शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"त्या दिवशी चीनसोबत युद्धाला तोंड फुटले असते, पण…" लष्कराच्या बड्या अधिकाऱ्याचा मोठा गौप्यस्फोट

By बाळकृष्ण परब | Updated: February 18, 2021 11:46 IST

india china faceoff : भारत आणि चीनमधील तणाव निवळत असतानाच भारतीय लष्कराचे नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

ठळक मुद्देलडाखमधील तणावादरम्यान एकवेळ अशी आली होती जेव्हा दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले होतेभारताने कैलाश पर्वतश्रेणीतील पर्वतांवर २९ आणि ३० ऑगस्टच्या रात्री कब्जा केला होताभारताने अचानक केलेल्या कारवाईमुळे भारताला धक्का बसला होता. त्यानंतर चिनी सैन्याने या पर्वतांवर नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केले होते

नवी दिल्ली - भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये पूर्व लडाखमध्ये (india china faceoff) गेल्या एक वर्षापासून सुरू असलेला तणाव आता निवळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. डिसएंगेजमेंटवर झालेल्या सहमतीनंतर दोन्ही देशांचे सैन्या पँगाँग त्सो परिसरातून हटवण्यात येत आहे. दरम्यान, दोन्ही देशांमधील तणाव निवळत असतानाच भारतीय लष्कराचे  (Indian Army) नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. (India avoided war with China, Says Northern Army Commander Y. K. Joshi)

डिसएंगेजमेंटच्या प्रक्रियेवर प्रतिक्रिया देताना लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांनी स्पष्टपणे सांगितले की, भारताने चीनसोबतचे युद्ध टाळले आहे. या तणावादरम्यान एकवेळ अशी आली होती जेव्हा दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले होते. पूर्व लडाखमध्ये चीनसोबत निर्माण झालेल्या तणावादरम्यान अनेक चढ-उतार आले. पण ३१ ऑगस्ट रोजी दोन्ही देश युद्धाच्या परिस्थितीत पोहोचले होते. भारताने कैलाश पर्वतश्रेणीतील पर्वतांवर २९ आणि ३० ऑगस्टच्या रात्री कब्जा केला होता. त्यामुळे भारताला युद्धक्षेत्रात रणनीतिक आघाडी मिळाली होती. भारताने अचानक केलेल्या कारवाईमुळे भारताला धक्का बसला होता. त्यानंतर चिनी सैन्याने या पर्वतांवर नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र अखेरीस युद्धाची वेळ आली नाही. 

दरम्यान, लडाखमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या Opration Snow leopard बाबत माहिती देताना वाय. के. जोशी यांनी सांगितले की, या कारवाईत भारतीय लष्कराने आपला कुठलाही भूभाग गमावला नाही. पँगाँग त्सोमधून चिनी सैन्याची माघार हा भारताचा विजय आहे.  

पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवराच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्यावर भारतीय लष्कराच्या धडाकेबाज कारवाईमुळे चिनी सैन्य हैराण झाले होते. भारताने अनेक ठिकाणी चीनपेक्षा अधिक रणनीतिक आघाडी घेतली होती. त्यामुळे भारत आपल्या मागण्यांपासून माघार घेणार नाही, त्यामुळे पूर्वस्थितीत जावे लागेल, याची जाणीव चीनला झाली.    

या संपूर्ण तणावाच्या काळात भारतीय लष्कराने या परिसरातील काही महत्त्वपूर्ण शिखरांवर केलेला कब्जा हा टर्निंग पॉईंट ठरला. लेफ्टनंट जनरल जोशी यांनी सांगितले की, या आक्रमक कारवाईमुळे बळाचा वापर करून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील स्थिती एकतर्फी बदलता येणार नाही आणि भारत आपल्या भूभागाचे समर्थपणे रक्षण करेल हे चिनी सैन्याला कळून चुकले. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndian Armyभारतीय जवानIndiaभारत