शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff:...म्हणून सीमेवर तणाव वाढला; भारत-चीन संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 21:41 IST

मागील वर्षी देशाने आपल्या सीमेच्या संरक्षणासाठी सीमा परिसरात पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे.

नवी दिल्ली – चीनने आपल्या सीमेत घुसखोरी केली नाही, ना आपल्या कोणत्याही पोस्टवर कब्जा केला आहे. लडाखमध्ये भारताचे २० वीर जवान शहीद झाले, पण भारत मातेवर ज्यांनी डोळे वटारुन पाहिले त्यांना धडा शिकवून गेले. जल-थल-वायू सेना आपल्या देशाच्या रक्षणासाठी जे काही करायचं आहे ते करत आहे. आज आपल्या देशाची अशी क्षमता आहे कोणीही देशाच्या एक इंच जमिनीकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठकीत चीनला दिला आहे.

यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, मागील वर्षी देशाने आपल्या सीमेच्या संरक्षणासाठी सीमा परिसरात पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे. नवीन बनलेल्या सुविधांमुळे विशेष करुन एलएसीजवळ आपल्या सैन्याची पेट्रोलिंग क्षमता वाढली आहे. त्यामुळे ज्या क्षेत्रावर पहिले आपली नजर जात नव्हती त्याठिकाणी आपले जवान चांगल्यारितीने मॉनिटर करु शकत आहेत.

आतापर्यंत ज्यांना कोणी विचारत नव्हतं. ना कोणी रोखत होतं. आता आपले जवान प्रत्येक हालचालींवर त्यांना रोखत आहेत त्यामुळे तणाव वाढला आहे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत सर्वपक्षीय नेत्यांना आश्वस्त करतो की, देशाचे सैनिक भारताच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी सक्षम आहेत. सैन्यदलांना परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे सर्वाधिकार दिले आहेत. जे काही गरजेचे आहे ते करा असं सांगण्यात आलं आहे.

भारत कधीही कोणाच्या दबावाखाली येणार नाही. देशाच्या रक्षणासाठी कटीबद्ध आहोत. निश्चितपणे चीनद्वारे एलएसीवर जे काही सुरु आहे त्यामुळे देशात आक्रोश आहे. हीच भावना सर्वपक्षीय बैठकीत आपल्या चर्चेदरम्यान पाहायला मिळाली असं नरेंद्र मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतchinaचीन