शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

India China FaceOff: अखेर चीनने केलं मान्य! भारतासोबतच्या संघर्षात चिनी कमांडर अधिकारी गमावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 20:00 IST

गलवान खोऱ्यात १५ जून रोजी कर्नल संतोष बाबू आणि काही जवानांवर चिनी सैनिकांनी हल्ला केला होता. कर्नल संतोष बाबू यांच्यावर झालेल्या हल्ल्याने भारतीय सैनिक संतापले होते

ठळक मुद्दे१५ जून रोजी कर्नल संतोष बाबू आणि काही जवानांवर चिनी सैनिकांनी हल्ला केला होताबिहार रेजिमेटसोबत त्याठिकाणी पंजाब रेजिमेंटचे शिख जवानही उपस्थित होते चिनी सेनेने भारताचे १० जवान पुन्हा पाठवल्यानंतर चीनच्या अधिकाऱ्याला भारताने सोडले

नवी दिल्ली – भारत आणि चिनी सैनिकांमधील संघर्षात देशाचे २० जवान शहीद झाले, या हिंसक घटनेनंतर भारत आणि चीन यांच्यात कमांडरस्तरीय चर्चा सुरु आहे.या हिंसक संघर्षात चीनच्या सैनिकांचीही मोठी हानी झाल्याचं सांगण्यात येत होतं, मात्र चीनने या घटनेबद्दल कबुली दिली आहे. भारतासोबत झालेल्या संघर्षात चिनी सैन्यदलाच्या एका अधिकाऱ्याला गमावला असं सांगितले आहे.

गलवान खोऱ्यात १५ जून रोजी कर्नल संतोष बाबू आणि काही जवानांवर चिनी सैनिकांनी हल्ला केला होता. कर्नल संतोष बाबू यांच्यावर झालेल्या हल्ल्याने भारतीय सैनिक संतापले होते, बिहार रेजिमेटसोबत त्याठिकाणी पंजाब रेजिमेंटचे शिख जवानही उपस्थित होते. त्यातील काही सैन्यांनी चिनी अधिकाऱ्याला उचलून आणले. त्यानंतर चिनी सेनेने भारताचे १० जवान पुन्हा पाठवल्यानंतर चीनच्या अधिकाऱ्याला भारताने सोडले.

ही घटना १५ जूनच्या रात्री घडली. तोपर्यंत कर्नल संतोष बाबू यांच्या हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं होतं. बिहार रेजिमेंट तसेच पंजाब रेजिमेंटमधील शीख सैनिकही बदला घेण्यासाठी चिनी छावणीत घुलसे. वृत्तवाहिनी एबीपीनुसार, शीख सैनिकांनी चिनी सैनिकांवर हल्ला केला आणि नंतर एका चिनी अधिकाऱ्याला उचलले.

१५ जूनला रात्री काय घडले?

१५ जून रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास कर्नल संतोष बाबू आणि ३५-४० सैनिक त्याच्यासमवेत गलवान खोऱ्यात पेट्रोलिंग पॉईंट -१४ वर गेले. तेथे चिनी सैनिकांचा तंबू होता, चर्चेनुसार हा तंबू हटवण्याचं मान्य करण्यात आलं होतं. तंबू हटवण्यास सांगितले असता चिनी सैन्याने अधिकाऱ्यावर हल्ला केला. यानंतर भयंकर झटापट आणि काही दगडफेक करण्यात आली. या पहिल्या चकमकीत भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांवर विजय मिळवला. हा संघर्ष थोड्यावेळाने शांत झाला.

भारतीय सैन्याने दुसर्‍या टीमला बोलावले

यानंतर भारतीय सैन्याच्या दुसऱ्या चमूलाही तेथे बोलावण्यात आले होते कारण चिनी सैनिक आणखी काही करु शकतात असा संशय होता दरम्यान, चिनी सैनिकांची एक मोठी टीमही तिथे आली. त्यानंतर आणखी एक रक्तरंजित संघर्ष सुरू झाला. या चकमकीत कर्नल संतोष बाबू यांच्यासह काही सैनिक नदीत खाली पडले. चीनमधील मोठ्या संख्येने सैनिकही गंभीर जखमी झाले आणि तेही नदीत पडले. जेव्हा हा दुसरा संघर्ष थांबला तेव्हा भारत आणि चीन या दोघांनी आपल्या सैनिकांचा शोध सुरू केला. काही सैनिक जखमी झाले आणि त्यांना बाहेर काढण्यात आले. पण कर्नल संतोष बाबू यांचा मृतदेह पाहताच सैनिक खवळले.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन