शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'इंडिया आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीपुरती होती'; तेजस्वी यादवांचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 21:24 IST

India Alliance: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने इंडिया आघाडी खिळखिळी होताना दिसत आहे. काँग्रेसकडे नेतृत्व असलेल्या विरोधकांच्या आघाडीत आता वेगवेगळे सूर उमटू लागले आहेत. 

India Alliance News: लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळवल्यानंतर दोन राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाचे हादरे इंडिया आघाडीला बसू लागल्याचे दिसत आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाने काँग्रेसला दूर ठेवले, तर इंडिया आघाडीतील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने आणि अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने काँग्रेसला बाजूला सारून अरविंद केजरीवालांना साथ दिली आहे. त्यात आता राजदचे नेते आणि बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी केलेल्या विधानाने इंडिया आघाडी फुटण्याच्या चर्चेला तोंड फुटलं आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

तेजस्वी यादव काय बोलले आहेत?

बक्सरमध्ये तेजस्वी यादव यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी तेजस्वी यादव म्हणाले की, 'इंडिया आघाडी बनवत असताना असं ठरलं होतं की, ही आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीपुरती असेल. विधानसभा निवडणुकीत ही आघाडी असणार नाही.'

जेव्हा तेजस्वी यादव यांना विचारण्यात आले की, दिल्लीत निवडणूक प्रचाराला जाणार आहात का? त्यावर ते म्हणाले, 'याबद्दल अजून काही ठरलेलं नाही. पुढचं पुढे बघू. पण, बिहारमध्ये आम्ही एकत्र असू."

काँग्रेसकडील नेतृत्वावरून नाराजी

सलग दोन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगली कामगिरी करता आली नाही. काँग्रेसमधील असमन्वयामुळे मित्रपक्षांनाही फटका बसल्याचे प्रामुख्याने अधोरेखित केले गेले. 

दोन राज्यातील निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसकडून केल्या जात असलेल्या इंडिया आघाडीच्या नेतृत्वाबद्दल असमाधान व्यक्त करण्यात आले. ममतांनी इंडिया आघाडीचे प्रमुख व्हावे म्हणून लाल प्रसाद यादवांनी पाठिंबा दिला. 

इतकंच नाही, तर उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या पक्ष असलेल्या अखिलेश यादवांच्या समाजवादी पार्टीकडून काँग्रेसबद्दल नाराजी व्यक्त केली गेली. केजरीवालांनी विधानसभा निवडणुकीतील अपयशावरून थेट टीका करत काँग्रेससोबत आघाडी न करण्याची घोषणा केली होती. 

गेल्या काही महिन्यात इंडिया आघाडीतील घटक पक्षांकडूनच काँग्रेसबद्दल नाराजीचे सूर उमटत आहेत. त्यात आता तेजस्वी यादवांनी विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्याबद्दल सूचक विधान केले. तसेच इंडिया आघाडी लोकसभेपुरती होती, असे म्हटल्याने नवा मुद्दा चर्चेत आला आहे. 

टॅग्स :Tejashwi Yadavतेजस्वी यादवRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीMamata Banerjeeममता बॅनर्जी