शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

चिनी अतिक्रमणाच्या प्रयत्नानंतर ओमर अब्दुल्लांना झाली अटलबिहारी वाजपेयींची आठवण, मोदी सरकारला दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 17:27 IST

चीनकडून झालेल्या अतिक्रमणाच्या प्रयत्नाला भारतीय जवानांचे चोख प्रत्युत्तर

India China Border Tawang clash: अरुणाचल प्रदेशमध्ये LAC जवळील तवांग सेक्टरमधील यांगत्से भागात चिनी सैन्याच्या घुसखोरीच्या अयशस्वी प्रयत्नावरून वाद वाढत आहे. केंद्र सरकारवर पुन्हा एकदा विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. चीनचा अतिक्रमणाचा प्रयत्न म्हणजे केंद्र सरकारचे अपयश असल्याचे विरोधकांकडून सातत्याने बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. दोन्ही देशांमधील बिघडत चाललेल्या संबंधांवरून त्यांनी केंद्र सरकारवर आगपाखड केली. त्याच वेळी, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या एका वाक्याची आठवण करून देत अब्दुल्ला यांनी मोदी सरकारला एक सल्ला दिला.

आपल्या शेजारी देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यात आपण अपयशी ठरलो हे दुर्दैवी असल्याचे अब्दुल्ला म्हणाले. पाकिस्तानसोबतच्या आमच्या संबंधांचे सत्य कोणापासून लपलेले नाही. चीनसोबतही सलोख्याचे संबंध प्रस्थापित होत नसल्याचे अनेक गोष्टींमधून दिसत आहे. आतापर्यंत चिनी सैनिकांनी लडाखमधून पूर्णपणे माघार घेतलेली नाही आणि आज अरुणाचल प्रदेशातही अतिक्रमणाच्या हालचाली घडल्यात. ही बाब चिंताजनक असल्याचे अब्दुल्ला म्हणाले.

अटलबिहारी वाजपेयी यांची झाली आठवण

देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मरण करून त्यांनी त्यांच्याच ओळी सांगितल्या आणि मोदी सरकारला सल्ला दिला. अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते की 'मित्र बदलता येतात पण शेजारी नाही.' आपण आपले शेजारी बदलू शकत नाही, परंतु आपण त्यांच्याशी चांगले संबंध ठेवू शकतो. टाळी एका हाताने वाजत नाही, दोन हातांनी वाजते. आपल्याशी चांगले संबंध ठेवणे आणि अशा कारवाया थांबवणे ही चीनचीही जबाबदारी आहे, असेही त्यांनी नमूद केले.

राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?

"या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरही चीनशी चर्चा सुरू आहे. मी सभागृहाला खात्री देऊ इच्छितो की आमचे सैन्य आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि आव्हान देण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडण्यास तयार आहे. सीमेवर झालेल्या संघर्षामध्ये दोन्ही बाजूचे काही सैनिक जखमी झाले आहेत. मी या सदनाला सांगू इच्छितो की आमचा एकही सैनिक शहीद झालेला नाही किंवा कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. भारतीय लष्करी कमांडर्सने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे PLAच्या सैन्याने त्यांच्या स्थानांवरूनच माघार घेतली," असे राजनाथ सिंह म्हणाले.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीOmar Abdullahउमर अब्दुल्ला