India China FaceOff: ...तर १९६२ पेक्षा जास्त नुकसान होईल; घुसखोरीत अपयशी ठरलेल्या चीनची भारताला धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 11:06 AM2020-09-01T11:06:24+5:302020-09-01T11:09:37+5:30

देशांतर्गत प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी भारत तणाव वाढवतोय; चीनच्या उलट्या बोंबा

India China FaceOff china can make india suffer severe military losses says global times | India China FaceOff: ...तर १९६२ पेक्षा जास्त नुकसान होईल; घुसखोरीत अपयशी ठरलेल्या चीनची भारताला धमकी 

India China FaceOff: ...तर १९६२ पेक्षा जास्त नुकसान होईल; घुसखोरीत अपयशी ठरलेल्या चीनची भारताला धमकी 

googlenewsNext

नवी दिल्ली: भारत आणि चीनमधील तणाव कायम आहे. २९ आणि ३० ऑगस्टला चिनी सैन्यानं पूर्व लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय जवानांनी त्यांचा प्रयत्न उधळून लावला. यानंतर चिनी सरकारचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सनं भारताला उघड धमकी दिली आहे. भारताला आमच्याशी कोणतीही स्पर्धा करायची असल्यास त्यांना १९६२ पेक्षा जास्त नुकसान सहन करावं लागेल, असा इशारा ग्लोबल टाईम्सनं दिला आहे. 

LAC पार गेलेल्या जवानांना तात्काळ मागे बोलवा, चीनकडून भारतावर गंभीर आरोप

भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्यानं चिनी सैन्याचे घुसखोरीचे मनसुबे उधळले गेले. लडाखमधल्या पँगाँग सरोवरच्या दक्षिण किनाऱ्याजवळ भारत आणि चीनचे जवान भिडले. भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिल्यानं चिनी सैन्याला घुसखोरी करता आली नाही. यानंतर चीन सरकारनं पुन्हा एकदा बातचीत करून प्रश्न सोडवण्याची भाषा सुरू केली. तर चिनी सरकारचं ग्लोबल टाईम्सनं भारताला थेट धमकी दिली आहे.

शाब्बास पठ्ठ्यांनो! पँगौंग तलावानजीक ‘Strategic Height’वर भारताचा कब्जा; चीनला जबरदस्त दणका

'भारतानं चिनी सैन्याला आधीच रोखलं, असं भारतानं म्हटलं आहे. त्यामुळे भारतानंच आधी विध्वंसक पाऊल उचललं आणि संघर्षाची सुरुवात केली, हे स्पष्ट आहे. भारतामध्ये अनेक समस्या आहेत. रविवारी भारतात ७८ हजार कोरोना रुग्ण आढळले. त्यांच्या अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातील तणाव वाढवून भारत देशातील समस्यांवरून लक्ष विचलित करू पाहतोय,' असं ग्लोबल टाईम्सनं संपादकीय लेखात म्हटलं आहे.

लडाखमध्ये राफेलच्या उपस्थितीनं चीन घाबरला, तैनात केली जे-20 विमानं

पीपल्स लिबरेशन आर्मी देशाच्या इंचनइंच जमिनीचं संरक्षण करण्यास सज्ज आहे. भारत एका सामर्थ्यशाली चीनचा सामना करतोय, हे त्यांना लक्षात ठेवावं. आमच्याकडे पुरेसं सैन्य आहे. चीन भारताला संघर्षासाठी चिथावणी देत नाही. मात्र आम्ही आमच्या जमिनीवर अतिक्रमण होऊ देणार नाही. चिनी जनता सरकारच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे, असं ग्लोबल टाईम्सनं म्हटलं आहे.

Web Title: India China FaceOff china can make india suffer severe military losses says global times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.