शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
3
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
4
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
5
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
6
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
7
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
8
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
9
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
10
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
11
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
12
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
13
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
14
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
15
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
16
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
17
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
18
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
19
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
20
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा

आघाडीत बिघाडी? राहुल गांधींच्या उमेदवारीला INDIA आघाडीतून विरोध; CPI ची वेगळी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 21:46 IST

राहुल गांधी यांनी वायनाडमधून निवडणूक लढवू नये, अशी मागणी काँग्रेसचा मित्रपक्ष सीपीआयने केली आहे.

Lok Sabha Election 2024: येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पण, काँग्रेस अडचणीत आली आहे. या अडचणीचे कारण दुसरे काही नसून राहुल गांधी यांचा वायनाड लोकसभा मतदारसंघ आहे. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींना ही जागा सोडावी लागू शकते. याचे कारण म्हणजे, इंडिया आघाडीचा भाग असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (CPI) राहुल गांधींच्या उमेदवारीला विरोध केला आहे. 

राहुल गांधींना मित्रपक्षाकडून विरोधसीपीआयच्या सूत्र्यांच्या हवाल्याने मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात येतोय की, राहुल गांधींना 2024 ची लोकसभा निवडणूक वायनाड मतदारसंघातून लढवू नये, अशी सीपीआयची इच्छा आहे. हा सीपीआयचा पारंपारिक मतदारसंघ आहे, असे सीपीआयचे मत आहे. राहुल गांधींनी वायनाडमधून निवडणूक लढवली तर आघाडीसाठी योग्य ठरणार नाही, असा स्पष्ट संदेश सीपीआयकडून काँग्रेसला देण्यात आला आहे. त्यामुळेच राहुल गांधींनी दुसरा मतदारसंघ निवडावा असे पक्षाचे म्हणने आहे. विशेष म्हणजे, सीपीआयने राहुल गांधींना फक्त वायनाड नाही, तर केरळच्या कुठल्याही मतदारसंघातून निवडणूक लढवू नये, असे म्हटले आहे. 

राहुल गांधींनी दुसऱ्या राज्यातून लढावेज्या राज्यात काँग्रेसची भाजपशी थेट लढत आहे, अशा राज्यातून राहुल यांनी लढावे, असे सीपीआयचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे केरळमध्ये सीपीआयने काँग्रेससमोर ज्या अटी ठेवल्या, त्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षही पाठिंबा देत आहे. म्हणजेच राहुल यांना वायनाडमधून हटवण्यासाठी केरळमध्ये काँग्रेसवर सर्व बाजूंनी दबाव आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसला केरळमध्ये आपली आघाडी वाचवायची असेल, तर राहुल गांधींना केरळमधून बाहेर पडावे लागेल. आता यात किती तथ्य आहे आणि राहुल गांधी काय निर्णय घेतात, हे येणाऱ्या काळात कळेल. 

वायनाडमध्ये काँग्रेसचे वर्चस्व2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी वायनाडमध्ये चार लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसचे एमआय शानवास यांनी सीपीआयच्या सत्यन मोकेरी यांचा सुमारे 20 हजार मतांनी पराभव केला होता. 2009 च्या निवडणुकीतही एम शानवास यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. 2019 मध्ये काँग्रेसने केरळमध्ये 16 पैकी 15 जागा जिंकल्या होत्या. त्यांच्या विजयामागे वायनाडमधून राहुल गांधींची लढत महत्त्वाची होती. अशा परिस्थितीत काँग्रेस सीपीआयपुढे झुकल्यास काँग्रेसचेच मोठे नुकसान होऊ शकते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीwayanad-pcवायनाडlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकcongressकाँग्रेसCommunist Party of indiaकम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाBJPभाजपाKeralaकेरळ