शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
Daily Top 2Weekly Top 5

India China Face Off: सोमवारी दुपारपासूनच सीमेवर संघर्षाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 03:20 IST

भारतीय सैनिकांनी दिलेल्या प्रखर प्रत्युत्तरात चीनचेही अनेक जवान मृत व जखमी

जम्मू : या संघर्षाची सुरुवात सोमवार दुपारपासूनच झाली होती. चर्चेमध्ये ठरल्यानुसार ठराविक हद्दीपर्यंत माघार घ्यावी, असा भारतीय सैनिकांनी आग्रह ठरला तेव्हा चिनी सैनिकांनी हाणामारी सुरू केली. भारतीय शहिदांमध्ये बिहार रेजिमेंटचा एक कर्नल, एक सुभेदार (जेसीओ) व एक तामिळनाडूचा रहिवासी असलेला के. पलानी नावाचा जवान आहे. भारतीय सैनिकांनी दिलेल्या प्रखर प्रत्युत्तरात चीनचेही अनेक जवान मृत व जखमी झाले आहेत. काही वृत्तसंस्थांच्या बातमीनुसार चीनने त्यांचे पाच सैनिक मारले गेल्याचे मान्य केले आहे.हा संघर्ष जेथे झाला त्याच ठिकाणी मंगळवारी सकाळी दोन्ही सैन्यदलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्फोटक परिस्थिती निवळण्यासाठी चर्चा सुरू केली. दिल्लीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसह वरिष्ठ पातळीवर बैठकीत सीमेवरील ताज्या परिस्थितीचा आढावा घेतला.भारत व चीन यांच्यात नक्की सीमाबंदी झालेली नसल्याने गेली ७० वर्षे सीमावाद सुरू आहे. सुमारे ३,५०० किमीची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ही अस्थायी सीमा मानली जाते. लडाखच्या सीमाभागात भारतीय सैन्य रस्त्यांसारखी काही पायाभूत सुविधांची कामे करत आहे. परंतु तो प्रदेश आपला असल्याचे सांगून चीन वाद उकरून काढत आहे.गेल्या पाच आठवड्यांत पॅनगाँग सरोवर, गलवान खोरे, दौलत बेग औल्डी आदी भागांवरून दोन्ही सैन्यांमध्ये तणातणी व हाणामारी होऊन तणाव निर्माण झाला होता. चीनने सीमेवरील लष्करी कुमक वाढविल्यानंतर भारतानेही वाढविली. परंतु नंतर लष्करी व राजनैतिक पातळीवर चर्चा होऊन सैन्य माघारीवर सहमती झाली. परंतु दरम्यानच्या काळात सीमेवर आणलेले जास्तीचे १० हजाराचे सैन्य वादरेषेच्या मागे घेण्यास चीन टाळाटाळ करत असल्यावरून पुन्हापुन्हा वादाचे मुद्दे उपस्थित होत आहेत.संरक्षणमंत्र्यांनी घेतला आढावासंरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी मंगळवारी सकाळी वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन सीमेवरील ताज्या परिस्थितीचा समग्र आढावा घेतला. भारताच्या हिताला बाधा पोहोचेल अशा चीनच्या कोणत्याही आगळिकीला सडेतोड उत्तर दिले जाईल, अशी ग्वाही यावेळी तिन्ही सैन्यदलांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. बैठकीला तिन्ही सैन्यदलांचे संयुक्त प्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत, लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे, हवाईदलप्रमुख एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भादुरिया व नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग यांच्यासह वरिष्ठ सैन्याधिकाऱ्यांखेरीज परराराष्ट्रमंत्री एस. जयशंकरही उपस्थित होते. लष्करप्रमुख नरवणे मंगळवारी पठाणकोट लष्करीतळास भेट देणार होते. परंतु ताज्या परिस्थितीमुळे दौरा रद्द करून ते दिल्लीतच थांबले.तणाव निवळण्यासाठी दोन्ही सैन्यांमध्ये चर्चाया घटनेनंतर लगेचच तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांच्या सैन्याधिकाºयांमध्ये मंगळवारी दुपारी चर्चेसाठी सीमेवर संघर्षाच्या जागीच बैठक सुरू झाली. भारताच्या वतीने त्यामध्ये कारू येथे मुख्यालय असलेल्या इन्फन्ट्री डिव्हिजनचे कमांडर मेजर जनरल अभिजीत बापट तर चीनच्या वतीने त्यांचे समकक्ष सैन्याधिकारी सहभागी झाले.पानगाँग त्सो सरोवर, गवलान खोरे व त्याच्या शेजारच्या सीमाभागात दोन्ही सैन्यांमध्ये तणाव झाल्यापासून अशा प्रकारची ही सहावी बैठक होती. सर्वात वरिष्ठ पातळीवरील लष्करी बैठक भारतीय लष्कराच्या लेह येथील कमांडर लेफ्ट. जनरल रहिंदर सिंग व चीनच्या तिबेट लष्करी विभागाचे प्रमुख मेजर जनरल लिऊ लिन यांच्यात सात तास झाली होती.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन