शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

"त्या दिवशी चीनसोबत युद्धाला तोंड फुटले असते, पण…" लष्कराच्या बड्या अधिकाऱ्याचा मोठा गौप्यस्फोट

By बाळकृष्ण परब | Updated: February 18, 2021 11:46 IST

india china faceoff : भारत आणि चीनमधील तणाव निवळत असतानाच भारतीय लष्कराचे नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

ठळक मुद्देलडाखमधील तणावादरम्यान एकवेळ अशी आली होती जेव्हा दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले होतेभारताने कैलाश पर्वतश्रेणीतील पर्वतांवर २९ आणि ३० ऑगस्टच्या रात्री कब्जा केला होताभारताने अचानक केलेल्या कारवाईमुळे भारताला धक्का बसला होता. त्यानंतर चिनी सैन्याने या पर्वतांवर नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केले होते

नवी दिल्ली - भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये पूर्व लडाखमध्ये (india china faceoff) गेल्या एक वर्षापासून सुरू असलेला तणाव आता निवळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. डिसएंगेजमेंटवर झालेल्या सहमतीनंतर दोन्ही देशांचे सैन्या पँगाँग त्सो परिसरातून हटवण्यात येत आहे. दरम्यान, दोन्ही देशांमधील तणाव निवळत असतानाच भारतीय लष्कराचे  (Indian Army) नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. (India avoided war with China, Says Northern Army Commander Y. K. Joshi)

डिसएंगेजमेंटच्या प्रक्रियेवर प्रतिक्रिया देताना लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांनी स्पष्टपणे सांगितले की, भारताने चीनसोबतचे युद्ध टाळले आहे. या तणावादरम्यान एकवेळ अशी आली होती जेव्हा दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले होते. पूर्व लडाखमध्ये चीनसोबत निर्माण झालेल्या तणावादरम्यान अनेक चढ-उतार आले. पण ३१ ऑगस्ट रोजी दोन्ही देश युद्धाच्या परिस्थितीत पोहोचले होते. भारताने कैलाश पर्वतश्रेणीतील पर्वतांवर २९ आणि ३० ऑगस्टच्या रात्री कब्जा केला होता. त्यामुळे भारताला युद्धक्षेत्रात रणनीतिक आघाडी मिळाली होती. भारताने अचानक केलेल्या कारवाईमुळे भारताला धक्का बसला होता. त्यानंतर चिनी सैन्याने या पर्वतांवर नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र अखेरीस युद्धाची वेळ आली नाही. 

दरम्यान, लडाखमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या Opration Snow leopard बाबत माहिती देताना वाय. के. जोशी यांनी सांगितले की, या कारवाईत भारतीय लष्कराने आपला कुठलाही भूभाग गमावला नाही. पँगाँग त्सोमधून चिनी सैन्याची माघार हा भारताचा विजय आहे.  

पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवराच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्यावर भारतीय लष्कराच्या धडाकेबाज कारवाईमुळे चिनी सैन्य हैराण झाले होते. भारताने अनेक ठिकाणी चीनपेक्षा अधिक रणनीतिक आघाडी घेतली होती. त्यामुळे भारत आपल्या मागण्यांपासून माघार घेणार नाही, त्यामुळे पूर्वस्थितीत जावे लागेल, याची जाणीव चीनला झाली.    

या संपूर्ण तणावाच्या काळात भारतीय लष्कराने या परिसरातील काही महत्त्वपूर्ण शिखरांवर केलेला कब्जा हा टर्निंग पॉईंट ठरला. लेफ्टनंट जनरल जोशी यांनी सांगितले की, या आक्रमक कारवाईमुळे बळाचा वापर करून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील स्थिती एकतर्फी बदलता येणार नाही आणि भारत आपल्या भूभागाचे समर्थपणे रक्षण करेल हे चिनी सैन्याला कळून चुकले. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndian Armyभारतीय जवानIndiaभारत