शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

India China FaceOff: देशाची सुरक्षा व अखंडतेसाठी पंतप्रधान मोदींनी राजधर्माचे पालन करावे- काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 06:24 IST

India China FaceOff: पंतप्रधानांनी चिनी आक्रमकतेसमोर झुकून भारताचा भाग त्या देशाला सुपूर्द केला आहे.

नवी दिल्ली : लडाखमध्ये चीनसमवेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा व अखंडतेसाठी राजधर्माचे पालन करावे, असे आवाहन काँग्रेसने केले आहे. गलवान खोऱ्यातील तणावाबाबत पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) दिलेले निवेदन म्हणजे सत्य झाकण्याचा तोकडा प्रयत्न असल्याची टिप्पणीही केली आहे.लडाखबाबत सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, पंतप्रधानांनी चिनी आक्रमकतेसमोर झुकून भारताचा भाग त्या देशाला सुपूर्द केला आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे की, सर्वप्रथम पंतप्रधान व सरकारने गलवान खोºयाबाबत आपले धोरण स्पष्ट करण्याची गरज आहे. गलवान खोरे भारताचा भाग नाही का? सरकार गलवान खोºयावरील चीनच्या दाव्याला ठोसपणे का नाकारत नाही? त्या खोºयात चिनी सैनिक असतील तर ते घुसखोर नाहीत का? पेंगकाँग त्सो भागातील चिनी घुसखोरांबाबत सरकारने मौन का बाळगले आहे? पंतप्रधानांना आमचे गांभीर्यपूर्वक आवाहन आहे की, त्यांनी राजधर्माचे पालन करावे. तसेच देशाची सुरक्षा व अखंडतेसाठी ठोसपणे मुकाबला करावा.तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या सर्वपक्षीय बैठकीतील निवेदनाबाबत टिष्ट्वट केले. त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधानांनी चिनी आक्रमकतेसमोर झुकून भारतीय भाग चीनकडे सुपूर्द केला आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनीही पंतप्रधानांच्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. मोदींनी लडाखच्या योग्य स्थितीबाबत सांगितले असेल तर मग २० जवानांचे सर्वोच्च बलिदान का झाले? मागील काही आठवड्यांपासून चीनबरोबर सैन्य स्तरावर कोणत्या विषयावर बातचीत सुरू आहे, असा सवाल केला आहे. पंतप्रधान म्हणतात की, भारतीय हद्दीत बाहेरून कोणीही आले नाही. त्यांचे हे विधान लष्करप्रमुख, संरक्षणमंत्री व विदेश मंत्र्यांच्या यापूर्वीच्या विधानाला छेद देणारे आहे. त्यांच्या विधानाने आम्ही हतप्रभ झालो आहोत.आमच्या भूमीत बाहेरून घुसखोरी झालेली नाही तर मग पाच-सहा मे रोजी दोन्ही सेनांचे समोरासमोर येणे काय होते? ५ मे ते ६ जूनपर्यंत स्थानिक भारतीय कमांडर आपल्या चीनच्या समकक्षांशी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करीत होते? सहा जून रोजी दोन्ही देशांच्या कोअर कमांडर स्तरीय चर्चेत कोणत्या विषयावर चर्चा झाली, असा सवालही त्यांनी केला.>राजा बोला रात है, रानी बोली रात हैकाँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान व संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यावरील व्हिडिओ शेअर करून म्हटले आहे की, राजा बोला रात है, रानी बोली रात है, मंत्री बोला रात है, संतरी बोला रात है, यह सुबह सुबह की बात है.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी