शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

India China FaceOff: शहीद सैनिकांच्या बलिदानाचा 'असा' बदला घेणार; चीनविरोधात भारताची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 10:39 IST

दोन्ही देशांमधील वाढता तणावाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी सरकारने चीनला घेरण्याची तयारी केली आहे.

नवी दिल्ली - लडाखच्या गलवान सीमेवर भारत आणि चीन यांच्यात झालेल्या संघर्षात देशाचे २० जवान शहीद झाले. चीनच्या अशाप्रकारे भारताला धोका दिल्यानं संपूर्ण देशात चीनविरोधात संतापाची लाट आहे. भारताने अद्यापही या प्रकरणी थेट प्रतिक्रिया दिली नाही. पण देशाच्या शहीदांचे बलिदान व्यर्थ न जाण्यासाठी चीनचा बदला घेण्याची तयारी सुरु केली आहे. पेइचिंगच्या या करकुतीविरोधात भारत मोठ्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

१९७५ नंतर भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष अत्यंत गंभीरस्थितीत येऊन पोहचला आहे. चीनच्या विश्वासघाताविरोधात भारताने चीनविरोधात रणनीती आखली आहे. भारत सैन्यापेक्षा चीनला आर्थिक आघाडीवर घेरण्याच्या तयारीत आहेत. भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ असून या बाजारपेठेतून चीनच्या आर्थिक नाड्या तोडण्याची तयारी भारताने केली आहे. त्यामुळे चीनला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

दोन्ही देशांमधील वाढता तणावाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी सरकारने चीनला घेरण्याची तयारी केली आहे. संयुक्त राष्ट्र संघातही चीनला धडा शिकवण्याच्या मानसिकता भारताने केली आहे. आतापर्यंत चीनच्या गुंतवणुकदारांना भारतात सहज परवानगी मिळत होती, त्याचा वेग आता कमी केला जाईल. चीनी कंपन्यांना सरकारी अथवा खासगी क्षेत्रात अडचणी निर्माण करण्यात येतील. त्याचसोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे चीनची मोठी मोबाईल कंपनी हुवेईला भारतात ५ जी मार्केटमध्ये प्रवेश मिळणं जवळपास कठीण झालं आहे.

असा झाला चीन आणि भारत यांच्यात संघर्ष? 

सोमवारी सकाळी ब्रिगेड कमांडरसोबत स्थानिक कमांडर स्तरीय बैठक झाली. संध्याकाळी भारतीय लष्कारी अधिकाऱ्यांची टीम गलवान खोऱ्यात पीपी १४ याठिकाणी पोहचले ज्याठिकाणाहून चीनच्या सैनिकांना मागे जायचं होतं, भारतीय अधिकारी आणि त्यांच्या जवानांवर दगड आणि लोखंडाच्या रॉडने हल्ला केला. त्यामुळे भारतीय सैनिकांनीही सतर्कता बाळगत त्याला उत्तर दिलं. मोठ्या संख्येने भारताचे सैनिक त्याठिकाणी पोहचले, रात्री उशिरापर्यंत दोन्ही सैनिकात संघर्ष सुरु होता. यात घटनेत २० जवान शहीद झाले तर चीनच्या गंभीर जखमी पकडून साधारण ४३ सैनिकांचा मृत्यू झाल्याची बातमी मिळाली.  

 

टॅग्स :Indiaभारतchinaचीन