शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

India China Face Off: पंतप्रधान, संरक्षणमंत्री गप्प का?-काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 06:52 IST

भारताचे जवान शहीद; विरोधकांचं मोदी सरकारवर टीकास्त्र

नवी दिल्ली : चीनच्या सैन्याकडून लडाखमधील तीन ठिकाणी घुसखोरी करण्यात आल्याने संपूर्ण चिंतित आहे. परंतु चीनच्या या चुकीच्या पाऊलाबाबत मोदी सरकारने मात्र मौन बाळगले असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे. चीनी सैनिकांकडून लडाखमधील गलवान नदीचे खोरे, हॉट स्पिंग आणि पेंगोंग सरोवर या परिसरात घुसखोरी केल्याच्या वृत्तानंतर सुरजेवाला यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले की, भारताची भौगोलिक सुरक्षा आणि एकता याबाबत समझोता केला जाऊ शकत नाही. परंतु आलेल्या बातम्यांवरून चीनने गलवान नदीचे खोरे, हॉट स्पिंग आणि पेंगोंग सरोवर या परिसरात अतिक्रमण केल्याचे दिसत आहे. मागील पाच दशकांत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ एकही दुर्घटना घडलेली नाही. भारताचा एकही सैनिक भारत-चीन सीमेवर शहीद झालेला नाही. पण आता भारताचा एक अधिकारी आणि दोन सैनिक शहीद झालेआहेत.आपले सैनिक सैनिक शहीद होणे ही बाब गंभीर आणि अस्वीकारार्ह आहे. संपूर्ण देश चिडलेला असताना पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग मात्र गप्प बसले आहेत. या घटनेबाबत पंतप्रधानांनी देशासमोर उत्तर दिले पाहिजे. आपले सैनिक शहीद झाले असतील किंवा जखमी झाले असतील तर हे खरे आहे का हे जनतेला सांगितले पाहिजे. पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्री यावर गप्प का बसले आहेत, असेही सुरजेवाला यांनी म्हटले आहे.जनतेसमोर नेमके चित्र मांडले पाहिजे - एच. डी. देवेगौडामाजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा म्हणाले की, चीनची घुसखोरी चिंताजनक आहे. सीमेवरून येणाऱ्या बातम्या विचलित करणाºया आहेत. सीमेवर त्या ठिकाणी नेमके काय घडले आहे याचे चित्र देशासमोर स्पष्टपणे मांडले गेले पाहिजे.ठोस उत्तर देण्याची वेळ - कॅप्टन अमरिंदर सिंगचीनच्या या कृत्याबाबत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, देशाचे रक्षण करताना दररोज आमच्या सैनिकांचे बळी जावेत इतके त्यांचे आयुष्य स्वस्त नाही. चीनची सतत आक्रमण करण्याची वृत्ती आणि आपल्या प्रादेशिक अधिकाराचे उघडउघड केलेले उल्लंघन या विरोधात भारताने आता उत्तर देण्याची वेळ आली आहे....मग मरेपर्यंत मारहाण केली काय? - ओेमर अब्दुल्लानॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला म्हणाले की, तणावाच्या स्थितीत दोन्ही देशांकडून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच चीनकडून भारताच्या तीन जवानांना गोळ््या घातल्या जात असतील तर ही स्थिती किती गंभीर आहे हे लक्षात घ्यावे. अब्दुल्ला यांच्या टिप्पणीवर एका युजरने गलवान भागात सैन्याकडून गोळीबार झाला नसल्याचे लक्षात आणून देताच अब्दुल्ला यांनी प्रतिप्रश्न केला आहे की, याचा अर्थ त्यांना मरेपर्यंत मारहाण करण्यात आली की काय? मग हे तर आणखी भयानक आहे.तामिळनाडूची शहीद जवानाच्या कुटुंबीयांना २० लाखांची मदतया हल्ल्यात शहीद झालेले एक सैनिक के. पलानी मूळचे तामिळनाडूतील रामनाथपुरम जिल्ह्याच्या कडूक्कलूर गावातील आहेत.मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी या सैनिकाच्या कुटुंबीयांना २० लाखांची मदत जाहीर केली आहे. अण्णा डीमके आणि विरोधी पक्ष डीएमके या दोघांनाही शहीद अधिकारी आणि दोन जवानांना आदरांजली वाहिली.एमडीएमकेचे महासचिव वायको यांनी आरोप केला की, जगभर कोरोना विषाणूचा प्रसाराला कारणीभूत ठरल्याने टीकेचा धनी ठरलेल्या चीनने हे कृत्य जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी उचलले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajnath Singhराजनाथ सिंहcongressकाँग्रेस