शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

India China Faceoff: "चिनी लष्कर नियंत्रण रेषेवर १८ किमी भारतात घुसले"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 03:46 IST

भारताच्या हद्दीत ना कोणी घुसखोरी केली आहे, ना जमिनीवर कोणी कब्जा केला आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता.

शीलेश शर्मा

नवी दिल्ली : चीनच्या घुसखोरीवरून काँग्रेसने मोदी सरकारवरील हल्लाबोल आणखी तीव्र केला आहे. ‘स्पीक अप फॉर जवान’ या मोहिमेंतर्गत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ जारी करून म्हटले आहे की, देशाला सत्य ऐकायचे आहे. भारताच्या हद्दीत ना कोणी घुसखोरी केली आहे, ना जमिनीवर कोणी कब्जा केला आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता.त्यावर राहुल गांधी यांनी सवाल उपस्थित केला आहे. उपग्रहाने काढलेली छायाचित्रे, लष्कराचे अधिकारी व लडाखच्या लोकांचे म्हणणे आहे की, चीनने तीन ठिकाणी आमच्या जमिनीवर कब्जा केला आहे. तुम्ही म्हणता आमची जमीन गेलेली नाही. परंतु खरेच जमीन गेलेली असेल तर चीनचा फायदा होईल. पंतप्रधानांना सत्य बोलावे लागेल व देशाला सांगावे लागेल की, सत्य काय आहे?माजी संरक्षण राज्यमंत्री पल्लम राजू व जितेंद्र सिंह यांनी तर सरकारवर थेट आरोप केला आहे की, राष्टÑीय सुरक्षा व देशाच्या अखंडतेसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. चीनने भारतीय सीमेमध्ये १८ किलोमीटरपर्यंत नियंत्रण रेषेवर कब्जा केला आहे. चीनी सैन्य आता दर्बक- श्योक- दौलत बेग ओल्डी रोडपासून म्हणजेच लडाखच्या बर्टस गावापासून ७ किमी अंतरावर आहे. दौलत बेगच्या हवाईपट्टीपासून केवळ २५ किलोमीटरचे हे अंतर आहे. असे असले तरी मोदी म्हणतात की, भारतीय सीमेमध्ये कोणीही घुसखोरी केलेली नाही.।सरकारवर टीकास्त्रकाँग्रेसने सुरू केलेल्या देशव्यापी आंदोलनांतर्गत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.चीनच्या लष्कराने लडाख भागात ज्या जमिनीवर कब्जा केला आहे, ती जमीन मोदी सरकार कधी व कशी परत घेणार आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी