शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

India China FaceOff: गलवानमध्ये ८०० मीटर क्षेत्रावर चीनचा दावा; ६१ वर्षापूर्वीची ‘ती’ बातमी व्हायरल, भारत सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 07:53 IST

चीनकडून गलवान खोऱ्यातील ८०० मीटर क्षेत्रावर प्रथमच दावा यावर्षी एप्रिलमध्ये बटालियन पातळीच्या बैठकीत करण्यात आला.

ठळक मुद्दे१९५९ मध्ये भारत आणि चीन यांच्यात पेट्रोल पॉईंट १४ बाबत एकमत झाले होतेएप्रिल २०२० मध्ये चीनने भारताच्या ८०० मीटर क्षेत्रावर दावा केला१९६२ चा पेपर कटिंग सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला

नवी दिल्ली – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात रविवारी झालेल्या टेलिफोन संवादानंतर चीनने एलएसीवरील सैनिक मागे हटवण्यावर सहमती दर्शवली. पेट्रोल पॉईंट १४ ही तीच जागा आहे ज्यासाठी दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरु आहे. याठिकाणी चिनी सैनिकांनी बंकर उभे केले, त्यानंतर रक्तरंजित संघर्ष झाला. त्यात भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचेही अनेक सैनिक मारले गेले. चीनने भारतीय सीमेत ८०० मीटर परिसरावर दावा केला होता हे आता स्पष्ट झालं आहे.

चीनकडून गलवान खोऱ्यातील ८०० मीटर क्षेत्रावर प्रथमच दावा यावर्षी एप्रिलमध्ये बटालियन पातळीच्या बैठकीत करण्यात आला. त्यानंतर गलवान आणि श्योक नद्यांच्या संगमावर भारताने पूल बांधण्यास सुरुवात केली. तथापि, १५ जूनचा हिंसक संघर्ष या घटनेशी संबंधित नाही. कारण ६१ वर्षापूर्वी जो करार झाला होता त्याची भारतीय सैन्याला पूर्ण माहिती होती. वास्तविक, १९५९ मध्ये भारत आणि चीन यांच्यात पेट्रोल पॉईंट १४ बाबत एकमत झाले होते, त्यानंतर अनेक वर्षांपासून येथे दोन्ही सैन्यात संघर्ष झाला नाही. पण एप्रिल २०२० मध्ये चीनने भारताच्या ८०० मीटर क्षेत्रावर दावा केला त्यावर ६१ वर्षापूर्वी  सहमती झाली होती.

अशा परिस्थितीत पुन्हा एकदा गलवान खोऱ्यात सैन्य मागे घेण्याची बातमी आली तेव्हा १९६२ चा पेपर कटिंग सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. या वृत्तपत्राचं शीर्षक असं होतं- 'चीन सैन्य गलवान पोस्टमधून मागे हटणार, दिल्लीच्या इशाऱ्याचा परिणाम दिसून येत असल्याचेही लिहिले गेले आहे.

किमान या बातमीमुळे भारताला सावध राहण्याचा संदेश तरी मिळाला आहे. कारण यानंतर बरोबर ९१ दिवसांनी १९६२ चं युद्ध झालं होतं. ज्यात चीनने आपले सैन्य गलवान आणि बर्‍याच भागात पाठवले होते. १५ जूनच्या संघर्षानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सैन्याच्या मदतीने परिस्थितीवर सतत नजर ठेवत आहेत, त्यानंतर परिस्थिती आता पुन्हा सावरताना दिसत आहे. सध्यातरी दोन्ही देशाच्या प्रतिनिधींनी शांतता प्रस्थापित राहण्यासाठी सहमती दर्शवत एकमत करण्याच्या मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावchinaचीनIndiaभारतIndian Armyभारतीय जवानAjit Dovalअजित डोवाल