शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

India China FaceOff: मोठी बातमी! चीनसोबत झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद; लष्कराची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 23:07 IST

एलएसी येथे झालेल्या या चकमकीनंतर दिल्लीतही बैठकीची फेऱ्या सुरू झाल्या. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ चीफ स्टाफ जनरल बिपिन रावत आणि लष्कर प्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांची भेट घेतली.

नवी दिल्ली – भारत आणि चीन सैनिकांमध्ये १५ आणि १६ जून रोज गलवान खोऱ्यात संघर्ष झाला. या परिसरात तैनात असलेले  जवान जखमी झाले आहेत. त्यातील २० जणांचा मृत्यू झाला आहे. भारतीय लष्कर देशाच्या अखंडतेसाठी आणि संरक्षणासाठी कटीबद्ध आहे अशी प्रतिक्रिया भारतीय लष्काराने दिली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार लडाख सीमेवर गलवान खोऱ्यात भारत आणि चीनी सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता. यातील जखमी झालेल्या चीनच्या सैनिकांना एअरलिफ्ट करण्यासाठी चिनी हेलिकॉप्टरच्या हालचाली वाढल्या आहेत.

सीमेवर सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पेइंचिंगमध्ये चीनच्या उपपरराष्ट्र मंत्री लुओ झाओहुई यांनी भारतीय राजदूत विक्रम मिसरी यांची भेट घेतली. भारतीय सूत्रांनुसार चीनच्या ४३ सैनिकांपैकी काहींचा मृत्यू तर काही गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे.

यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेबाबत निवेदन दिले होते. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की भारताने नेहमीच एलएसीचा आदर केला आहे आणि चीननेही तसे केले पाहिजे. सोमवारी एलएसीमध्ये जे घडले ते टाळता आले असते. दोन्ही देशांचे नुकसान झाले आहे.

 

एलएसी येथे झालेल्या या चकमकीनंतर दिल्लीतही बैठकीची फेऱ्या सुरू झाल्या. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ चीफ स्टाफ जनरल बिपिन रावत आणि लष्कर प्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांची भेट घेतली. त्याचवेळी राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींना फोनवरून या प्रकरणाची माहिती दिली. त्याचवेळी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन पंतप्रधान मोदींची भेट घेतली.

 

टॅग्स :Indiaभारतchinaचीन