शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

India China FaceOff:...म्हणून सीमेवर तणाव वाढला; भारत-चीन संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 21:41 IST

मागील वर्षी देशाने आपल्या सीमेच्या संरक्षणासाठी सीमा परिसरात पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे.

नवी दिल्ली – चीनने आपल्या सीमेत घुसखोरी केली नाही, ना आपल्या कोणत्याही पोस्टवर कब्जा केला आहे. लडाखमध्ये भारताचे २० वीर जवान शहीद झाले, पण भारत मातेवर ज्यांनी डोळे वटारुन पाहिले त्यांना धडा शिकवून गेले. जल-थल-वायू सेना आपल्या देशाच्या रक्षणासाठी जे काही करायचं आहे ते करत आहे. आज आपल्या देशाची अशी क्षमता आहे कोणीही देशाच्या एक इंच जमिनीकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठकीत चीनला दिला आहे.

यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, मागील वर्षी देशाने आपल्या सीमेच्या संरक्षणासाठी सीमा परिसरात पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे. नवीन बनलेल्या सुविधांमुळे विशेष करुन एलएसीजवळ आपल्या सैन्याची पेट्रोलिंग क्षमता वाढली आहे. त्यामुळे ज्या क्षेत्रावर पहिले आपली नजर जात नव्हती त्याठिकाणी आपले जवान चांगल्यारितीने मॉनिटर करु शकत आहेत.

आतापर्यंत ज्यांना कोणी विचारत नव्हतं. ना कोणी रोखत होतं. आता आपले जवान प्रत्येक हालचालींवर त्यांना रोखत आहेत त्यामुळे तणाव वाढला आहे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत सर्वपक्षीय नेत्यांना आश्वस्त करतो की, देशाचे सैनिक भारताच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी सक्षम आहेत. सैन्यदलांना परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे सर्वाधिकार दिले आहेत. जे काही गरजेचे आहे ते करा असं सांगण्यात आलं आहे.

भारत कधीही कोणाच्या दबावाखाली येणार नाही. देशाच्या रक्षणासाठी कटीबद्ध आहोत. निश्चितपणे चीनद्वारे एलएसीवर जे काही सुरु आहे त्यामुळे देशात आक्रोश आहे. हीच भावना सर्वपक्षीय बैठकीत आपल्या चर्चेदरम्यान पाहायला मिळाली असं नरेंद्र मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतchinaचीन