शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
3
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
4
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
5
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
6
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
8
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
9
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
10
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
11
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
12
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
13
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
14
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
15
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
16
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
17
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
18
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
19
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
20
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: देशाचे आणखी २४ जवान देतायेत मृत्यूशी झुंज; ११० सैनिकांना उपचाराची गरज; सूत्रांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 13:52 IST

चीनी सैनिकांनी डोंगरावरुन नि:शस्त्र सैनिकांना शोधत त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या चीनच्या हल्ल्यामुळे भारतीय सैनिक हैराण झाले त्यानंतर भारतीय सैनिकांनी त्याला सडेतोड उत्तर दिले.

नवी दिल्ली - भारत आणि चीन यांच्या संघर्षात देशाचे २० जवान शहीद झाल्यानं देशभरात संतापाची लाट उसळली आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या भारतीय आणि चीनी सैनिकांच्या झटापटीत दोन्ही देशाच्या जवानांची हानी झाली आहे. रात्रीच्या अंधारात झालेल्या या संघर्षात भारताचे जवळपास २४ जवान आताही मृत्यूशी झुंज देत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

भारताच्या जवळपास ११० सैनिकांना उपचारांची गरज आहे. या प्रकरणाची माहिती घेणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, देशातील शहीदांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. विश्वासघातकी चीनने सोमवारी रात्री नि:शस्त्र भारतीय सैनिकांवर गलवान खोऱ्यात योजनाबद्ध हल्ला आहे. लोखंडाच्या सळ्या, दांडकी, काटेरी जाळ्या या हत्यारासह बिहार रेजीमेंटच्या जवानांवर चीनी सैनिकांनी हल्ला केला. 

एका इंग्रजी वेबसाईटनुसार हॉस्पिटलमधील जखमी जवानांची माहिती असणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले आहे की, चीनी सैनिकांनी डोंगरावरुन नि:शस्त्र सैनिकांना शोधत त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या चीनच्या हल्ल्यामुळे भारतीय सैनिक हैराण झाले त्यानंतर भारतीय सैनिकांनी त्याला सडेतोड उत्तर दिले. काही जवान डोंगराच्या टेकडीवर पोहचले आणि तिथून खाली पडले त्यांच्यासोबत चिनी सैनिकही खाली पडले.

 

कर्नल संतोष बाबू यांनी चीनी सैनिकांना पेट्रोल पॉईंट १४ जवळील टेंट हटवण्यास सांगितला, दोन्ही देशाच्या सैन्य स्तरावरील बैठकीत हा परिसर रिकामा करण्याबद्दल सहमती झाली होती. तरीही चीनी सैनिकांनी भारतीय सीमेत पेट्रोल पॉईंट १४ जवळ अस्थायी टेंट बनवला होता. सैनिकांना हा टेंट हटवण्याचे निर्देश दिले होते. पण सैनिकांनी टेंट हटवण्यास नकार दिला. रविवारी याठिकाणी दगडफेकही झाली होती. चीनी सैनिकांनी यासाठी भारतीय सैन्याला जबाबदार धरलं होतं. त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा चीन आणि भारतीय सैन्यात रक्तसंघर्ष झाला. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पॉईंट १४ च्या डोंगराळ भागात चीनचे सैन्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी मोठमोठे दगड भारतीय सैनिकांच्या दिशेने फेकण्यास सुरुवात केली. भारतीय सैनिकांनी या हल्ल्याचा सामना केला. आजूबाजूला संरक्षण करण्याची संधीही मिळाली नाही. सोमवारी सकाळी चीनी सैनिकांनी भारतीय जवानांचे मृतदेह सोपवले. या संघर्षात चीनचे सैनिकही मारले गेले, भारतीय लष्कराच्या माहितीनुसार चीनचे ४० सैनिक मारल्याची चर्चा त्यांच्या सैनिकांमध्ये सुरु आहे. 

 

टॅग्स :Indiaभारतchinaचीन