शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

जोरदार प्रत्युत्तर; भारतानं चीनच्या दिशेनं वळवली बोफोर्सची तोंडं, ड्रॅगनच्या नाकाखालून उडणार लढाऊ विमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 14:07 IST

येथील अनंतनागजवळ NH-44वर इमरजंसी धावपट्टीचे काम सुरू आहे. कुठलाही बाका प्रसंग उद्भवला तर येथे लढाऊ आणि इतर विमानं उतरवणे सहज शक्य व्हावे यासाठी ही धावपट्टी तयार करण्यात येत आहे.

ठळक मुद्देभारताने लडाखजवळील 'लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल'जवळ (LAC) धावपट्टी तयार करण्याच्या कामाला अधिक गती दिली आहे. 'लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल'जवळ (LAC) चीननेही विविध प्रकारची कामे केली आहेत.भारतही जवळपास 60 बोफोर्स आर्टिलरी तोफा लडाखजवळ फॉरवर्ड पोझिशनवर पाठवत आहे.

नवी दिल्ली :भारत आणि चीन सध्या लडाखमध्ये आमनेसामने आले आहेत. गेल्या एक महिन्यापासून दोन्ही देशांत तणावाचे वातावरण आहे. संबंधित वाद मिटवण्यासाठी दोन्ही देशांत चर्चा सुरू आहे. मात्र, असे असले तरी भारत थोडीही उनीव ठेऊ इच्छित नाही. यामुळे कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारताने लडाखजवळील 'लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल'जवळ (LAC) धावपट्टी तयार करण्याच्या कामाला अधिक गती दिली आहे. ही धावपट्टी तयार झाल्यास भारताची लढाऊ विमानं ड्रॅगनच्या नाकाखाली उतरतील आणि नाकाखालूनच उडतील. एवढेच नाही, तर भारताने आपल्या बोफोर्स आर्टिलरी तोफांची तोंडंही आता चीनच्या दिशेनं वळवली आहेत.

येथील अनंतनागजवळ NH-44वर इमरजंसी धावपट्टीचे काम सुरू आहे. कुठलाही बाका प्रसंग उद्भवला तर येथे लढाऊ आणि इतर विमानं उतरवणे सहज शक्य व्हावे यासाठी ही धावपट्टी तयार करण्यात येत आहे.

'लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल'जवळ (LAC) चीननेही विविध प्रकारची कामे केली आहेत. तसेच विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांचीही जमवाजमव सुरू आहे. तर दुसरीकडे भारतही जवळपास 60 बोफोर्स आर्टिलरी तोफा लडाखजवळ फॉरवर्ड पोझिशनवर पाठवत आहे. चीनसोबत सुरू असलेला वाद संपवण्याची आपली इच्छा आहे. मात्र, आपण कुठल्याही स्थितीचा सामना करायलाही तयार आहोत, असे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले आहे. 

दक्षिण कश्मीरमधील बिज्बेहरा भागात NH-44वर हवाई दल धावपट्टी तयार करत आहे. तिची लांबी 3 किमी. एवढी आहे. चीनसोबत सुरू असलेल्या तणावानंतर दोन दिवसांपूर्वीच या धावपट्टीचे काम सुरू झाले आहे. सध्या लॉकडाउन सुरू आहे. मात्र, असे असले तरी या कामासंदर्भातील सर्व प्रकारची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच भारत आणि चीनचे सैन्य लडाखमध्ये तैनात आहे. येथे सर्वप्रथम दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये वाद झाला होता. यानंतर चीनने तेथील सैन्य संख्या वाढवली आणि निर्माण कार्याला गती दिली. मात्र, यानंतर दोन्ही देशांत चर्चा सुरू आहे. नुकतीच पहिल्या स्थरावरील बोलनेही पूर्ण झाले आहे. आता वृत्त आले आहे, की चीनी सैनिक सीमेवर दोन किलो मीटर मागे हटले आहेत.

लडाखच्या सीमावर्ती भागात चिनी सैन्य आपले सामर्थ्य दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतीय लष्कराचे जवान देखील त्याच्यासमोर उभे राहिले आहे. दोन्ही बाजूंकडून वाटाघाटीही सुरू आहेत, परंतु अद्याप हा वाद संपलेला नाही. आता पुन्हा एकदा दोन्ही देशांच्या लष्करांची चर्चा होणार आहे. 6 जून रोजी ही बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत दोन्ही देशांच्या सैन्याचे लेफ्टनंट जर्नल रँकचे अधिकारी भाग घेतील. 

टॅग्स :border disputeसीमा वादIndiaभारतchinaचीनBorderसीमारेषाladakhलडाख