शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

India China FaceOff: देशाचे आणखी २४ जवान देतायेत मृत्यूशी झुंज; ११० सैनिकांना उपचाराची गरज; सूत्रांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 13:52 IST

चीनी सैनिकांनी डोंगरावरुन नि:शस्त्र सैनिकांना शोधत त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या चीनच्या हल्ल्यामुळे भारतीय सैनिक हैराण झाले त्यानंतर भारतीय सैनिकांनी त्याला सडेतोड उत्तर दिले.

नवी दिल्ली - भारत आणि चीन यांच्या संघर्षात देशाचे २० जवान शहीद झाल्यानं देशभरात संतापाची लाट उसळली आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या भारतीय आणि चीनी सैनिकांच्या झटापटीत दोन्ही देशाच्या जवानांची हानी झाली आहे. रात्रीच्या अंधारात झालेल्या या संघर्षात भारताचे जवळपास २४ जवान आताही मृत्यूशी झुंज देत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

भारताच्या जवळपास ११० सैनिकांना उपचारांची गरज आहे. या प्रकरणाची माहिती घेणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, देशातील शहीदांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. विश्वासघातकी चीनने सोमवारी रात्री नि:शस्त्र भारतीय सैनिकांवर गलवान खोऱ्यात योजनाबद्ध हल्ला आहे. लोखंडाच्या सळ्या, दांडकी, काटेरी जाळ्या या हत्यारासह बिहार रेजीमेंटच्या जवानांवर चीनी सैनिकांनी हल्ला केला. 

एका इंग्रजी वेबसाईटनुसार हॉस्पिटलमधील जखमी जवानांची माहिती असणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले आहे की, चीनी सैनिकांनी डोंगरावरुन नि:शस्त्र सैनिकांना शोधत त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या चीनच्या हल्ल्यामुळे भारतीय सैनिक हैराण झाले त्यानंतर भारतीय सैनिकांनी त्याला सडेतोड उत्तर दिले. काही जवान डोंगराच्या टेकडीवर पोहचले आणि तिथून खाली पडले त्यांच्यासोबत चिनी सैनिकही खाली पडले.

 

कर्नल संतोष बाबू यांनी चीनी सैनिकांना पेट्रोल पॉईंट १४ जवळील टेंट हटवण्यास सांगितला, दोन्ही देशाच्या सैन्य स्तरावरील बैठकीत हा परिसर रिकामा करण्याबद्दल सहमती झाली होती. तरीही चीनी सैनिकांनी भारतीय सीमेत पेट्रोल पॉईंट १४ जवळ अस्थायी टेंट बनवला होता. सैनिकांना हा टेंट हटवण्याचे निर्देश दिले होते. पण सैनिकांनी टेंट हटवण्यास नकार दिला. रविवारी याठिकाणी दगडफेकही झाली होती. चीनी सैनिकांनी यासाठी भारतीय सैन्याला जबाबदार धरलं होतं. त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा चीन आणि भारतीय सैन्यात रक्तसंघर्ष झाला. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पॉईंट १४ च्या डोंगराळ भागात चीनचे सैन्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी मोठमोठे दगड भारतीय सैनिकांच्या दिशेने फेकण्यास सुरुवात केली. भारतीय सैनिकांनी या हल्ल्याचा सामना केला. आजूबाजूला संरक्षण करण्याची संधीही मिळाली नाही. सोमवारी सकाळी चीनी सैनिकांनी भारतीय जवानांचे मृतदेह सोपवले. या संघर्षात चीनचे सैनिकही मारले गेले, भारतीय लष्कराच्या माहितीनुसार चीनचे ४० सैनिक मारल्याची चर्चा त्यांच्या सैनिकांमध्ये सुरु आहे. 

 

टॅग्स :Indiaभारतchinaचीन