शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

India China FaceOff: भारताच्या शहीद जवानांसोबत चीनची क्रुरता; पोस्टमोर्टम रिपोर्टमधून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 16:17 IST

शहीद जवानांच्या शरीराच्या अवयवांवर खोल जखमांचे निशाण आहेत आणि त्यांच्यासोबत क्रूरपणे मारहाण केली आहे.

ठळक मुद्देशहीद जवानांच्या शरीराच्या अवयवांवर खोल जखमांचे निशाण आहेतलष्कराने जवानांना शहीदांच्या मृतदेहाचे फोटो न घेण्याचे आदेश जवळपास १७ जवानांच्या शरीरावर मारहाणीचे खोल निशाण आहेत

नवी दिल्ली – गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांशी लढताना भारताचे २० जवान शहीद झाले. या शहीद जवानांच्या हौतात्म्यावर संपूर्ण देश चीनविरोधात संतापला आहे. आता पोस्टमॉर्टम अहवालात भारतीय सैनिकांच्या अंगावर खोल जखमा झाल्याचं समोर आलं आहे. त्यापैकी काही जण हायपोथर्मिया (अत्यंत कमी शरीराचे तापमान) आणि गुदमरल्यामुळे मरण पावले आहेत. लेहमधील एसएनएम रुग्णालयात मृतदेहांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, शहीद जवानांच्या शरीराच्या अवयवांवर खोल जखमांचे निशाण आहेत आणि त्यांच्यासोबत क्रूरपणे मारहाण केली आहे. चीनी सैन्याने भारतीय सैनिकांवर तारा असलेल्या रॉडने हल्ला केल्याचं स्पष्ट झालं आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, जवळपास १७ जवानांच्या शरीरावर मारहाणीचे खोल निशाण आहेत. लष्कराने जवानांना शहीदांच्या मृतदेहाचे फोटो न घेण्याचे आदेश दिले. सुरुवातीच्या रिपोर्टमध्ये कर्नल संतोष बाबूसह ३ जवानांच्या शरीरावर कोणतेही निशाण आढळले नाहीत, पण त्यांच्या डोक्यावर जोरदार हत्याराने प्रहार केल्याचं दिसून आलं आहे.

संभाव्यत: इतर ३ जवानांचा मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाला आहे. बाकी जवानांच्या शरीरावर हत्याराने मारहाण केल्याचे निशाण आहेत. तीन जवानांचे चेहरेही ओळखता येत नव्हते तर अन्य ३ जवानांच्या गळ्याभोवती वाळूचे घट्ट निशाण होते.

तसेच या जवानांना कोणी नखं मारल्याचं दिसत आहे. चीनी सैनिकांकडे चाकूदेखील होते, काही जवान उंचावरुन नदीत पडले. १४ हजार फूट उंचावर असणाऱ्या गलवान खोऱ्यात थंड प्रदेश आणि दुर्गम भाग असल्याने मदत मिळण्याअभावी त्या सैनिकांचा जीव गेला. १२ जखमी जवानांचा मृत्यू हायपोथर्मिया आणि श्वास रोखल्याने झाला असल्याचं पोस्टमोर्टममध्ये समोर आलं.

काय घडलं होतं?

सोमवारी सकाळी ब्रिगेड कमांडरसोबत स्थानिक कमांडर स्तरीय बैठक झाली. संध्याकाळी भारतीय लष्कारी अधिकाऱ्यांची टीम गलवान खोऱ्यात पीपी १४ याठिकाणी पोहचले ज्याठिकाणाहून चीनच्या सैनिकांना मागे जायचं होतं, भारतीय अधिकारी आणि त्यांच्या जवानांवर दगड आणि लोखंडाच्या रॉडने हल्ला केला. त्यामुळे भारतीय सैनिकांनीही सतर्कता बाळगत त्याला उत्तर दिलं. मोठ्या संख्येने भारताचे सैनिक त्याठिकाणी पोहचले, रात्री उशिरापर्यंत दोन्ही सैनिकात संघर्ष सुरु होता. यात घटनेत २० जवान शहीद झाले तर चीनच्या गंभीर जखमी पकडून साधारण ४३ सैनिकांचा मृत्यू झाल्याची बातमी मिळाली. या संघर्षामुळे चीनविरोधात भारतात संतप्त भावना आहे.

 

टॅग्स :Indiaभारतchinaचीन