शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

चिनी अतिक्रमणाच्या प्रयत्नानंतर ओमर अब्दुल्लांना झाली अटलबिहारी वाजपेयींची आठवण, मोदी सरकारला दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 17:27 IST

चीनकडून झालेल्या अतिक्रमणाच्या प्रयत्नाला भारतीय जवानांचे चोख प्रत्युत्तर

India China Border Tawang clash: अरुणाचल प्रदेशमध्ये LAC जवळील तवांग सेक्टरमधील यांगत्से भागात चिनी सैन्याच्या घुसखोरीच्या अयशस्वी प्रयत्नावरून वाद वाढत आहे. केंद्र सरकारवर पुन्हा एकदा विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. चीनचा अतिक्रमणाचा प्रयत्न म्हणजे केंद्र सरकारचे अपयश असल्याचे विरोधकांकडून सातत्याने बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. दोन्ही देशांमधील बिघडत चाललेल्या संबंधांवरून त्यांनी केंद्र सरकारवर आगपाखड केली. त्याच वेळी, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या एका वाक्याची आठवण करून देत अब्दुल्ला यांनी मोदी सरकारला एक सल्ला दिला.

आपल्या शेजारी देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यात आपण अपयशी ठरलो हे दुर्दैवी असल्याचे अब्दुल्ला म्हणाले. पाकिस्तानसोबतच्या आमच्या संबंधांचे सत्य कोणापासून लपलेले नाही. चीनसोबतही सलोख्याचे संबंध प्रस्थापित होत नसल्याचे अनेक गोष्टींमधून दिसत आहे. आतापर्यंत चिनी सैनिकांनी लडाखमधून पूर्णपणे माघार घेतलेली नाही आणि आज अरुणाचल प्रदेशातही अतिक्रमणाच्या हालचाली घडल्यात. ही बाब चिंताजनक असल्याचे अब्दुल्ला म्हणाले.

अटलबिहारी वाजपेयी यांची झाली आठवण

देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मरण करून त्यांनी त्यांच्याच ओळी सांगितल्या आणि मोदी सरकारला सल्ला दिला. अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते की 'मित्र बदलता येतात पण शेजारी नाही.' आपण आपले शेजारी बदलू शकत नाही, परंतु आपण त्यांच्याशी चांगले संबंध ठेवू शकतो. टाळी एका हाताने वाजत नाही, दोन हातांनी वाजते. आपल्याशी चांगले संबंध ठेवणे आणि अशा कारवाया थांबवणे ही चीनचीही जबाबदारी आहे, असेही त्यांनी नमूद केले.

राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?

"या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरही चीनशी चर्चा सुरू आहे. मी सभागृहाला खात्री देऊ इच्छितो की आमचे सैन्य आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि आव्हान देण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडण्यास तयार आहे. सीमेवर झालेल्या संघर्षामध्ये दोन्ही बाजूचे काही सैनिक जखमी झाले आहेत. मी या सदनाला सांगू इच्छितो की आमचा एकही सैनिक शहीद झालेला नाही किंवा कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. भारतीय लष्करी कमांडर्सने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे PLAच्या सैन्याने त्यांच्या स्थानांवरूनच माघार घेतली," असे राजनाथ सिंह म्हणाले.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीOmar Abdullahउमर अब्दुल्ला