शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

India China Face Off: जुना मित्र कामी येणार; चीनला भिडणाऱ्या भारताला 'ब्रह्मास्त्र' देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 09:54 IST

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशिया दौऱ्यावर; एस-४०० लवकर सोपवण्याची मागणी करणार

ठळक मुद्देसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह आजपासून तीन दिवसांच्या रशियाच्या दौऱ्यावरभारत रशियाकडे एस-४०० क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा लवकर देण्याची मागणी करणारचीनसोबतचे संबंध ताणले गेल्यानं शस्त्रास्त्र सज्जता वाढवण्यावर भारताचा भर

नवी दिल्ली: लडाख सीमेवर तणाव निर्माण झाल्यामुळे भारत-चीनमधील संबंध विकोपाला गेले आहेत. भारतानं सीमावर्ती भागातील फौजफाटा वाढवला आहे. चिनी सैन्याला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराला पूर्ण मोकळीक देण्यात आली. यासोबतच आपलं सामर्थ्य वाढवण्याच्या दृष्टीनं भारतानं पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. जुना मित्र असलेल्या रशियासोबत भारतानं क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा एस-४०० साठी करार केला होता. ही क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा लवकरात लवकर मिळावी यासाठी भारतानं प्रयत्न केले आहेत.२०१८ मध्ये भारतानं एस-४०० साठी रशियासोबत ५ अब्ज डॉलरचा करार केला. कोरोनाचं संकट आल्यानं एस-४०० यंत्रणा मिळण्यास विलंब होत आहे. ही यंत्रणा डिसेंबर २०२१ पर्यंत मिळण्याची शक्यता आहे. मात्र चीनसोबत निर्माण झालेला संघर्ष पाहता ही यंत्रणा लवकरात लवकर मिळवण्याच्या दृष्टीनं भारतानं प्रयत्न सुरू केले आहेत. सैन्याला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चीनसोबत उडालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर गेले आहेत. कोरोनाचं संकट असल्यानं सध्याच्या घडीला मंत्री परदेश दौरे टाळत आहेत. मात्र तरीही सध्या निर्माण झालेली परिस्थिती पाहता सिंह चीनसाठी रवाना होत आहेत. सिंह यांचा रशिया दौरा तीन दिवसांचा असेल. एस-४०० क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा लवकरात लवकर देण्यात यावी, असा आग्रह सिंह यांच्याकडून रशियाकडे करण्यात येणार आहे. भारतानं गेल्याच वर्षी एस-४०० साठी आगाऊ रक्कम दिली आहे. चीनच्या ताफ्यात आधीपासूनच एस-४०० यंत्रणा आहे.चीनसोबतचे संबंध ताणले गेल्यानं भारतानं अधिकाधिक शस्त्रास्त्र सज्ज होण्यावर भर दिला आहे. त्यामुळेच एस-४०० यंत्रणा लवकरात लवकर मिळवण्यासाठी भारतानं प्रयत्न सुरू केले आहेत. रशिया भारतासोबतच आणखी काही देशांना ही यंत्रणा देणार आहे. मात्र त्यांच्या आधी ही यंत्रणाआपल्याला मिळावी, असा भारताचा प्रयत्न आहे. दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंधांचा संदर्भ देऊन एस-४०० यंत्रणा लवकर सोपवण्याची मागणी करण्यात येणार आहे. सुखोई, मिगच्या विमानांचे सुट्टे भाग मिळावेत आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांचा पुरवठा थांबू नये, अशा मागण्या रशियाकडे केल्या जाणार आहेत.

टॅग्स :Indiaभारतchinaचीनrussiaरशिया