शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

जुमल्यावर देश चालविता येत नाही : सिसोदिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 01:44 IST

देश जुमल्यावर चालत नाही आणि लोकांनाही आता या गोष्टी कळालेल्या आहेत, असे प्रतिपादन दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केले.

पणजी : मागची लोकसभा निवडणूक ही जुमल्यावर लढवली गेली; परंतु देश जुमल्यावर चालत नाही आणि लोकांनाही आता या गोष्टी कळालेल्या आहेत, असे प्रतिपादन दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केले. मडगाव (गोवा) येथे शैक्षणिक परिसंवादामध्ये सहभागासाठी ते आले आहेत. सोमवारी येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गांधीजींचा चष्म्याचे प्रतीक वापरून देश स्वच्छ होत असतो, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.पंतप्रधान मोदी विकासाचे बोलतात; परंतु वास्तव वेगळेच आहे, असे त्यांनी सांगितले. साधे स्वच्छतेचे उदाहरण घ्या, देशात तुम्ही कोठेही जा, वास्तव वेगळे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. जीएसटी ही अत्यंत चांगली संकल्पना; मात्र त्याची अंमलबजावणी अत्यंत वाईट पद्धतीने केली गेली, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. एका वर्षात जीएसटीच्या नियमांत पन्नास दुरुस्त्या केल्या गेल्या. खरे तर देशासाठी व्यवहार्य जीएसटी गरजेची आहे, असे ते म्हणाले. सॅनिटरी नॅपकिन्सवर जीएसटी लागू करू नये, असे मी जीएसटीसंदर्भातील बैठकीत सांगितले होते. प्रत्यक्षात एक वर्षाने सॅनिटरी नॅपकिन्सना जीएसटीतून वगळले गेले. जीएसटीमुळे व्यापाराची प्रक्रिया सुलभ होण्याची अपेक्षा होती; प्रत्यक्षात उद्योग जगत घाबरून आहे. डिजिटलायझेशन वगैरे मोदी बोलतात; पण देशभरातील वास्तव वेगळेच आहे, असे सिसोदिया यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAAPआपBJPभाजपा