शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

India China Face Off: पंतप्रधान, संरक्षणमंत्री गप्प का?-काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 06:52 IST

भारताचे जवान शहीद; विरोधकांचं मोदी सरकारवर टीकास्त्र

नवी दिल्ली : चीनच्या सैन्याकडून लडाखमधील तीन ठिकाणी घुसखोरी करण्यात आल्याने संपूर्ण चिंतित आहे. परंतु चीनच्या या चुकीच्या पाऊलाबाबत मोदी सरकारने मात्र मौन बाळगले असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे. चीनी सैनिकांकडून लडाखमधील गलवान नदीचे खोरे, हॉट स्पिंग आणि पेंगोंग सरोवर या परिसरात घुसखोरी केल्याच्या वृत्तानंतर सुरजेवाला यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले की, भारताची भौगोलिक सुरक्षा आणि एकता याबाबत समझोता केला जाऊ शकत नाही. परंतु आलेल्या बातम्यांवरून चीनने गलवान नदीचे खोरे, हॉट स्पिंग आणि पेंगोंग सरोवर या परिसरात अतिक्रमण केल्याचे दिसत आहे. मागील पाच दशकांत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ एकही दुर्घटना घडलेली नाही. भारताचा एकही सैनिक भारत-चीन सीमेवर शहीद झालेला नाही. पण आता भारताचा एक अधिकारी आणि दोन सैनिक शहीद झालेआहेत.आपले सैनिक सैनिक शहीद होणे ही बाब गंभीर आणि अस्वीकारार्ह आहे. संपूर्ण देश चिडलेला असताना पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग मात्र गप्प बसले आहेत. या घटनेबाबत पंतप्रधानांनी देशासमोर उत्तर दिले पाहिजे. आपले सैनिक शहीद झाले असतील किंवा जखमी झाले असतील तर हे खरे आहे का हे जनतेला सांगितले पाहिजे. पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्री यावर गप्प का बसले आहेत, असेही सुरजेवाला यांनी म्हटले आहे.जनतेसमोर नेमके चित्र मांडले पाहिजे - एच. डी. देवेगौडामाजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा म्हणाले की, चीनची घुसखोरी चिंताजनक आहे. सीमेवरून येणाऱ्या बातम्या विचलित करणाºया आहेत. सीमेवर त्या ठिकाणी नेमके काय घडले आहे याचे चित्र देशासमोर स्पष्टपणे मांडले गेले पाहिजे.ठोस उत्तर देण्याची वेळ - कॅप्टन अमरिंदर सिंगचीनच्या या कृत्याबाबत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, देशाचे रक्षण करताना दररोज आमच्या सैनिकांचे बळी जावेत इतके त्यांचे आयुष्य स्वस्त नाही. चीनची सतत आक्रमण करण्याची वृत्ती आणि आपल्या प्रादेशिक अधिकाराचे उघडउघड केलेले उल्लंघन या विरोधात भारताने आता उत्तर देण्याची वेळ आली आहे....मग मरेपर्यंत मारहाण केली काय? - ओेमर अब्दुल्लानॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला म्हणाले की, तणावाच्या स्थितीत दोन्ही देशांकडून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच चीनकडून भारताच्या तीन जवानांना गोळ््या घातल्या जात असतील तर ही स्थिती किती गंभीर आहे हे लक्षात घ्यावे. अब्दुल्ला यांच्या टिप्पणीवर एका युजरने गलवान भागात सैन्याकडून गोळीबार झाला नसल्याचे लक्षात आणून देताच अब्दुल्ला यांनी प्रतिप्रश्न केला आहे की, याचा अर्थ त्यांना मरेपर्यंत मारहाण करण्यात आली की काय? मग हे तर आणखी भयानक आहे.तामिळनाडूची शहीद जवानाच्या कुटुंबीयांना २० लाखांची मदतया हल्ल्यात शहीद झालेले एक सैनिक के. पलानी मूळचे तामिळनाडूतील रामनाथपुरम जिल्ह्याच्या कडूक्कलूर गावातील आहेत.मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी या सैनिकाच्या कुटुंबीयांना २० लाखांची मदत जाहीर केली आहे. अण्णा डीमके आणि विरोधी पक्ष डीएमके या दोघांनाही शहीद अधिकारी आणि दोन जवानांना आदरांजली वाहिली.एमडीएमकेचे महासचिव वायको यांनी आरोप केला की, जगभर कोरोना विषाणूचा प्रसाराला कारणीभूत ठरल्याने टीकेचा धनी ठरलेल्या चीनने हे कृत्य जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी उचलले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajnath Singhराजनाथ सिंहcongressकाँग्रेस