हणजे सत्य झाकण्याचा तोकडा प्रयत्न असल्याची टिप्पणीही केली आहे.लडाखबाबत सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, पंतप्रधानांनी चिनी आक्रमकतेसमोर झुकून भारताचा भाग त्या देशाला सुपूर्द केला आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे की, सर्वप्रथम पंतप्रधान व सरकारने गलवान खोºयाबाबत आपले धोरण स्पष्ट करण्याची गरज आहे. गलवान खोरे भारताचा भाग नाही का? सरकार गलवान खोºयावरील चीनच्या दाव्याला ठोसपणे का नाकारत नाही? त्या खोºयात चिनी सैनिक असतील तर ते घुसखोर नाहीत का? पेंगकाँग त्सो भागातील चिनी घुसखोरांबाबत सरकारने मौन का बाळगले आहे? पंतप्रधानांना आमचे गांभीर्यपूर्वक आवाहन आहे की, त्यांनी राजधर्माचे पालन करावे. तसेच देशाची सुरक्षा व अखंडतेसाठी ठोसपणे मुकाबला करावा.तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या सर्वपक्षीय बैठकीतील निवेदनाबाबत टिष्ट्वट केले. त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधानांनी चिनी आक्रमकतेसमोर झुकून भारतीय भाग चीनकडे सुपूर्द केला आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनीही पंतप्रधानांच्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. मोदींनी लडाखच्या योग्य स्थितीबाबत सांगितले असेल तर मग २० जवानांचे सर्वोच्च बलिदान का झाले? मागील काही आठवड्यांपासून चीनबरोबर सैन्य स्तरावर कोणत्या विषयावर बातचीत सुरू आहे, असा सवाल केला आहे. पंतप्रधान म्हणतात की, भारतीय हद्दीत बाहेरून कोणीही आले नाही. त्यांचे हे विधान लष्करप्रमुख, संरक्षणमंत्री व विदेश मंत्र्यांच्या यापूर्वीच्या विधानाला छेद देणारे आहे. त्यांच्या विधानाने आम्ही हतप्रभ झालो आहोत.आमच्या भूमीत बाहेरून घुसखोरी झालेली नाही तर मग पाच-सहा मे रोजी दोन्ही सेनांचे समोरासमोर येणे काय होते? ५ मे ते ६ जूनपर्यंत स्थानिक भारतीय कमांडर आपल्या चीनच्या समकक्षांशी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करीत होते? सहा जून रोजी दोन्ही देशांच्या कोअर कमांडर स्तरीय चर्चेत कोणत्या विषयावर चर्चा झाली, असा सवालही त्यांनी केला.>राजा बोला रात है, रानी बोली रात हैकाँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान व संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यावरील व्हिडिओ शेअर करून म्हटले आहे की, राजा बोला रात है, रानी बोली रात है, मंत्री बोला रात है, संतरी बोला रात है, यह सुबह सुबह की बात है.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी