शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

'काँग्रेस-TMC मध्ये जागावाटपावर चर्चा सुरू, लवकरच तोडगा निघेल', राहुल गांधींचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 16:08 IST

INDIA Alliance Congress-TMC: ममता बॅनर्जी यांच्या स्वबळाच्या घोषणेवर राहुल गांधींची महत्वाची प्रतिक्रिया आली आहे.

INDIA Alliance Congress-TMC: लोकसभा निवडणुकीला काही महिने उरले आहेत. एकीकडे भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, तर दुसरीकडे विरोधकांच्या INDIA आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमारांनी साथ सोडल्यानंतर ममता बॅनर्जीदेखीलइंडिया आघाडी सोडणार असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधी यांचे महत्वाची प्रतिक्रिया समोर आले आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेसह पश्चिम बंगालमध्ये पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी तरुणांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तरुणांशी संवाद साधताना एका तरुणाने त्यांना प्रश्न केला की, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पक्ष इंडिया आघाडीत आहे. पण, आता त्या आघाडीतून वेगळ्या होताना दिसत आहे. ममतांना एवढे प्राधान्य का दिले जात आहे?

याला उत्तर देताना राहुल म्हणतात, 'आमची इंडिया आघाडी आहे. ममता बॅनर्जी किंवा आम्ही इंडिया आघाडी तोडलेली नाही. ममताजी आघाडीत असल्याचे सांगत आहेत. आम्हीदेखील आघाडीतच आहोत. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू आहे, यावर लवकरच तोडगा निघेल.' राहुल यांच्या या वक्तव्यावरुन काँग्रेस-तृणमूलमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?ममता बॅनर्जी यांनी गेल्या महिन्यात पश्चिम बंगालमध्ये एकट्याने निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. पण, राष्ट्रीय स्तरावर त्यांचा पक्ष टीएमसी इंडिया आघाडीचा एक भाग राहील. डावे पक्ष इंडिया आघाडीचा अजेंडा हायजॅक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ममता यांनी केला. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे, तर पंजाबमध्येही आम आदमी पार्टीने स्वबळाचा नारा दिला आहे. अशा परिस्थितीत इंडिया आघाडीची वाट अवघड दिसत आहे. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीtmcठाणे महापालिकाcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाRahul Gandhiराहुल गांधीMamata Banerjeeममता बॅनर्जी