शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
5
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
6
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
7
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
8
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
9
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
10
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
11
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
12
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
13
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
14
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
15
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
16
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
17
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
18
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा युवा नेता निघाला काँग्रेसचा आमदार, वाद होताच दिला पदाचा राजीनामा
19
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
20
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

आघाडीत बिघाडी? राहुल गांधींच्या उमेदवारीला INDIA आघाडीतून विरोध; CPI ची वेगळी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 21:46 IST

राहुल गांधी यांनी वायनाडमधून निवडणूक लढवू नये, अशी मागणी काँग्रेसचा मित्रपक्ष सीपीआयने केली आहे.

Lok Sabha Election 2024: येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पण, काँग्रेस अडचणीत आली आहे. या अडचणीचे कारण दुसरे काही नसून राहुल गांधी यांचा वायनाड लोकसभा मतदारसंघ आहे. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींना ही जागा सोडावी लागू शकते. याचे कारण म्हणजे, इंडिया आघाडीचा भाग असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (CPI) राहुल गांधींच्या उमेदवारीला विरोध केला आहे. 

राहुल गांधींना मित्रपक्षाकडून विरोधसीपीआयच्या सूत्र्यांच्या हवाल्याने मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात येतोय की, राहुल गांधींना 2024 ची लोकसभा निवडणूक वायनाड मतदारसंघातून लढवू नये, अशी सीपीआयची इच्छा आहे. हा सीपीआयचा पारंपारिक मतदारसंघ आहे, असे सीपीआयचे मत आहे. राहुल गांधींनी वायनाडमधून निवडणूक लढवली तर आघाडीसाठी योग्य ठरणार नाही, असा स्पष्ट संदेश सीपीआयकडून काँग्रेसला देण्यात आला आहे. त्यामुळेच राहुल गांधींनी दुसरा मतदारसंघ निवडावा असे पक्षाचे म्हणने आहे. विशेष म्हणजे, सीपीआयने राहुल गांधींना फक्त वायनाड नाही, तर केरळच्या कुठल्याही मतदारसंघातून निवडणूक लढवू नये, असे म्हटले आहे. 

राहुल गांधींनी दुसऱ्या राज्यातून लढावेज्या राज्यात काँग्रेसची भाजपशी थेट लढत आहे, अशा राज्यातून राहुल यांनी लढावे, असे सीपीआयचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे केरळमध्ये सीपीआयने काँग्रेससमोर ज्या अटी ठेवल्या, त्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षही पाठिंबा देत आहे. म्हणजेच राहुल यांना वायनाडमधून हटवण्यासाठी केरळमध्ये काँग्रेसवर सर्व बाजूंनी दबाव आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसला केरळमध्ये आपली आघाडी वाचवायची असेल, तर राहुल गांधींना केरळमधून बाहेर पडावे लागेल. आता यात किती तथ्य आहे आणि राहुल गांधी काय निर्णय घेतात, हे येणाऱ्या काळात कळेल. 

वायनाडमध्ये काँग्रेसचे वर्चस्व2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी वायनाडमध्ये चार लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसचे एमआय शानवास यांनी सीपीआयच्या सत्यन मोकेरी यांचा सुमारे 20 हजार मतांनी पराभव केला होता. 2009 च्या निवडणुकीतही एम शानवास यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. 2019 मध्ये काँग्रेसने केरळमध्ये 16 पैकी 15 जागा जिंकल्या होत्या. त्यांच्या विजयामागे वायनाडमधून राहुल गांधींची लढत महत्त्वाची होती. अशा परिस्थितीत काँग्रेस सीपीआयपुढे झुकल्यास काँग्रेसचेच मोठे नुकसान होऊ शकते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीwayanad-pcवायनाडlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकcongressकाँग्रेसCommunist Party of indiaकम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाBJPभाजपाKeralaकेरळ