शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

India China FaceOff: अखेर चीनने केलं मान्य! भारतासोबतच्या संघर्षात चिनी कमांडर अधिकारी गमावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 20:00 IST

गलवान खोऱ्यात १५ जून रोजी कर्नल संतोष बाबू आणि काही जवानांवर चिनी सैनिकांनी हल्ला केला होता. कर्नल संतोष बाबू यांच्यावर झालेल्या हल्ल्याने भारतीय सैनिक संतापले होते

ठळक मुद्दे१५ जून रोजी कर्नल संतोष बाबू आणि काही जवानांवर चिनी सैनिकांनी हल्ला केला होताबिहार रेजिमेटसोबत त्याठिकाणी पंजाब रेजिमेंटचे शिख जवानही उपस्थित होते चिनी सेनेने भारताचे १० जवान पुन्हा पाठवल्यानंतर चीनच्या अधिकाऱ्याला भारताने सोडले

नवी दिल्ली – भारत आणि चिनी सैनिकांमधील संघर्षात देशाचे २० जवान शहीद झाले, या हिंसक घटनेनंतर भारत आणि चीन यांच्यात कमांडरस्तरीय चर्चा सुरु आहे.या हिंसक संघर्षात चीनच्या सैनिकांचीही मोठी हानी झाल्याचं सांगण्यात येत होतं, मात्र चीनने या घटनेबद्दल कबुली दिली आहे. भारतासोबत झालेल्या संघर्षात चिनी सैन्यदलाच्या एका अधिकाऱ्याला गमावला असं सांगितले आहे.

गलवान खोऱ्यात १५ जून रोजी कर्नल संतोष बाबू आणि काही जवानांवर चिनी सैनिकांनी हल्ला केला होता. कर्नल संतोष बाबू यांच्यावर झालेल्या हल्ल्याने भारतीय सैनिक संतापले होते, बिहार रेजिमेटसोबत त्याठिकाणी पंजाब रेजिमेंटचे शिख जवानही उपस्थित होते. त्यातील काही सैन्यांनी चिनी अधिकाऱ्याला उचलून आणले. त्यानंतर चिनी सेनेने भारताचे १० जवान पुन्हा पाठवल्यानंतर चीनच्या अधिकाऱ्याला भारताने सोडले.

ही घटना १५ जूनच्या रात्री घडली. तोपर्यंत कर्नल संतोष बाबू यांच्या हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं होतं. बिहार रेजिमेंट तसेच पंजाब रेजिमेंटमधील शीख सैनिकही बदला घेण्यासाठी चिनी छावणीत घुलसे. वृत्तवाहिनी एबीपीनुसार, शीख सैनिकांनी चिनी सैनिकांवर हल्ला केला आणि नंतर एका चिनी अधिकाऱ्याला उचलले.

१५ जूनला रात्री काय घडले?

१५ जून रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास कर्नल संतोष बाबू आणि ३५-४० सैनिक त्याच्यासमवेत गलवान खोऱ्यात पेट्रोलिंग पॉईंट -१४ वर गेले. तेथे चिनी सैनिकांचा तंबू होता, चर्चेनुसार हा तंबू हटवण्याचं मान्य करण्यात आलं होतं. तंबू हटवण्यास सांगितले असता चिनी सैन्याने अधिकाऱ्यावर हल्ला केला. यानंतर भयंकर झटापट आणि काही दगडफेक करण्यात आली. या पहिल्या चकमकीत भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांवर विजय मिळवला. हा संघर्ष थोड्यावेळाने शांत झाला.

भारतीय सैन्याने दुसर्‍या टीमला बोलावले

यानंतर भारतीय सैन्याच्या दुसऱ्या चमूलाही तेथे बोलावण्यात आले होते कारण चिनी सैनिक आणखी काही करु शकतात असा संशय होता दरम्यान, चिनी सैनिकांची एक मोठी टीमही तिथे आली. त्यानंतर आणखी एक रक्तरंजित संघर्ष सुरू झाला. या चकमकीत कर्नल संतोष बाबू यांच्यासह काही सैनिक नदीत खाली पडले. चीनमधील मोठ्या संख्येने सैनिकही गंभीर जखमी झाले आणि तेही नदीत पडले. जेव्हा हा दुसरा संघर्ष थांबला तेव्हा भारत आणि चीन या दोघांनी आपल्या सैनिकांचा शोध सुरू केला. काही सैनिक जखमी झाले आणि त्यांना बाहेर काढण्यात आले. पण कर्नल संतोष बाबू यांचा मृतदेह पाहताच सैनिक खवळले.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन