शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

India China FaceOff: एलएसीवरील तणावादरम्यान ब्रिक्स संमेलनात मोदी आणि जिनपिंग येणार आमने-सामने

By बाळकृष्ण परब | Updated: October 5, 2020 21:09 IST

भारत आणि चीनमध्ये तणाव निवळण्यासाठी विविध पातळीवरील बैठका झाल्या आहेत. आता या तणावाच्या वातावरणामध्येच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे आमने-सामने येणार आहेत.

ठळक मुद्देतणावाच्या वातावरणामध्येच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे आमने-सामने येणार आहेतकोरोनाच्या संसर्गामुळे १२ वे ब्रिक्स शिखर संमेलन यावेळी व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणार आहेहे संमेलन १७ नोव्हेंबर रोजी होणार आहे

नवी दिल्ली - चिनी सैन्याने लडाखमध्ये केलेला घुसखोरीचा प्रयत्न आणि गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीमुळे भारत आणि चीनमधील संबंध सध्या कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत. दोन्ही देशांमधील तणाव निवळण्यासाठी विविध पातळीवरील बैठका झाल्या आहेत. आता या तणावाच्या वातावरणामध्येच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे आमने-सामने येणार आहेत.कोरोनाच्या संसर्गामुळे १२ वे ब्रिक्स शिखर संमेलन यावेळी व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणार आहे. हे संमेलन १७ नोव्हेंबर रोजी होणार असून, मिळालेल्या माहितीनुसार प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. सीमेवर कमालीचे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमधील भेटीची ही पहिलीची वेळ असेल. ही भेट व्हिडीओ कॉन्फ्रन्सिंगच्या माध्यमातून व्हर्च्युअल पद्धतीने आयोजित होईल.या वर्षीच्या ब्रिक्स शिखर संमेलनामधील बैठकीचा विषय जागतिक स्थैर्य, संयुक्त संरक्षण आणि अभिनव विकासामध्ये ब्रिक्सची भागीदारी हा आहे. २०२० मध्ये या संघटनेतील पाच प्रमुख देशांनी शांतता आणि संरक्षण, अर्थव्यवस्था आणि वित्त, सांस्कृतिक आणि देवाण-घेवाणीवरील भागीदारी कायम ठेवली आहे.दरम्यान, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचे सल्लागार अँटोन कोबायाकोव्ह यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या फैलावामुळे जागतिक पातळीवर चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असली तरी २०२० मध्ये रशियाच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्सचे संमेलन अत्यंत सुसंगत पद्धतीने आयोजित केले जात आहे.दुसरीकडे भारत आणि चीनमधील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र या परिस्थितीतही चीनच्या प्रत्येक कारस्थानाला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने सतर्कता वाढवली आहे. अशा परिस्थितीत चिनी सेनेला माघार घेण्यास लावण्यासाठी तसेच चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ताकद वाढवण्याच्या करारापासून मागे हटत असेल तर अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठीही भारताने तयारी केली आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndiaभारतchinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदी