शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

India China FaceOff: देशाचे आणखी २४ जवान देतायेत मृत्यूशी झुंज; ११० सैनिकांना उपचाराची गरज; सूत्रांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 13:52 IST

चीनी सैनिकांनी डोंगरावरुन नि:शस्त्र सैनिकांना शोधत त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या चीनच्या हल्ल्यामुळे भारतीय सैनिक हैराण झाले त्यानंतर भारतीय सैनिकांनी त्याला सडेतोड उत्तर दिले.

नवी दिल्ली - भारत आणि चीन यांच्या संघर्षात देशाचे २० जवान शहीद झाल्यानं देशभरात संतापाची लाट उसळली आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या भारतीय आणि चीनी सैनिकांच्या झटापटीत दोन्ही देशाच्या जवानांची हानी झाली आहे. रात्रीच्या अंधारात झालेल्या या संघर्षात भारताचे जवळपास २४ जवान आताही मृत्यूशी झुंज देत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

भारताच्या जवळपास ११० सैनिकांना उपचारांची गरज आहे. या प्रकरणाची माहिती घेणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, देशातील शहीदांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. विश्वासघातकी चीनने सोमवारी रात्री नि:शस्त्र भारतीय सैनिकांवर गलवान खोऱ्यात योजनाबद्ध हल्ला आहे. लोखंडाच्या सळ्या, दांडकी, काटेरी जाळ्या या हत्यारासह बिहार रेजीमेंटच्या जवानांवर चीनी सैनिकांनी हल्ला केला. 

एका इंग्रजी वेबसाईटनुसार हॉस्पिटलमधील जखमी जवानांची माहिती असणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले आहे की, चीनी सैनिकांनी डोंगरावरुन नि:शस्त्र सैनिकांना शोधत त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या चीनच्या हल्ल्यामुळे भारतीय सैनिक हैराण झाले त्यानंतर भारतीय सैनिकांनी त्याला सडेतोड उत्तर दिले. काही जवान डोंगराच्या टेकडीवर पोहचले आणि तिथून खाली पडले त्यांच्यासोबत चिनी सैनिकही खाली पडले.

 

कर्नल संतोष बाबू यांनी चीनी सैनिकांना पेट्रोल पॉईंट १४ जवळील टेंट हटवण्यास सांगितला, दोन्ही देशाच्या सैन्य स्तरावरील बैठकीत हा परिसर रिकामा करण्याबद्दल सहमती झाली होती. तरीही चीनी सैनिकांनी भारतीय सीमेत पेट्रोल पॉईंट १४ जवळ अस्थायी टेंट बनवला होता. सैनिकांना हा टेंट हटवण्याचे निर्देश दिले होते. पण सैनिकांनी टेंट हटवण्यास नकार दिला. रविवारी याठिकाणी दगडफेकही झाली होती. चीनी सैनिकांनी यासाठी भारतीय सैन्याला जबाबदार धरलं होतं. त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा चीन आणि भारतीय सैन्यात रक्तसंघर्ष झाला. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पॉईंट १४ च्या डोंगराळ भागात चीनचे सैन्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी मोठमोठे दगड भारतीय सैनिकांच्या दिशेने फेकण्यास सुरुवात केली. भारतीय सैनिकांनी या हल्ल्याचा सामना केला. आजूबाजूला संरक्षण करण्याची संधीही मिळाली नाही. सोमवारी सकाळी चीनी सैनिकांनी भारतीय जवानांचे मृतदेह सोपवले. या संघर्षात चीनचे सैनिकही मारले गेले, भारतीय लष्कराच्या माहितीनुसार चीनचे ४० सैनिक मारल्याची चर्चा त्यांच्या सैनिकांमध्ये सुरु आहे. 

 

टॅग्स :Indiaभारतchinaचीन