शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

"INDIA आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी होती..."; आणखी एका मित्रपक्षाचा काँग्रेसला झटका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 18:41 IST

इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीपुरती होती. त्यामुळे काँग्रेस आणि आम आदमी पक्षात वाद होणे हे अस्वाभाविक नाही असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं.

पटना - इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकीसाठी होती असं विधान आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी केल्यानं काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाच्या वादात तेजस्वी यादव यांनी हे विधान केले. बिहार विधानसभा निवडणूक आणि दिल्ली निवडणुकीवर तेजस्वी यादव यांनी आरजेडीची भूमिका स्पष्ट केली. 

तेजस्वी यादव यांच्या विधानामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ माजली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच तेजस्वी यादव यांनी केलेले विधान काँग्रेससाठी चिंताजनक आहे. इंडिया आघाडी आता भूतकाळ झाली. ही आघाडी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी बनवण्यात आली होती. आता पुढच्या निवडणुकीत त्याचा फार अर्थ नाही असं त्यांनी सांगितले. पत्रकारांनी तेजस्वी यादव यांना दिल्लीत आप आणि काँग्रेसमधील वादावर प्रश्न विचारला होता त्यावरून तेजस्वी यादव यांनी हे उत्तर दिले.

इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीपुरती होती. त्यामुळे काँग्रेस आणि आम आदमी पक्षात वाद होणे हे अस्वाभाविक नाही असं तेजस्वी यादव यांनी म्हटल्याने राष्ट्रीय जनता दलही काँग्रेससोबत कुठल्याही प्रकारे आघाडी करण्यास उत्सुक नसल्याचं दिसून येते. बिहार विधानसभा निवडणुकीबाबत अद्याप पक्षाने निर्णय घेतला नाही. दिल्लीत निवडणूक लढवायची की नाही हे ठरले नाही असंही तेजस्वी यादव यांनी स्पष्ट केले. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आपने भाजपाविरोधात एकत्रित निवडणूक लढवली होती परंतु विधानसभेला हे दोन्ही पक्ष वेगळे निवडणुकीत उतरले आहेत. समाजवादी पक्षानेही आपला पाठिंबा जाहीर केला आहे. 

दरम्यान, बिहारमध्ये याच वर्षी विधानसभा निवडणूक होणार असून त्यात राजद आणि काँग्रेस एकत्रित लढतील असं बोलले जाते परंतु जागावाटपावरून दोन्ही पक्षात चढाओढ सुरू आहे. काँग्रेसने कमीत कमी ७० जागा लढाव्यात असं स्थानिक नेते सांगतात त्याशिवाय जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्रिपदाचीही मागणी केली आहे. त्याचवेळी तेजस्वी यादव यांनी केलेले विधान काँग्रेसला संकेत दिल्याचीही चर्चा आहे.  

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीTejashwi Yadavतेजस्वी यादवcongressकाँग्रेसArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप