शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

India China Face Off: जुना मित्र कामी येणार; चीनला भिडणाऱ्या भारताला 'ब्रह्मास्त्र' देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 09:54 IST

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशिया दौऱ्यावर; एस-४०० लवकर सोपवण्याची मागणी करणार

ठळक मुद्देसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह आजपासून तीन दिवसांच्या रशियाच्या दौऱ्यावरभारत रशियाकडे एस-४०० क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा लवकर देण्याची मागणी करणारचीनसोबतचे संबंध ताणले गेल्यानं शस्त्रास्त्र सज्जता वाढवण्यावर भारताचा भर

नवी दिल्ली: लडाख सीमेवर तणाव निर्माण झाल्यामुळे भारत-चीनमधील संबंध विकोपाला गेले आहेत. भारतानं सीमावर्ती भागातील फौजफाटा वाढवला आहे. चिनी सैन्याला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराला पूर्ण मोकळीक देण्यात आली. यासोबतच आपलं सामर्थ्य वाढवण्याच्या दृष्टीनं भारतानं पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. जुना मित्र असलेल्या रशियासोबत भारतानं क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा एस-४०० साठी करार केला होता. ही क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा लवकरात लवकर मिळावी यासाठी भारतानं प्रयत्न केले आहेत.२०१८ मध्ये भारतानं एस-४०० साठी रशियासोबत ५ अब्ज डॉलरचा करार केला. कोरोनाचं संकट आल्यानं एस-४०० यंत्रणा मिळण्यास विलंब होत आहे. ही यंत्रणा डिसेंबर २०२१ पर्यंत मिळण्याची शक्यता आहे. मात्र चीनसोबत निर्माण झालेला संघर्ष पाहता ही यंत्रणा लवकरात लवकर मिळवण्याच्या दृष्टीनं भारतानं प्रयत्न सुरू केले आहेत. सैन्याला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चीनसोबत उडालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर गेले आहेत. कोरोनाचं संकट असल्यानं सध्याच्या घडीला मंत्री परदेश दौरे टाळत आहेत. मात्र तरीही सध्या निर्माण झालेली परिस्थिती पाहता सिंह चीनसाठी रवाना होत आहेत. सिंह यांचा रशिया दौरा तीन दिवसांचा असेल. एस-४०० क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा लवकरात लवकर देण्यात यावी, असा आग्रह सिंह यांच्याकडून रशियाकडे करण्यात येणार आहे. भारतानं गेल्याच वर्षी एस-४०० साठी आगाऊ रक्कम दिली आहे. चीनच्या ताफ्यात आधीपासूनच एस-४०० यंत्रणा आहे.चीनसोबतचे संबंध ताणले गेल्यानं भारतानं अधिकाधिक शस्त्रास्त्र सज्ज होण्यावर भर दिला आहे. त्यामुळेच एस-४०० यंत्रणा लवकरात लवकर मिळवण्यासाठी भारतानं प्रयत्न सुरू केले आहेत. रशिया भारतासोबतच आणखी काही देशांना ही यंत्रणा देणार आहे. मात्र त्यांच्या आधी ही यंत्रणाआपल्याला मिळावी, असा भारताचा प्रयत्न आहे. दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंधांचा संदर्भ देऊन एस-४०० यंत्रणा लवकर सोपवण्याची मागणी करण्यात येणार आहे. सुखोई, मिगच्या विमानांचे सुट्टे भाग मिळावेत आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांचा पुरवठा थांबू नये, अशा मागण्या रशियाकडे केल्या जाणार आहेत.

टॅग्स :Indiaभारतchinaचीनrussiaरशिया