शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

आघाडीत बिघाडी? राहुल गांधींच्या उमेदवारीला INDIA आघाडीतून विरोध; CPI ची वेगळी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 21:46 IST

राहुल गांधी यांनी वायनाडमधून निवडणूक लढवू नये, अशी मागणी काँग्रेसचा मित्रपक्ष सीपीआयने केली आहे.

Lok Sabha Election 2024: येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पण, काँग्रेस अडचणीत आली आहे. या अडचणीचे कारण दुसरे काही नसून राहुल गांधी यांचा वायनाड लोकसभा मतदारसंघ आहे. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींना ही जागा सोडावी लागू शकते. याचे कारण म्हणजे, इंडिया आघाडीचा भाग असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (CPI) राहुल गांधींच्या उमेदवारीला विरोध केला आहे. 

राहुल गांधींना मित्रपक्षाकडून विरोधसीपीआयच्या सूत्र्यांच्या हवाल्याने मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात येतोय की, राहुल गांधींना 2024 ची लोकसभा निवडणूक वायनाड मतदारसंघातून लढवू नये, अशी सीपीआयची इच्छा आहे. हा सीपीआयचा पारंपारिक मतदारसंघ आहे, असे सीपीआयचे मत आहे. राहुल गांधींनी वायनाडमधून निवडणूक लढवली तर आघाडीसाठी योग्य ठरणार नाही, असा स्पष्ट संदेश सीपीआयकडून काँग्रेसला देण्यात आला आहे. त्यामुळेच राहुल गांधींनी दुसरा मतदारसंघ निवडावा असे पक्षाचे म्हणने आहे. विशेष म्हणजे, सीपीआयने राहुल गांधींना फक्त वायनाड नाही, तर केरळच्या कुठल्याही मतदारसंघातून निवडणूक लढवू नये, असे म्हटले आहे. 

राहुल गांधींनी दुसऱ्या राज्यातून लढावेज्या राज्यात काँग्रेसची भाजपशी थेट लढत आहे, अशा राज्यातून राहुल यांनी लढावे, असे सीपीआयचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे केरळमध्ये सीपीआयने काँग्रेससमोर ज्या अटी ठेवल्या, त्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षही पाठिंबा देत आहे. म्हणजेच राहुल यांना वायनाडमधून हटवण्यासाठी केरळमध्ये काँग्रेसवर सर्व बाजूंनी दबाव आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसला केरळमध्ये आपली आघाडी वाचवायची असेल, तर राहुल गांधींना केरळमधून बाहेर पडावे लागेल. आता यात किती तथ्य आहे आणि राहुल गांधी काय निर्णय घेतात, हे येणाऱ्या काळात कळेल. 

वायनाडमध्ये काँग्रेसचे वर्चस्व2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी वायनाडमध्ये चार लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसचे एमआय शानवास यांनी सीपीआयच्या सत्यन मोकेरी यांचा सुमारे 20 हजार मतांनी पराभव केला होता. 2009 च्या निवडणुकीतही एम शानवास यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. 2019 मध्ये काँग्रेसने केरळमध्ये 16 पैकी 15 जागा जिंकल्या होत्या. त्यांच्या विजयामागे वायनाडमधून राहुल गांधींची लढत महत्त्वाची होती. अशा परिस्थितीत काँग्रेस सीपीआयपुढे झुकल्यास काँग्रेसचेच मोठे नुकसान होऊ शकते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीwayanad-pcवायनाडlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकcongressकाँग्रेसCommunist Party of indiaकम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाBJPभाजपाKeralaकेरळ