शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff : भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला सुनावले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 17:59 IST

या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी फोनवर चर्चा केली.

नवी दिल्ली : लडाखच्या गलवान खोऱ्यात एलएसीवर भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये सोमवारी झालेल्या हिंसक धुमश्चक्रीमध्ये चीनचे 43 हून अधिक सैनिक मारले गेले आहेत. तर भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. यामुळे सीमेवर तणाव वाढला आहे. 

या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी एस. जयशंकर यांनी चीनच्या वांग यी यांना गलवान खोऱ्यातील भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाबाबत कडक शब्दांत सुनावले. "गलवानमध्ये जे घडले ते चीनचे पूर्वनियोजित आणि नियोजित होते, ज्यामुळे सर्व घटना घडल्या," असे एस. जयशंकर यांनी वांग यी यांना सांगितले. दरम्यान, चीन सीमेपासून मागे हटण्यास आणि शक्य तितक्या लवकर तणाव कमी करण्याचा प्रयत्न करेल, असे चिनी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच, चीनने भारताच्या सीमेवर झालेल्या संघर्षाचा प्रश्न योग्य पद्धतीने सोडवण्यास सहमती दर्शविली.

दरम्यान, लडाखच्या गलवान खोऱ्यात एलएसी सीमेववर भारत-चीन सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राजनाथ सिंह म्हणाले, "आपल्या जवानांचे शौर्य आणि त्याग हा देश कधीही विसरणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. या कठीण काळात देश त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. आम्हाला भारताच्या जवानांचा पराक्रम आणि त्यांच्या धैर्याचा अभिमान वाटतो." याचबरोबर, गलवान खोऱ्यात भारतीय जवानांना आलेले वीरमरण अत्यंत वेदनादायी आणि अस्वस्थ करणारे आहे. सीमेवर तैनात असताना आपल्या जवानांनी शौर्य आणि साहस दाखवत देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, असेही राजनाथ सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.

दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शहीद जवानांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजलीही अर्पण केली आहे. यावेळी, भारत हा शांतीपूर्ण देश आहे. आपल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. भारताने कधीच कोणावर आक्रमण केलेले नाही. आम्ही चोख प्रत्युत्तर देण्यात सक्षम आहोत. शहीद झालेल्या जवानांनाही गर्व असेल की, त्यांना संघर्षात वीरमरण आले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

आणखी बातम्या...

India Chine Faceoff : जवानांचे बलिदान देश कधीच विसरणार नाही - राजनाथ सिंह

दहा महिन्यांपूर्वी परिधान केली होती लष्कराची वर्दी, आता येणार तिरंग्यात लपेटलेले पार्थिव

ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास केल्यास शिक्षा होणार नाही? रेल्वे अनेक तरतुदी हटविण्याच्या तयारीत

21 जूनला होणार जगाचा अंत? जाणून घ्या, माया कॅलेंडरच्या दाव्यामागील सत्य...

चिनी सैन्याला आता उत्तर देण्याची वेळ आली आहे - कॅप्टन अमरिंदर सिंग

टॅग्स :Indiaभारतchinaचीनladakhलडाख