शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चीन-तैवान संघर्षाची स्थिती असताना आता लडाख सीमेवरून भारतानंही ड्रॅगनला खडसावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 15:42 IST

लडाख सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने चीनच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली होती

नवी दिल्ली - पूर्व लडाखच्या सीमेजवळ लढाऊ विमानं उड्डाण केल्याबद्दल भारतानंचीनला इशारा दिला आहे. लडाखच्या सीमेपासून लढाऊ विमानं दूर ठेवा असं भारतानंचीनला बजावलं आहे. मागील काही दिवसांपासून चीनची लढाऊ विमानं भारताच्या सीमेजवळ आढळत आहेत. एकीकडे तैवानसोबत चीनचा संघर्ष वाढला असताना आता दुसरीकडे भारताने चीनला इशारा दिला आहे. अमेरिकन स्पीकर नैंसी पेलोसी यांच्या तैवान दोऱ्यामुळे चीन भडकला आहे. त्याविरोधात चीननं तैवान सीमजवळील परिसरात सैन्य अभ्यास सुरू केला आहे. 

लडाख सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने चीनच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली होती. त्यात भारताने पूर्व लडाखमधील ड्रॅगनच्या कारवायांवर विरोध दर्शवला. सरकारी सूत्रांनुसार, ही विशेष सैन्य बैठक मेजर जनरल यांच्या नेतृत्वात झाली. त्यावेळी एअर फोर्सचे एअर कोमोडोरही उपस्थित होते. भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाख येथे सुरू असलेल्या सीमासंघर्षावरून ही बैठक होती. जेव्हा भारतीय एअरफोर्सच्या अधिकाऱ्याने सैन्यस्तरीय बैठकीत सहभाग घेतला. या बैठकीत भारतानं स्पष्टपणे विमान उडवताना तुमच्या हद्दीत ठेवा असं बजावलं आहे. त्यासोबत ते एलएसी आणि १० किमी सीबीएम रेषेचे पालन करावं असंही भारतीय अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 

एअर चीफ मार्शल वीआर चौधरी यांनी सांगितले की, भारत LAC च्या हवाई कारवायांवर नजर ठेवून आहे. एलएसीवर कुठलीही चीनची संशयास्पद हालचाल दिसली तर आम्हीही तातडीने लढाऊ विमानं सज्ज ठेवली आहेत. भारतीय सैन्यानं पूर्व लडाखच्या एलएसीवर रडार ठेवला आहे. जेणेकरून हवेत होणाऱ्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवली जाऊ शकते. भारत आणि चीन यांच्या पूर्व लडाखच्या सीमावादावरून अनेक बैठका झाल्या आहेत. परंतु एकीकडे शांततेसाठी बैठका सुरू ठेवायच्या दुसऱ्या विरोधी कारवाया करण्याचं धोरणं चीननं अवलंबलं आहे. त्यामुळे भारतही प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. भारत आणि चीन यांच्यात मागील २-३ वर्षापासून लडाख येथे संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष जास्त वाढू नये साठी दोन्ही बाजूच्या अधिकाऱ्यांकडून शांततेसाठी बैठका सुरू असतात. 

टॅग्स :Indiaभारतchinaचीनladakhलडाखairforceहवाईदल