शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

चीन-तैवान संघर्षाची स्थिती असताना आता लडाख सीमेवरून भारतानंही ड्रॅगनला खडसावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 15:42 IST

लडाख सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने चीनच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली होती

नवी दिल्ली - पूर्व लडाखच्या सीमेजवळ लढाऊ विमानं उड्डाण केल्याबद्दल भारतानंचीनला इशारा दिला आहे. लडाखच्या सीमेपासून लढाऊ विमानं दूर ठेवा असं भारतानंचीनला बजावलं आहे. मागील काही दिवसांपासून चीनची लढाऊ विमानं भारताच्या सीमेजवळ आढळत आहेत. एकीकडे तैवानसोबत चीनचा संघर्ष वाढला असताना आता दुसरीकडे भारताने चीनला इशारा दिला आहे. अमेरिकन स्पीकर नैंसी पेलोसी यांच्या तैवान दोऱ्यामुळे चीन भडकला आहे. त्याविरोधात चीननं तैवान सीमजवळील परिसरात सैन्य अभ्यास सुरू केला आहे. 

लडाख सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने चीनच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली होती. त्यात भारताने पूर्व लडाखमधील ड्रॅगनच्या कारवायांवर विरोध दर्शवला. सरकारी सूत्रांनुसार, ही विशेष सैन्य बैठक मेजर जनरल यांच्या नेतृत्वात झाली. त्यावेळी एअर फोर्सचे एअर कोमोडोरही उपस्थित होते. भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाख येथे सुरू असलेल्या सीमासंघर्षावरून ही बैठक होती. जेव्हा भारतीय एअरफोर्सच्या अधिकाऱ्याने सैन्यस्तरीय बैठकीत सहभाग घेतला. या बैठकीत भारतानं स्पष्टपणे विमान उडवताना तुमच्या हद्दीत ठेवा असं बजावलं आहे. त्यासोबत ते एलएसी आणि १० किमी सीबीएम रेषेचे पालन करावं असंही भारतीय अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 

एअर चीफ मार्शल वीआर चौधरी यांनी सांगितले की, भारत LAC च्या हवाई कारवायांवर नजर ठेवून आहे. एलएसीवर कुठलीही चीनची संशयास्पद हालचाल दिसली तर आम्हीही तातडीने लढाऊ विमानं सज्ज ठेवली आहेत. भारतीय सैन्यानं पूर्व लडाखच्या एलएसीवर रडार ठेवला आहे. जेणेकरून हवेत होणाऱ्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवली जाऊ शकते. भारत आणि चीन यांच्या पूर्व लडाखच्या सीमावादावरून अनेक बैठका झाल्या आहेत. परंतु एकीकडे शांततेसाठी बैठका सुरू ठेवायच्या दुसऱ्या विरोधी कारवाया करण्याचं धोरणं चीननं अवलंबलं आहे. त्यामुळे भारतही प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. भारत आणि चीन यांच्यात मागील २-३ वर्षापासून लडाख येथे संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष जास्त वाढू नये साठी दोन्ही बाजूच्या अधिकाऱ्यांकडून शांततेसाठी बैठका सुरू असतात. 

टॅग्स :Indiaभारतchinaचीनladakhलडाखairforceहवाईदल