शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वीच इंडिया आघाडी फुटली; तृणमूल नाराज, काँग्रेसचे गणित बिघडवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 18:51 IST

इंडिया आघाडीची स्थापना करणारे नितीशकुमार लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपासोबत एनडीएत गेले होते. यानंतर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या आडमुठेपणामुळे वेगळे लढण्याची घोषणा केली होती.

लोकसभा उप सभापती पदाची बोलणी फिस्कटल्याने तब्बल सात दशकांनी पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. उद्या मतदान होणार असून भाजपाने ओम बिर्ला तर काँग्रेसने के सुरेश यांची उमेदवारी दिली आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांची आज सायंकाळी काँग्रेस अध्यक्ष खर्गेंच्या निवासस्थानी बैठक होत आहे. उद्याची रणनिती ठरविण्यासाठी ही बैठक होत असून या बैठकीपूर्वीच इंडिया आघाडीतील फाटाफूट समोर आली आहे. 

इंडिया आघाडीची स्थापना करणारे नितीशकुमार लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपासोबत एनडीएत गेले होते. यानंतर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या आडमुठेपणामुळे वेगळे लढण्याची घोषणा केली होती. इथेच खरी इंडिया आघाडी फुटली होती. निकाल लागल्यानंतर खर्गेंनी पुन्हा ममतांना इंडिया आघाडीत घेण्याचे प्रयत्न केले होते. परंतू आज लोकसभा अध्यक्ष पदासाठी उमेदवार देताना आपल्याला विश्वासात घेतले नाही, असा आरोप ममता यांच्या पक्षाने केला आहे. 

ममता यांचा पुतण्या खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया आघाडीचे अध्यक्ष पदासाठीची उमेदवारी के सुरेश यांना देताना आमचे मत विचारले गेले नाही. काँग्रेसने परस्पर हा निर्णय घेतला आहे. यामुळे ममता बॅनर्जी आता इंडिया आघाडीला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेतील असे ते म्हणाले. कोणीही आमच्याशी संपर्क साधला नाही, संभाषण झाले नाही, दुर्दैवाने हा एकतर्फी निर्णय आहे, असेही ते म्हणाले. 

सुत्रांनुसार के सुरेश यांच्या उमेदवारी अर्जावर तृणमूलची सही नाहीय. यामुळे आज रात्री होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीतही तृणमूल सहभागी होण्याची शक्यता कमी आहे. अशातच आता अध्यक्ष पदासाठी तृणमूल काय भूमिका घेते याकडे भाजपाचे आणि काँग्रेसचे लक्ष लागले आहे. विश्वासात न घेतल्याने तृणमूलचे खासदार तटस्थ देखील राहू शकतात. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसBJPभाजपा