शहरं
Join us  
Trending Stories
1
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
2
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
3
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
4
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
5
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
6
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
7
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
8
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
9
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
10
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
11
"मला तुरुंगात ठेवलं तर आप प्रचार न करता ७० पैकी ७० जागा जिंकेल’’, अरविंद केजरीवाल यांचा भाजपाला टोला 
12
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
13
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
14
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
15
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
16
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
17
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
18
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
19
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
20
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

India China FaceOff: गलवानवर चीनचा अधिकार नाही, तिबेटच्या पंतप्रधानांनी फटकारलं; हा प्रदेश तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 7:55 PM

भारत अहिंसाची परंपरा ठेवणारा देश आहे. याठिकाणी त्याचे पालन होते, चीन अहिंसेच्या गोष्टी करतो पण त्याचे पालन कधीच करत नाही.

ठळक मुद्देभारत अहिंसाची परंपरा ठेवणारा देश आहे. याठिकाणी त्याचे पालन होतेचीन अहिंसेच्या गोष्टी करतो पण त्याचे पालन कधीच करत नाही. चीनने हिंसेच्या बळावर तिबेटवर कब्जा केला आहे.

नवी दिल्ली – भारतचीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तिबेट निर्वासित सरकारचे पंतप्रधान लोबसंग सांगेय यांनी गलवान खोऱ्यावर चीनचा अधिकार नाही, जर चीन सरकार अशाप्रकारे दावा करत असेल तर ते चुकीचं आहे. गलवान हे नाव लडाखने दिले आहे. मग चीनच्या दाव्याला काहीच अर्थ नाही असं सांगत त्यांनी चीन सरकारला फटकारलं आहे. दोन दिवसांपूर्वीच चीन आणि भारत यांच्या सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात झटापट झाली होती.

पंतप्रधान लोबसंग सांगेय म्हणाले की, भारत अहिंसाची परंपरा ठेवणारा देश आहे. याठिकाणी त्याचे पालन होते, चीन अहिंसेच्या गोष्टी करतो पण त्याचे पालन कधीच करत नाही. तो हिंसेचे पालन करतो. त्याचा पुरावा तिबेट आहे. चीनने हिंसेच्या बळावर तिबेटवर कब्जा केला आहे. या विवाद सोडवण्यासाठी तिबेटला जॉन ऑफ पीस बनावं लागेल. दोन्ही सीमेवरील सैन्य मागे हटलं पाहिजे. तेव्हाच शांती होईल असं ते म्हणाले.

तसेच भारत आणि चीन यांच्यामध्ये तिबेट आहे, जोपर्यंत तिबेटचा मुद्दा सुटत नाही तोपर्यंत तणाव कायम राहणार आहे. चीन आशिया खंडात नंबर वन बनू पाहत आहे. आशियात त्याचा मुकाबला भारत, इंडोनेशिया आणि जपानशी आहे. त्यासाठी तो लडाख, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, नेपाळ, भूटान यांच्यावर नियंत्रण ठेऊ इच्छितो. पहिल्यांदा त्याने डोकलामबाबत कुरापती केल्या आता लडाखमध्ये हालचाली वाढवल्या आहेत. तर दुसरीकडे नेपाळचे भारतासोबत संबंध बिघडले आहेत असं लोबसंग सांगेय यांनी सांगितले आहे.

दरम्यान, आर्थिक आघाडीवर चीनला धडा शिकवला जाऊ शकतो, पण राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक हीत यामध्ये आपल्याला निवड करावी लागेल. राष्ट्रीय सुरक्षा सर्वात प्राधान्याने आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही करार रद्द करुन चीनला संदेश देऊ शकतात. भारत आणि चीन यांच्यात जो व्यापार सुरु आहे त्याचा दुप्पट, तिप्पट फायदा चीनला होत आहे. त्यामुळे भारताने व्यापारावर नियंत्रण आणल्यास चीनवर त्याचा परिणाम पाहायला मिळेल असंही तिबेटचे पंतप्रधान लोबसंग सांगेय म्हणाले आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

भारतीय औषध उद्योगाविरोधात चीनचा छुपा डाव उघड; ‘या’ औषधाचा मोठा पुरवठा

…तर युद्ध झाल्यास भारतच पडणार चीनवर भारी; सैन्याने केलीय ‘अशाप्रकारे’ तयारी!

भारतीय रेल्वेचा चीनच्या कंपनीला मोठा झटका; ‘इतक्या’ कोटींचे कंत्राट केलं रद्द

टॅग्स :Indiaभारतchinaचीन