शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

India China FaceOff: गलवानवरील चीनचा दावा भारताने फेटाळला; परराष्ट्र मंत्रालयाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 19:44 IST

भारतीय सैनिकांना भारत चीन सीमा गलवान खोऱ्यासह सर्व सेक्टर्समधील एलएसीच्या वास्तविक स्थितीबद्दल संपूर्ण माहिती आहे

ठळक मुद्देभारतीय सैन्याने एलएसीवर जाऊन कधीही कारवाई केली नाहीमे २०२० पासून चीन भारतच्या सामान्य पेट्रोलिंग प्रक्रियेत बाधा आणत आहेचीनी सैनिकांनी वेस्टर्न सेक्टरमध्ये अनेक ठिकाणी एलएसीचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला

नवी दिल्ली – लडाख सीमेवर सुरु असलेल्या भारतचीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने पुन्हा एकदा चीनविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. गलवान खोऱ्यावर चीनने केलेला दावा भारताने फेटाळून लावला आहे. गलवानमध्ये एलएसीवरुन चीन सरकारने केलेला दावा चुकीचा आहे. गलवानवर केलेला दावा चीनच्या आधीच्या भूमिकेविरुद्ध आहे असं परराष्ट्र मंत्रालयाने चीनला सुनावलं आहे.

याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की, भारतीय सैनिकांना भारत चीन सीमा गलवान खोऱ्यासह सर्व सेक्टर्समधील एलएसीच्या वास्तविक स्थितीबद्दल संपूर्ण माहिती आहे. भारतीय सैन्याने एलएसीवर जाऊन कधीही कारवाई केली नाही. भारतीय जवान या परिसरात अनेक काळापासून कोणत्याही घटनेशिवाय पेट्रोलिंग करत आहे. मे २०२० पासून चीन भारतच्या सामान्य पेट्रोलिंग प्रक्रियेत बाधा आणत आहे. त्यामुळे सीमेवरील तणाव वाढला आहे. त्यामुळे ग्राऊंड पातळीवर कमांडर्समध्ये संवाद सुरु आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच चीनने एलएसीवरुन भारतावर केलेला आरोप तथ्यहिन आहे. भारत कधी एकपक्षीयपणे सीमेवरील स्थिती बदलण्याचा प्रयत्न करणार नाही, त्यामुळे चीनचा हा तर्क चुकीचा आहे. मे महिन्याच्या मध्यात चीनी सैनिकांनी वेस्टर्न सेक्टरमध्ये अनेक ठिकाणी एलएसीचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला. चीनच्या या प्रयत्नांना आमच्याकडून सडेतोड उत्तर दिले गेले. त्यानंतर दोन्हीकडून राजकीय आणि लष्करी माध्यमातून सुरु असणाऱ्या चीनच्या कारवायांबद्दल संवाद सुरु झाला असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

 

दरम्यान, ६ जून रोजी कमांडर स्तरीय बैठकीत तणाव कमी करणे आणि मागे हटण्यावर सहमती झाली. दोन्ही देशांनी एलएसीचा सन्मान ठेवणे आणि सीमेवरील स्थिती बदलण्याचा प्रयत्न करु नये असं समझोता झाला. त्यानंतर चीनकडून बैठकीत झालेला तडजोडीच्या विरोधात भूमिका घेतली आणि त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाल्याने १५ जून रोजी गलवान खोऱ्यात हिंसक घटना घडली. त्यात देशाचे २० जवान शहीद झाले असंही परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

त्याचसोबत दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांचा १७ जूनला संवाद झाला. परराष्ट्र मंत्रालयाने या मुद्द्यावरुन भारताकडून कडाडून विरोध केला. भारताने चीनकडून केलेले दावे आणि वरिष्ठ कमांडरस्तरीय बैठकीतील चुकीच्या गोष्टी नाकारल्या. चीनला चिंतन करणे गरजेचे आहे असंही भारताने सांगितले. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये जबाबदारीने समस्या सोडावली जाईल आणि ६ जूनच्या बैठकीत मागे हटण्याचं ठरल्याप्रमाणे करण्याबाबत सहमती झाली. सध्या दोन्ही बाजूने सातत्याने संपर्क ठेवला जात आहे असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.  

टॅग्स :Indiaभारतchinaचीन