शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: गलवानवरील चीनचा दावा भारताने फेटाळला; परराष्ट्र मंत्रालयाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 19:44 IST

भारतीय सैनिकांना भारत चीन सीमा गलवान खोऱ्यासह सर्व सेक्टर्समधील एलएसीच्या वास्तविक स्थितीबद्दल संपूर्ण माहिती आहे

ठळक मुद्देभारतीय सैन्याने एलएसीवर जाऊन कधीही कारवाई केली नाहीमे २०२० पासून चीन भारतच्या सामान्य पेट्रोलिंग प्रक्रियेत बाधा आणत आहेचीनी सैनिकांनी वेस्टर्न सेक्टरमध्ये अनेक ठिकाणी एलएसीचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला

नवी दिल्ली – लडाख सीमेवर सुरु असलेल्या भारतचीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने पुन्हा एकदा चीनविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. गलवान खोऱ्यावर चीनने केलेला दावा भारताने फेटाळून लावला आहे. गलवानमध्ये एलएसीवरुन चीन सरकारने केलेला दावा चुकीचा आहे. गलवानवर केलेला दावा चीनच्या आधीच्या भूमिकेविरुद्ध आहे असं परराष्ट्र मंत्रालयाने चीनला सुनावलं आहे.

याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की, भारतीय सैनिकांना भारत चीन सीमा गलवान खोऱ्यासह सर्व सेक्टर्समधील एलएसीच्या वास्तविक स्थितीबद्दल संपूर्ण माहिती आहे. भारतीय सैन्याने एलएसीवर जाऊन कधीही कारवाई केली नाही. भारतीय जवान या परिसरात अनेक काळापासून कोणत्याही घटनेशिवाय पेट्रोलिंग करत आहे. मे २०२० पासून चीन भारतच्या सामान्य पेट्रोलिंग प्रक्रियेत बाधा आणत आहे. त्यामुळे सीमेवरील तणाव वाढला आहे. त्यामुळे ग्राऊंड पातळीवर कमांडर्समध्ये संवाद सुरु आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच चीनने एलएसीवरुन भारतावर केलेला आरोप तथ्यहिन आहे. भारत कधी एकपक्षीयपणे सीमेवरील स्थिती बदलण्याचा प्रयत्न करणार नाही, त्यामुळे चीनचा हा तर्क चुकीचा आहे. मे महिन्याच्या मध्यात चीनी सैनिकांनी वेस्टर्न सेक्टरमध्ये अनेक ठिकाणी एलएसीचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला. चीनच्या या प्रयत्नांना आमच्याकडून सडेतोड उत्तर दिले गेले. त्यानंतर दोन्हीकडून राजकीय आणि लष्करी माध्यमातून सुरु असणाऱ्या चीनच्या कारवायांबद्दल संवाद सुरु झाला असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

 

दरम्यान, ६ जून रोजी कमांडर स्तरीय बैठकीत तणाव कमी करणे आणि मागे हटण्यावर सहमती झाली. दोन्ही देशांनी एलएसीचा सन्मान ठेवणे आणि सीमेवरील स्थिती बदलण्याचा प्रयत्न करु नये असं समझोता झाला. त्यानंतर चीनकडून बैठकीत झालेला तडजोडीच्या विरोधात भूमिका घेतली आणि त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाल्याने १५ जून रोजी गलवान खोऱ्यात हिंसक घटना घडली. त्यात देशाचे २० जवान शहीद झाले असंही परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

त्याचसोबत दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांचा १७ जूनला संवाद झाला. परराष्ट्र मंत्रालयाने या मुद्द्यावरुन भारताकडून कडाडून विरोध केला. भारताने चीनकडून केलेले दावे आणि वरिष्ठ कमांडरस्तरीय बैठकीतील चुकीच्या गोष्टी नाकारल्या. चीनला चिंतन करणे गरजेचे आहे असंही भारताने सांगितले. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये जबाबदारीने समस्या सोडावली जाईल आणि ६ जूनच्या बैठकीत मागे हटण्याचं ठरल्याप्रमाणे करण्याबाबत सहमती झाली. सध्या दोन्ही बाजूने सातत्याने संपर्क ठेवला जात आहे असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.  

टॅग्स :Indiaभारतchinaचीन