शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: काय आहे सीमावाद? LAC, LOC आणि आंतरराष्ट्रीय सीमा यातील फरक समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 22:47 IST

भारत, चीन आणि पाकिस्तान यांच्यातील सीमावाद नक्की काय आहे हे जाणून घ्या

प्रविण मरगळे

नवी दिल्ली - कधी चीनबरोबर एलएसीवरुन भारताचा वाद तर कधी पाकिस्तानशी एलओसीचा वाद. या वादाचे मूळ समजून घेण्यासाठी आपल्यास देशाच्या सीमांबद्दलही थोडेसे ज्ञान असणे आवश्यक आहे. आपल्या देशाच्या सीमा तीन प्रकारे विभागल्या आहेत हे आपल्याला माहिती आहे का? या सीमांना एलओसी, एलएसी आणि आंतरराष्ट्रीय सीमा म्हणतात. या तिघांमध्ये काय फरक आहे आणि शेजारी देशांबद्दल याबद्दल नेहमीच विवाद का होतात हे जाणून घेऊया.

आंतरराष्ट्रीय सीमा ही कोणत्याही देशाची सीमा आहे जी इतर शेजारच्या देशांना ती स्पष्टपणे विभक्त करते. आंतरराष्ट्रीय सीमा रेडक्लिफ लाइनवर स्थित आहे. त्याला आंतरराष्ट्रीय सीमा म्हणतात कारण ही सीमा जगभरातून याला मंजूर मिळालेली असते. म्हणजे, ही एक स्पष्ट सीमा आहे, ज्यावर कोणत्याही शेजारच्या देशाशी वाद नाही. भारताची आंतरराष्ट्रीय सीमा गुजरातच्या समुद्रापासून सुरु होऊन राजस्थान, पंजाब आणि जम्मूपर्यंत जाते. आंतरराष्ट्रीय सीमा पाकिस्तानच्या चार प्रांतांपासून भारताला वेगळे करते. काश्मीर, वाघा, भारत आणि पाकिस्तानचा पंजाब विभाग हे प्रांत आहेत. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमादेखील म्यानमार, बांगलादेश आणि भूतानसोबतही आहेत.

नियंत्रण रेषा(LOC)

नियंत्रण रेषा किंवा लाइन ऑफ कंट्रोल ही दोन देशांमधील सैन्य करारांनुसार अधिकृतपणे तडजोड केलेली सीमा आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय याला मानत नाही. भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या सध्याच्या सीमेला नियंत्रण रेषा म्हणतात. १९४७ मध्ये संपूर्ण काश्मीर भारताचा भाग होता त्यावेळी भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली. १९४८  मध्ये सुरू असलेल्या सीमा विवाद लक्षात घेता दोन्ही देशांनी परस्पर करार करून नियंत्रण रेखा निश्चित केली होती. असे असूनही पाकिस्तानने कुरापती करणं सोडलं नाही आणि १९७१ मध्ये त्याने काश्मीरचा एक मोठा भाग बेकायदेशीरपणे ताब्यात घेतला, जो आता पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो. हे युद्ध १९७२ मध्ये भारत-पाक सिमला करारा नंतर झाले, ज्यामध्ये दोन्ही बाजूंच्या सैन्याने नकाशावर नियंत्रण रेखा (एलओसी) लावली. मात्र ही अधिकृत सीमा नाही. एलओसी हा लष्करी नियंत्रणाचा एक भाग आहे, या वादग्रस्त भागापासून दूर राहण्याचा निर्धार आहे.

वास्तविक नियंत्रण रेखा (LAC)

वास्तविक नियंत्रण रेखा( लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल) ही एलओसीपेक्षा भिन्न आहे. भारत आणि चीनमध्ये ४ हजार ५७ किमी लांबीच्या सीमेला वास्तविक नियंत्रण (एलएसी) म्हणतात. दोन्ही देशांमधील एलएसी लडाख, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या भारतीय राज्यांमधून जाते. एलओसीप्रमाणे हा दोन देशांनी केलेला युद्धविराम रेषा आहे. या दोघांमधील फरक असा आहे की, एलओसी स्पष्टपणे नकाशावर परिभाषित केले गेले आहे, परंतु एलएसीची कोणतीही स्पष्ट किंवा अधिकृत व्याख्या नाही. हेच कारण आहे की याबद्दल नेहमीच वाद असतात. १९६२ च्या युद्धानंतर चिनी सैन्य तेथे अस्तित्त्वात होते, तेव्हा त्याला वास्तविक नियंत्रण रेखा (एलएसी) म्हणून स्वीकारले गेले. या युद्धामध्ये चीनने भारताच्या कार्यक्षेत्रातील अक्साई चीन ताब्यात घेतला. हेच कारण आहे की, आंतरराष्ट्रीय समुदाय एलएसीचा मानत नाहीत.

कारगिल युद्धाचे नायक शहीद कॅप्टन विजयंत थापर यांचे वडील कर्नल व्ही.एन. थापर यांच्या मते, ब्रिटिशांच्या काळात त्यांनी भारत आणि चीनमधील सीमा निश्चित केली, ज्याला मॅकमोहन लाइन म्हणून ओळखले जाते. त्याअंतर्गत अक्साई चीन हा भारताचा भाग होता. परंतु धोकेबाज चीन आता मॅकमोहन लाईन मानत नाही. १९६२ च्या युद्धामध्ये त्यांनी भारताची भूमी ताब्यात घेतली. तोपर्यंत गलवान खोऱ्यासह संपूर्ण परिसर हा भारताचा भाग होता. चीन आता या गलवान खोऱ्यावर आपला दावा सांगत आहे.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानchinaचीन