शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
3
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
4
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
5
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
6
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
7
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
8
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
9
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
10
'सैराट'मधील इंटिमेट सीनबद्दल पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू, म्हणाली- "मी घाबरले होते, पण..."
11
आ. विजयकुमार देशमुख यांचा असंतोष ३० तासात मावळला; मुंबईच्या बैठकीत उमेदवार निश्चित
12
Video: "पापाराझींना वाटलं सलमान खान कारमध्ये, पण...", चक्क ई-बाईकवरुन घेतली भाईजानने एन्ट्री
13
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
14
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
15
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
16
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
17
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
18
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
19
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: गलवानवरील चीनचा दावा भारताने फेटाळला; परराष्ट्र मंत्रालयाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 19:44 IST

भारतीय सैनिकांना भारत चीन सीमा गलवान खोऱ्यासह सर्व सेक्टर्समधील एलएसीच्या वास्तविक स्थितीबद्दल संपूर्ण माहिती आहे

ठळक मुद्देभारतीय सैन्याने एलएसीवर जाऊन कधीही कारवाई केली नाहीमे २०२० पासून चीन भारतच्या सामान्य पेट्रोलिंग प्रक्रियेत बाधा आणत आहेचीनी सैनिकांनी वेस्टर्न सेक्टरमध्ये अनेक ठिकाणी एलएसीचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला

नवी दिल्ली – लडाख सीमेवर सुरु असलेल्या भारतचीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने पुन्हा एकदा चीनविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. गलवान खोऱ्यावर चीनने केलेला दावा भारताने फेटाळून लावला आहे. गलवानमध्ये एलएसीवरुन चीन सरकारने केलेला दावा चुकीचा आहे. गलवानवर केलेला दावा चीनच्या आधीच्या भूमिकेविरुद्ध आहे असं परराष्ट्र मंत्रालयाने चीनला सुनावलं आहे.

याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की, भारतीय सैनिकांना भारत चीन सीमा गलवान खोऱ्यासह सर्व सेक्टर्समधील एलएसीच्या वास्तविक स्थितीबद्दल संपूर्ण माहिती आहे. भारतीय सैन्याने एलएसीवर जाऊन कधीही कारवाई केली नाही. भारतीय जवान या परिसरात अनेक काळापासून कोणत्याही घटनेशिवाय पेट्रोलिंग करत आहे. मे २०२० पासून चीन भारतच्या सामान्य पेट्रोलिंग प्रक्रियेत बाधा आणत आहे. त्यामुळे सीमेवरील तणाव वाढला आहे. त्यामुळे ग्राऊंड पातळीवर कमांडर्समध्ये संवाद सुरु आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच चीनने एलएसीवरुन भारतावर केलेला आरोप तथ्यहिन आहे. भारत कधी एकपक्षीयपणे सीमेवरील स्थिती बदलण्याचा प्रयत्न करणार नाही, त्यामुळे चीनचा हा तर्क चुकीचा आहे. मे महिन्याच्या मध्यात चीनी सैनिकांनी वेस्टर्न सेक्टरमध्ये अनेक ठिकाणी एलएसीचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला. चीनच्या या प्रयत्नांना आमच्याकडून सडेतोड उत्तर दिले गेले. त्यानंतर दोन्हीकडून राजकीय आणि लष्करी माध्यमातून सुरु असणाऱ्या चीनच्या कारवायांबद्दल संवाद सुरु झाला असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

 

दरम्यान, ६ जून रोजी कमांडर स्तरीय बैठकीत तणाव कमी करणे आणि मागे हटण्यावर सहमती झाली. दोन्ही देशांनी एलएसीचा सन्मान ठेवणे आणि सीमेवरील स्थिती बदलण्याचा प्रयत्न करु नये असं समझोता झाला. त्यानंतर चीनकडून बैठकीत झालेला तडजोडीच्या विरोधात भूमिका घेतली आणि त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाल्याने १५ जून रोजी गलवान खोऱ्यात हिंसक घटना घडली. त्यात देशाचे २० जवान शहीद झाले असंही परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

त्याचसोबत दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांचा १७ जूनला संवाद झाला. परराष्ट्र मंत्रालयाने या मुद्द्यावरुन भारताकडून कडाडून विरोध केला. भारताने चीनकडून केलेले दावे आणि वरिष्ठ कमांडरस्तरीय बैठकीतील चुकीच्या गोष्टी नाकारल्या. चीनला चिंतन करणे गरजेचे आहे असंही भारताने सांगितले. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये जबाबदारीने समस्या सोडावली जाईल आणि ६ जूनच्या बैठकीत मागे हटण्याचं ठरल्याप्रमाणे करण्याबाबत सहमती झाली. सध्या दोन्ही बाजूने सातत्याने संपर्क ठेवला जात आहे असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.  

टॅग्स :Indiaभारतchinaचीन