शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
13
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

India China Faceoff: "चिनी लष्कर नियंत्रण रेषेवर १८ किमी भारतात घुसले"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 03:46 IST

भारताच्या हद्दीत ना कोणी घुसखोरी केली आहे, ना जमिनीवर कोणी कब्जा केला आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता.

शीलेश शर्मा

नवी दिल्ली : चीनच्या घुसखोरीवरून काँग्रेसने मोदी सरकारवरील हल्लाबोल आणखी तीव्र केला आहे. ‘स्पीक अप फॉर जवान’ या मोहिमेंतर्गत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ जारी करून म्हटले आहे की, देशाला सत्य ऐकायचे आहे. भारताच्या हद्दीत ना कोणी घुसखोरी केली आहे, ना जमिनीवर कोणी कब्जा केला आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता.त्यावर राहुल गांधी यांनी सवाल उपस्थित केला आहे. उपग्रहाने काढलेली छायाचित्रे, लष्कराचे अधिकारी व लडाखच्या लोकांचे म्हणणे आहे की, चीनने तीन ठिकाणी आमच्या जमिनीवर कब्जा केला आहे. तुम्ही म्हणता आमची जमीन गेलेली नाही. परंतु खरेच जमीन गेलेली असेल तर चीनचा फायदा होईल. पंतप्रधानांना सत्य बोलावे लागेल व देशाला सांगावे लागेल की, सत्य काय आहे?माजी संरक्षण राज्यमंत्री पल्लम राजू व जितेंद्र सिंह यांनी तर सरकारवर थेट आरोप केला आहे की, राष्टÑीय सुरक्षा व देशाच्या अखंडतेसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. चीनने भारतीय सीमेमध्ये १८ किलोमीटरपर्यंत नियंत्रण रेषेवर कब्जा केला आहे. चीनी सैन्य आता दर्बक- श्योक- दौलत बेग ओल्डी रोडपासून म्हणजेच लडाखच्या बर्टस गावापासून ७ किमी अंतरावर आहे. दौलत बेगच्या हवाईपट्टीपासून केवळ २५ किलोमीटरचे हे अंतर आहे. असे असले तरी मोदी म्हणतात की, भारतीय सीमेमध्ये कोणीही घुसखोरी केलेली नाही.।सरकारवर टीकास्त्रकाँग्रेसने सुरू केलेल्या देशव्यापी आंदोलनांतर्गत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.चीनच्या लष्कराने लडाख भागात ज्या जमिनीवर कब्जा केला आहे, ती जमीन मोदी सरकार कधी व कशी परत घेणार आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी